शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
6
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
7
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
8
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
9
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
10
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
11
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
12
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
13
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
14
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
15
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
16
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
17
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
18
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
19
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
20
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना

Coronavirus: …म्हणजे २० लाख कोटी नव्हे तर १४ लाख कोटी पॅकेजची होणार नवीन घोषणा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 08:45 IST

Coronavirus: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आर्थिक पॅकेजची घोषणा केली पण या पॅकेजमध्ये अर्थमंत्री आणि आरबीआयकडून याआधी केलेल्या घोषणाही समाविष्ट आहेत

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केलीतत्पूर्वी ६ लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा यापूर्वीच झाली आहेउर्वरित १४ लाख कोटींबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारमण घोषणा करतील

नवी दिल्ली – कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करताना २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. स्वावलंबी भारत असं या पॅकेजला नाव देण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाचा सामना करण्यासाठी घोषित केलेले २० लाख कोटी रुपये हे आतापर्यंतचं सर्वात मोठं आर्थिक पॅकेज आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आर्थिक पॅकेजची घोषणा केली पण या पॅकेजमध्ये अर्थमंत्री आणि आरबीआयकडून याआधी केलेल्या घोषणाही समाविष्ट आहेत. त्यामुळे उर्वरित पॅकेज किती कोटींचे असेल याची उत्सुकता सर्वांना आहे. आतापर्यंत रिझर्व्ह बँकेने दोन टप्प्यात सुमारे ४.२५ लाख कोटी रुपयांचे आर्थिक मदत पॅकेज जाहीर केले आहे. पहिल्यांदा २७ मार्च रोजी रिझर्व्ह बँकेने रोख वाढीसाठी अनेक उपायांची घोषणा केली आणि रेपो दरात ७५ बेसिस पॉईंटने मोठी कपात करण्याची घोषणा केली. सीआरआर ४ वरून ३ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला.

पहिले टार्गेटेड लाँग टर्म रेपो ऑपरेशन (TLTRO) द्वारे प्रणालीमध्ये १ लाख कोटींचा रोख प्रवाहाबद्दल सांगितलं होतं. यात सुमारे ३.७४ लाख कोटी रुपयांची रोकड यंत्रणेत येईल असं म्हणाले. १७ एप्रिल रोजी रिझर्व्ह बँकेने पुन्हा ५० हजार कोटींचा रोख प्रवाह वाढवण्यासाठी उपाययोजना केल्या. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीही १.७ लाख रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केली होती, ज्यात गरीब कल्याण योजनेंतर्गत गरिबांना मदत केल्याचे सांगण्यात आले.

अशाप्रकारे ५.९४ लाख कोटी म्हणजे जवळपास ६ लाख कोटी आर्थिक पॅकेजची घोषणा यापूर्वीच केली आहे. पहिल्यांदा केलेल्या आर्थिक पॅकेजची मदत पुढील प्रमाणे आहे.

१) गरीब कल्याण योजना पॅकेज

केंद्र सरकारने गरीब कल्याण योजनेंतर्गत १.७ लाख कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले. त्याअंतर्गत थेट गरिबांच्या खात्यावर पैसे पाठविले जात आहेत.

२) टीएलटीआरओ १

२७ मार्च रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. रिझर्व्ह बँकेने सीआरआरमध्ये कपात केली होती आणि पहिल्या टार्गेटेड लाँग टर्म रेपो ऑपरेशन (टीएलटीआरओ) जाहीर केले होते, ज्यात प्रणालीत ३.७४ लाख कोटी रुपयांची रोकड आणली जात असल्याचे सांगितले जात होते.

रिव्हर्स रेपो दरात २५ बेस पॉईंटने कपात केली आहे. आता रिव्हर्स रेपो दर ४% वरुन ३.७५% पर्यंत खाली आला आहे. रिव्हर्स रेपो दर कपातीचा फायदा बँकांना होईल. बँकांना कर्ज मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने टीएलटीआरओ १ अन्वये बँकिंग प्रणालीत १ लाख कोटी रुपयांची रोख रक्कम जमा करण्याची घोषणा केली होती.

यानंतर १७ एप्रिल रोजी रिझर्व्ह बँकेने पुन्हा अनेक घोषणा केल्या. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, कोविड १९ मुळे छोट्या आणि मध्यम कॉर्पोरेट्सना मोठ्या प्रमाणात रोकडचा सामना करावा लागत असल्याने  टार्गेटेड लॉँगटर्म रेपो ऑपरेशन (टीएलटीआरओ २.०) जाहीर केले गेले. ग्रामीण भागातील कर्ज आणि एनबीएफसी इत्यादींसाठी नाबार्ड, सिडबी, एनएचबीची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. कोविड १९ च्या संकटामुळे या संस्थांना मार्केटमधून कर्ज मिळणे अवघड आहे, म्हणून नाबार्ड, एसआयडीबीआय, एनएचबी यांना ५० हजार कोटींची अतिरिक्त पुनर्वित्त सुविधा दिली जात आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

२० लाख कोटींमध्ये शून्य किती?; अनुपम खेर यांनी सांगितलं गणित तर अर्थमंत्र्यांचीही झाली चूक

...तर आपण विश्वासार्ह जागतिक शक्ती बनू; मोदींच्या महापॅकेजचं उद्योगजगताकडून कौतुक

स्वावलंबी भारताचा निर्धार, २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज;  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

भारतावर थेट हल्ला करा,  पाकव्याप्त काश्मीरच्या पंतप्रधानांचे इम्रान खान यांना आवाहन

केंद्राने राज्यांना दिले ६१९५ कोटी रुपये, महाराष्ट्र मात्र अन्याय

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या