शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

केसीआर सरकार म्हणजे सर्वात भ्रष्ट सरकार, नरेंद्र मोदींचा तेलंगणात हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 13:58 IST

केसीआर सरकार म्हणजे सर्वात भ्रष्ट सरकार, अशा शब्दांत नरेंद्र मोदींनी केसीआर सरकारवर निशाणा साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (8 जुलै) तेलंगणातील वारंगलमध्ये 6,000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. यावेळी तेलंगणा राज्यातील केसीआर सरकारवर नरेंद्र मोदींनी जोरदार हल्लाबोल केला. "तेलंगणा सरकारने काय केले? तर येथील राज्य सरकारने केवळ 4 कामे केली आहेत. पहिले म्हणजे मोदी आणि केंद्र सरकारला शिव्या घालण्याचे काम सकाळ-संध्याकाळ केले आहे. दुसरे म्हणजे केवळ एकाच कुटुंबाला सत्तेचे केंद्र बनवून स्वतःला तेलंगणाचे धनी सिद्ध करण्याचे काम त्यांनी केले आहे. तिसरे म्हणजे, त्यांनी तेलंगणाच्या विकासाला खिंडार पाडले आणि चौथे काम म्हणजे त्यांनी तेलंगणाला भ्रष्टाचारात बुडवले. केसीआर सरकार म्हणजे सर्वात भ्रष्ट सरकार", अशा शब्दांत नरेंद्र मोदींनी केसीआर सरकारवर निशाणा साधला.

याचबरोबर, नरेंद्र मोदींनी देशातील विकासाबद्दल भाष्य केले. तेलंगणातील लोकांच्या ताकदीने भारताची ताकद नेहमीच वाढवली आहे. आज भारतातील अर्थव्यवस्था जगातील 5 व्या नंबरवर आहे, त्यात तेलंगणातील लोकांचा मोठा वाटा आहे. अशा परिस्थितीत जेव्हा संपूर्ण जग भारतात गुंतवणूक करण्यासाठी येत आहे, तेव्हा तेलंगणासमोर अनेक संधी उपलब्ध असतील. आजचा भारत हा नवा भारत आहे. एकविसाव्या शतकाच्या या तिसऱ्या दशकात एक सुवर्णकाळ आपल्याकडे आला आहे. या संधीच्या प्रत्येक क्षणाचा पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे. वेगवान विकासाच्या शक्यतेमध्ये देशाचा कोणताही कोपरा मागे राहू नये, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

नवीन ध्येयांसाठीही नवीन मार्ग काढावे लागतात. जुन्या पायाभूत सुविधांवर भारताचा वेगवान विकास शक्य नव्हता. म्हणूनच आमचे सरकार पूर्वीपेक्षा अधिक वेगाने आणि मोठ्या प्रमाणावर काम करत आहे. आज, प्रत्येक प्रकारच्या पायाभूत सुविधांसाठी पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने वेगाने काम केले जात आहे. आज देशभरात महामार्ग, द्रुतगती मार्ग, इकॉनॉमिक कॉरिडॉर, इंडस्ट्रियल कॉरिडॉरचे जाळे निर्माण होत आहे. तरुणांसाठी रोजगाराचे आणखी एक मोठे माध्यम देशातील उत्पादन क्षेत्र बनत आहे. 'मेक इन इंडिया' मोहीम राबविली जात आहे. देशात उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही PLI योजना सुरू केली आहे. याचा अर्थ जो जास्त उत्पादन करतो त्याला भारत सरकारकडून विशेष मदत मिळत आहे, असेही यावेळी नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

टॅग्स :TelanganaतेलंगणाNarendra Modiनरेंद्र मोदीK Chandrashekar Raoके चंद्रशेखर राव