शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

मोदींनी ठरवलं! लोकसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण करणार राज्यांतील ३८ प्रकल्प; १ लाख कोटींचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 05:18 IST

महाराष्ट्रात एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचे ३८ प्रकल्प आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी पूर्ण केले जाणार आहेत.

हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : महाराष्ट्रात एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचे ३८ प्रकल्प आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी पूर्ण केले जातील. या प्रकल्पांची अंदाजे मूळ किंमत ६३,८०४ कोटी रुपये गृहीत धरण्यात आली होती. २० वर्षांच्या झालेल्या विलंबामुळे त्यांचा खर्च ४० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढला आहे. दोन प्रकल्पांचा खर्च तर तब्बल ५०० टक्क्यांनी वाढला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातील रेल्वे, रस्ते, शहरी पायाभूत सुविधांशी संबंधित या प्रकल्पांकडे रोज लक्ष देत असल्यामुळे आता विलंबाचे दिवस निघून गेले आहेत. वर्ष २०२४ मधील लोकसभा निवडणुकीच्या आधी हे प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य मोदी यांनी ठरवले आहे. हे लक्ष्य केवळ महाराष्ट्रापुरतेच नसून इतर राज्यांसाठीही आहे. 

मुंबई मेट्रो लाइन-३ (कुलाबा-वांद्रे-सिप्झ)

अंदाजित खर्च - २३,१३६कोटी रूपये पूर्ण होईपर्यंतचा खर्च - ३३,४०६कोटी 

सद्य:स्थिती : लॉकडाऊनमुळे मेट्रो ३ च्या खर्चात वाढ झाली असून, स्थापत्य कामांसह कर्मचारी खर्च १०८ कोटींनी वाढला आहे. कोरोनामध्ये आलेल्या अडचणीमुळे २३ मार्च २०२० ते २२ सप्टेंबर २०२० या काळातील कामांना मुदतवाढ दिली होती. या काळात स्थापत्य काम आणि मजुराच्या वेतनापोटी प्रशासनाच्या खर्चात १०७ कोटी ९१ लाख रुपयांनी वाढ झाली.

बेलापूर-सीवूड इलेक्ट्रिक डबल लाइन

४९५कोटी अंदाजित खर्च, २,९८०कोटी वाढलेली किंमत

१९९६ मध्ये या प्रकल्पाचा गृहीत धरला होता. तो आता ५०० टक्क्यांनी वाढला आहे.

कधी पूर्ण होणार? : हा प्रकल्प येत्या ३ महिन्यांत पूर्ण होईल.

सद्य:स्थिती : यंदाच्या अर्थसंकल्पात बेलापूर-सीवूड-उरण मार्गसाठी १५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एमयूटीपी ३ प्रकल्पातील हा प्रकल्प पूर्ण झाल्यास रेल्वे मुंबई ते उरण थेट सेवा देता येणार आहे.

वडसा-गडचिरोली

२२९कोटी अंदाजित खर्च, १०९६कोटी वाढलेली किंमत

कधी पूर्ण होणार? : फेब्रुवारी, २०२४

विलंब कशामुळे : : रेल्वे मार्ग काही ठिकाणी घनदाट जंगलातून जातो. चार किमी परिसरात वाघांचा अधिवास.

प्रकल्पाचे तपशिलीकरण, वेगवेगळ्या तांत्रिक बाबी, आर्थिक आणि प्रशासकीय निर्णयांवर अवलंबून राहावे लागणे यामुळे प्रकल्पखर्चात वाढ झाली. काही प्रकल्पांचा खर्चच कमी दाखविला गेला हाेता. तसेच कुशल मनुष्यबळ व मजुरांची टंचाई. हेही प्रकल्प दिरंगाईचे कारण ठरले. - राव इंदरजित सिंह, राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार) सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय

रखडलेले प्रकल्प 

रेल्वे : १४, मूळ किंमत - १८,५६७ कोटी, अंदाजित खर्च - ३२,९४९ कोटीकोळसा : ५ मूळ किंमत - १,८०१ कोटी, अंदाजित खर्च - २,११३ कोटीपेट्रोलियम : ५ मूळ किंमत - ११,२८७ कोटी, अंदाजित खर्च - १३,५२९ कोटीशहरी विकास (मेट्रो) : १ मूळ किंमत - २३,१३६ कोटी, अंदाजित खर्च - ३३,४०६ कोटीमहामार्ग : १३ मूळ किंमत - ८,९६६ कोटी रूपये, अंदाजित खर्च - ९,८०६ कोटी 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारMetroमेट्रोIndian Railwayभारतीय रेल्वे