शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

Coronavirus: …म्हणजे २० लाख कोटी नव्हे तर १४ लाख कोटी पॅकेजची होणार नवीन घोषणा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 08:45 IST

Coronavirus: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आर्थिक पॅकेजची घोषणा केली पण या पॅकेजमध्ये अर्थमंत्री आणि आरबीआयकडून याआधी केलेल्या घोषणाही समाविष्ट आहेत

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केलीतत्पूर्वी ६ लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा यापूर्वीच झाली आहेउर्वरित १४ लाख कोटींबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारमण घोषणा करतील

नवी दिल्ली – कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करताना २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. स्वावलंबी भारत असं या पॅकेजला नाव देण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाचा सामना करण्यासाठी घोषित केलेले २० लाख कोटी रुपये हे आतापर्यंतचं सर्वात मोठं आर्थिक पॅकेज आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आर्थिक पॅकेजची घोषणा केली पण या पॅकेजमध्ये अर्थमंत्री आणि आरबीआयकडून याआधी केलेल्या घोषणाही समाविष्ट आहेत. त्यामुळे उर्वरित पॅकेज किती कोटींचे असेल याची उत्सुकता सर्वांना आहे. आतापर्यंत रिझर्व्ह बँकेने दोन टप्प्यात सुमारे ४.२५ लाख कोटी रुपयांचे आर्थिक मदत पॅकेज जाहीर केले आहे. पहिल्यांदा २७ मार्च रोजी रिझर्व्ह बँकेने रोख वाढीसाठी अनेक उपायांची घोषणा केली आणि रेपो दरात ७५ बेसिस पॉईंटने मोठी कपात करण्याची घोषणा केली. सीआरआर ४ वरून ३ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला.

पहिले टार्गेटेड लाँग टर्म रेपो ऑपरेशन (TLTRO) द्वारे प्रणालीमध्ये १ लाख कोटींचा रोख प्रवाहाबद्दल सांगितलं होतं. यात सुमारे ३.७४ लाख कोटी रुपयांची रोकड यंत्रणेत येईल असं म्हणाले. १७ एप्रिल रोजी रिझर्व्ह बँकेने पुन्हा ५० हजार कोटींचा रोख प्रवाह वाढवण्यासाठी उपाययोजना केल्या. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीही १.७ लाख रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केली होती, ज्यात गरीब कल्याण योजनेंतर्गत गरिबांना मदत केल्याचे सांगण्यात आले.

अशाप्रकारे ५.९४ लाख कोटी म्हणजे जवळपास ६ लाख कोटी आर्थिक पॅकेजची घोषणा यापूर्वीच केली आहे. पहिल्यांदा केलेल्या आर्थिक पॅकेजची मदत पुढील प्रमाणे आहे.

१) गरीब कल्याण योजना पॅकेज

केंद्र सरकारने गरीब कल्याण योजनेंतर्गत १.७ लाख कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले. त्याअंतर्गत थेट गरिबांच्या खात्यावर पैसे पाठविले जात आहेत.

२) टीएलटीआरओ १

२७ मार्च रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. रिझर्व्ह बँकेने सीआरआरमध्ये कपात केली होती आणि पहिल्या टार्गेटेड लाँग टर्म रेपो ऑपरेशन (टीएलटीआरओ) जाहीर केले होते, ज्यात प्रणालीत ३.७४ लाख कोटी रुपयांची रोकड आणली जात असल्याचे सांगितले जात होते.

रिव्हर्स रेपो दरात २५ बेस पॉईंटने कपात केली आहे. आता रिव्हर्स रेपो दर ४% वरुन ३.७५% पर्यंत खाली आला आहे. रिव्हर्स रेपो दर कपातीचा फायदा बँकांना होईल. बँकांना कर्ज मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने टीएलटीआरओ १ अन्वये बँकिंग प्रणालीत १ लाख कोटी रुपयांची रोख रक्कम जमा करण्याची घोषणा केली होती.

यानंतर १७ एप्रिल रोजी रिझर्व्ह बँकेने पुन्हा अनेक घोषणा केल्या. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, कोविड १९ मुळे छोट्या आणि मध्यम कॉर्पोरेट्सना मोठ्या प्रमाणात रोकडचा सामना करावा लागत असल्याने  टार्गेटेड लॉँगटर्म रेपो ऑपरेशन (टीएलटीआरओ २.०) जाहीर केले गेले. ग्रामीण भागातील कर्ज आणि एनबीएफसी इत्यादींसाठी नाबार्ड, सिडबी, एनएचबीची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. कोविड १९ च्या संकटामुळे या संस्थांना मार्केटमधून कर्ज मिळणे अवघड आहे, म्हणून नाबार्ड, एसआयडीबीआय, एनएचबी यांना ५० हजार कोटींची अतिरिक्त पुनर्वित्त सुविधा दिली जात आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

२० लाख कोटींमध्ये शून्य किती?; अनुपम खेर यांनी सांगितलं गणित तर अर्थमंत्र्यांचीही झाली चूक

...तर आपण विश्वासार्ह जागतिक शक्ती बनू; मोदींच्या महापॅकेजचं उद्योगजगताकडून कौतुक

स्वावलंबी भारताचा निर्धार, २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज;  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

भारतावर थेट हल्ला करा,  पाकव्याप्त काश्मीरच्या पंतप्रधानांचे इम्रान खान यांना आवाहन

केंद्राने राज्यांना दिले ६१९५ कोटी रुपये, महाराष्ट्र मात्र अन्याय

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या