शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: …म्हणजे २० लाख कोटी नव्हे तर १४ लाख कोटी पॅकेजची होणार नवीन घोषणा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 08:45 IST

Coronavirus: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आर्थिक पॅकेजची घोषणा केली पण या पॅकेजमध्ये अर्थमंत्री आणि आरबीआयकडून याआधी केलेल्या घोषणाही समाविष्ट आहेत

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केलीतत्पूर्वी ६ लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा यापूर्वीच झाली आहेउर्वरित १४ लाख कोटींबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारमण घोषणा करतील

नवी दिल्ली – कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करताना २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. स्वावलंबी भारत असं या पॅकेजला नाव देण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाचा सामना करण्यासाठी घोषित केलेले २० लाख कोटी रुपये हे आतापर्यंतचं सर्वात मोठं आर्थिक पॅकेज आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आर्थिक पॅकेजची घोषणा केली पण या पॅकेजमध्ये अर्थमंत्री आणि आरबीआयकडून याआधी केलेल्या घोषणाही समाविष्ट आहेत. त्यामुळे उर्वरित पॅकेज किती कोटींचे असेल याची उत्सुकता सर्वांना आहे. आतापर्यंत रिझर्व्ह बँकेने दोन टप्प्यात सुमारे ४.२५ लाख कोटी रुपयांचे आर्थिक मदत पॅकेज जाहीर केले आहे. पहिल्यांदा २७ मार्च रोजी रिझर्व्ह बँकेने रोख वाढीसाठी अनेक उपायांची घोषणा केली आणि रेपो दरात ७५ बेसिस पॉईंटने मोठी कपात करण्याची घोषणा केली. सीआरआर ४ वरून ३ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला.

पहिले टार्गेटेड लाँग टर्म रेपो ऑपरेशन (TLTRO) द्वारे प्रणालीमध्ये १ लाख कोटींचा रोख प्रवाहाबद्दल सांगितलं होतं. यात सुमारे ३.७४ लाख कोटी रुपयांची रोकड यंत्रणेत येईल असं म्हणाले. १७ एप्रिल रोजी रिझर्व्ह बँकेने पुन्हा ५० हजार कोटींचा रोख प्रवाह वाढवण्यासाठी उपाययोजना केल्या. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीही १.७ लाख रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केली होती, ज्यात गरीब कल्याण योजनेंतर्गत गरिबांना मदत केल्याचे सांगण्यात आले.

अशाप्रकारे ५.९४ लाख कोटी म्हणजे जवळपास ६ लाख कोटी आर्थिक पॅकेजची घोषणा यापूर्वीच केली आहे. पहिल्यांदा केलेल्या आर्थिक पॅकेजची मदत पुढील प्रमाणे आहे.

१) गरीब कल्याण योजना पॅकेज

केंद्र सरकारने गरीब कल्याण योजनेंतर्गत १.७ लाख कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले. त्याअंतर्गत थेट गरिबांच्या खात्यावर पैसे पाठविले जात आहेत.

२) टीएलटीआरओ १

२७ मार्च रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. रिझर्व्ह बँकेने सीआरआरमध्ये कपात केली होती आणि पहिल्या टार्गेटेड लाँग टर्म रेपो ऑपरेशन (टीएलटीआरओ) जाहीर केले होते, ज्यात प्रणालीत ३.७४ लाख कोटी रुपयांची रोकड आणली जात असल्याचे सांगितले जात होते.

रिव्हर्स रेपो दरात २५ बेस पॉईंटने कपात केली आहे. आता रिव्हर्स रेपो दर ४% वरुन ३.७५% पर्यंत खाली आला आहे. रिव्हर्स रेपो दर कपातीचा फायदा बँकांना होईल. बँकांना कर्ज मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने टीएलटीआरओ १ अन्वये बँकिंग प्रणालीत १ लाख कोटी रुपयांची रोख रक्कम जमा करण्याची घोषणा केली होती.

यानंतर १७ एप्रिल रोजी रिझर्व्ह बँकेने पुन्हा अनेक घोषणा केल्या. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, कोविड १९ मुळे छोट्या आणि मध्यम कॉर्पोरेट्सना मोठ्या प्रमाणात रोकडचा सामना करावा लागत असल्याने  टार्गेटेड लॉँगटर्म रेपो ऑपरेशन (टीएलटीआरओ २.०) जाहीर केले गेले. ग्रामीण भागातील कर्ज आणि एनबीएफसी इत्यादींसाठी नाबार्ड, सिडबी, एनएचबीची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. कोविड १९ च्या संकटामुळे या संस्थांना मार्केटमधून कर्ज मिळणे अवघड आहे, म्हणून नाबार्ड, एसआयडीबीआय, एनएचबी यांना ५० हजार कोटींची अतिरिक्त पुनर्वित्त सुविधा दिली जात आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

२० लाख कोटींमध्ये शून्य किती?; अनुपम खेर यांनी सांगितलं गणित तर अर्थमंत्र्यांचीही झाली चूक

...तर आपण विश्वासार्ह जागतिक शक्ती बनू; मोदींच्या महापॅकेजचं उद्योगजगताकडून कौतुक

स्वावलंबी भारताचा निर्धार, २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज;  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

भारतावर थेट हल्ला करा,  पाकव्याप्त काश्मीरच्या पंतप्रधानांचे इम्रान खान यांना आवाहन

केंद्राने राज्यांना दिले ६१९५ कोटी रुपये, महाराष्ट्र मात्र अन्याय

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या