शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मन की बात : ''एक मुलगी दहा मुलांच्या बरोबरीची, महिला देशाचा गौरव वाढवत आहेत''

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2018 13:50 IST

मुंबईतील माटुंगा रेल्वे स्टेशनाच मोदींनी 'मन की बात'मध्ये उल्लेख केला.  देशातील माटुंगा स्टेशन हे एकमेव स्टेशन आहे, जिथे महिला सर्व काम सांभाळत आहेत, असं सांगत माटुंगा स्टेशनच्या कर्मचारी महिलांचा मोदींनी गौरव केला. 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (रविवारी) मन की बात कार्यक्रमातून देशवासियांसोबत संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी 'स्त्री शक्ती'चा गौरव केला आणि 'एक मुलगी दहा मुलांच्या बरोबरीची असते असं ते म्हणाले. नवीन वर्ष सुरू झाल्यानंतरची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही पहिलीच 'मन की बात' होती. ते म्हणाले, प्राचीन काळापासून सध्याच्या स्थितीपर्यंत अनेक महिलांनी देशाच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले आहे.  भारतात आज महिला सर्वच क्षेत्रात पुढे जात आहेत आणि देशाचा गौरव वाढवत आहेत. नारी शक्ती नेहमीच देश, समाज आणि कुटुंब एकतेच्या सुत्रात बांधले आहे. देशात प्रचीन काळापासून महिलांना सन्मान दिला जात आहे.अंतराळवीर कल्पना चावलाचा उल्लेख यावेळी मोदींनी केला. मोदींनी  प्रकाश त्रिपाठी यांचे आभार मानले कारण, त्यांनी महिला शक्तीचे उदाहरण देताना लिहिलेल्या पत्रात भारतीय वंशाच्या अंतराळवीर कल्पना चावला यांचा उल्लेख केला. मोदी म्हणाले, 1 फेब्रुवारीला कल्पना चावलाची पुण्यतिथी आहे. अंतराळातील दुर्घटनेत तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. ती आपल्यातून लवकर गेल्याचं दुःख आहे. कल्पना चावला भलेही आज आपल्यात नसेल. पण तिने देशाची मान उंचावली आहे. आज कल्पना अनेक मुलींची प्रेरणा बनललेली आहे, असं ते म्हणाले.  मुंबईतील माटुंगा रेल्वे स्टेशनाच मोदींनी 'मन की बात'मध्ये उल्लेख केला.  देशातील माटुंगा स्टेशन हे एकमेव स्टेशन आहे, जिथे महिला सर्व काम सांभाळत आहेत, असं सांगत माटुंगा स्टेशनच्या कर्मचारी महिलांचा मोदींनी गौरव केला. मोदी म्हणाले, भारतीय विदुषिंची परंपरा फार पुरातन राहिली आहे. वेदांच्या निर्मितीमध्ये त्यांचे योगदान मोठे होते. लोपमुद्रा आणि गार्गीचा आपण त्यासाठी नेहमीच उल्लेख करतो. आपण 'बेटी बचाओ' बद्दल बोलत असतो मात्र, वेदांमध्ये म्हटले आहे की एक मुलगी 10 मुलांच्या बरोबरीची असते.

टॅग्स :Man ki Baatमन की बातNarendra Modiनरेंद्र मोदी