शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

इराकमध्ये मृत पावलेल्या भारतीयांच्या कुटुंबीयांना सरकारकडून 10 लाखांची मदत जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 13:19 IST

38 जणांच्या मृतदेहांचे अवशेष काल भारतात आणण्यात आले.

इराकमध्ये आयसिसकडून मारल्या गेलेल्या 38 जणांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारकडून 10 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. पंतप्रधान मोदींनी याबद्दलची घोषणा केली आहे. इराकमधील मोसूल भागात आयसिस या दहशतवादी संघटनेने 39 भारतीयांची हत्या केली होती. यापैकी 38 जणांच्या मृतदेहांचे अवशेष काल (सोमवारी) भारतात आणण्यात आले. यासाठी परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग इराकला गेले होते. इराकमध्ये आयसिसच्या दहशतवाद्यांनी 2014 मध्ये 39 भारतीयांची हत्या केली होती. मारल्या गेलेल्या 39 पैकी एकाचे डीएनए जुळले नाहीत. त्यामुळे 38 जणांचे मृतदेह हवाई मार्गाने भारतात आणण्यात आले. यापैकी 27 जण पंजाबचे, तर चार जण हिमाचल प्रदेशचे रहिवासी होते. उर्वरित सात जण हे पश्चिम बंगाल आणि बिहारचे होते. इराकमध्ये मारल्या गेलेल्या 27 जणांच्या कुटुंबांना काल पंजाब सरकारने प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर केली. याशिवाय त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरीही दिली जाणार आहे. यानंतर आता केंद्र सरकारने मृत पावलेल्या सर्व व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाखांची मदत जाहीर केली आहे. इराकमध्ये मृत पावलेले 39 जण अवैधरित्या भारताबाहेर गेल्याची माहिती काल परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी प्रसारमाध्यमांना दिली. ट्रॅव्हल एजंटच्या माध्यमातून होणारा अवैध प्रवास रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रितपणे काम करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. मृतदेहांचे अवशेष भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारला इतका वेळ का लागला, असा यावेळी प्रश्न सिंग यांना विचारण्यात आला. याबद्दल बोलताना, अजूनही इराकमधील युद्ध पूर्णपणे संपलेले नाही, असे उत्तर त्यांनी दिले.  'इराकमध्ये युद्ध सुरु आहे. या युद्धादरम्यान त्यांच्या सैन्याला मृतदेहांचे अवशेष गाडलेल्या स्थितीत आढळून आले. त्यांचे केस मोठे होते. त्यावरुन ते पंजाबी असल्याची शक्यता निर्माण झाली. यावरुन पुढील तपास करण्यात आला आणि मृतदेहांच्या अवशेषांची ओळख पटली,' असे सिंग यांनी सांगितले.  

टॅग्स :ISISइसिसNarendra Modiनरेंद्र मोदी