शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

केसीआर सरकार म्हणजे सर्वात भ्रष्ट सरकार, नरेंद्र मोदींचा तेलंगणात हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 13:58 IST

केसीआर सरकार म्हणजे सर्वात भ्रष्ट सरकार, अशा शब्दांत नरेंद्र मोदींनी केसीआर सरकारवर निशाणा साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (8 जुलै) तेलंगणातील वारंगलमध्ये 6,000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. यावेळी तेलंगणा राज्यातील केसीआर सरकारवर नरेंद्र मोदींनी जोरदार हल्लाबोल केला. "तेलंगणा सरकारने काय केले? तर येथील राज्य सरकारने केवळ 4 कामे केली आहेत. पहिले म्हणजे मोदी आणि केंद्र सरकारला शिव्या घालण्याचे काम सकाळ-संध्याकाळ केले आहे. दुसरे म्हणजे केवळ एकाच कुटुंबाला सत्तेचे केंद्र बनवून स्वतःला तेलंगणाचे धनी सिद्ध करण्याचे काम त्यांनी केले आहे. तिसरे म्हणजे, त्यांनी तेलंगणाच्या विकासाला खिंडार पाडले आणि चौथे काम म्हणजे त्यांनी तेलंगणाला भ्रष्टाचारात बुडवले. केसीआर सरकार म्हणजे सर्वात भ्रष्ट सरकार", अशा शब्दांत नरेंद्र मोदींनी केसीआर सरकारवर निशाणा साधला.

याचबरोबर, नरेंद्र मोदींनी देशातील विकासाबद्दल भाष्य केले. तेलंगणातील लोकांच्या ताकदीने भारताची ताकद नेहमीच वाढवली आहे. आज भारतातील अर्थव्यवस्था जगातील 5 व्या नंबरवर आहे, त्यात तेलंगणातील लोकांचा मोठा वाटा आहे. अशा परिस्थितीत जेव्हा संपूर्ण जग भारतात गुंतवणूक करण्यासाठी येत आहे, तेव्हा तेलंगणासमोर अनेक संधी उपलब्ध असतील. आजचा भारत हा नवा भारत आहे. एकविसाव्या शतकाच्या या तिसऱ्या दशकात एक सुवर्णकाळ आपल्याकडे आला आहे. या संधीच्या प्रत्येक क्षणाचा पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे. वेगवान विकासाच्या शक्यतेमध्ये देशाचा कोणताही कोपरा मागे राहू नये, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

नवीन ध्येयांसाठीही नवीन मार्ग काढावे लागतात. जुन्या पायाभूत सुविधांवर भारताचा वेगवान विकास शक्य नव्हता. म्हणूनच आमचे सरकार पूर्वीपेक्षा अधिक वेगाने आणि मोठ्या प्रमाणावर काम करत आहे. आज, प्रत्येक प्रकारच्या पायाभूत सुविधांसाठी पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने वेगाने काम केले जात आहे. आज देशभरात महामार्ग, द्रुतगती मार्ग, इकॉनॉमिक कॉरिडॉर, इंडस्ट्रियल कॉरिडॉरचे जाळे निर्माण होत आहे. तरुणांसाठी रोजगाराचे आणखी एक मोठे माध्यम देशातील उत्पादन क्षेत्र बनत आहे. 'मेक इन इंडिया' मोहीम राबविली जात आहे. देशात उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही PLI योजना सुरू केली आहे. याचा अर्थ जो जास्त उत्पादन करतो त्याला भारत सरकारकडून विशेष मदत मिळत आहे, असेही यावेळी नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

टॅग्स :TelanganaतेलंगणाNarendra Modiनरेंद्र मोदीK Chandrashekar Raoके चंद्रशेखर राव