शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

इराकमध्ये मृत पावलेल्या भारतीयांच्या कुटुंबीयांना सरकारकडून 10 लाखांची मदत जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 13:19 IST

38 जणांच्या मृतदेहांचे अवशेष काल भारतात आणण्यात आले.

इराकमध्ये आयसिसकडून मारल्या गेलेल्या 38 जणांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारकडून 10 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. पंतप्रधान मोदींनी याबद्दलची घोषणा केली आहे. इराकमधील मोसूल भागात आयसिस या दहशतवादी संघटनेने 39 भारतीयांची हत्या केली होती. यापैकी 38 जणांच्या मृतदेहांचे अवशेष काल (सोमवारी) भारतात आणण्यात आले. यासाठी परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग इराकला गेले होते. इराकमध्ये आयसिसच्या दहशतवाद्यांनी 2014 मध्ये 39 भारतीयांची हत्या केली होती. मारल्या गेलेल्या 39 पैकी एकाचे डीएनए जुळले नाहीत. त्यामुळे 38 जणांचे मृतदेह हवाई मार्गाने भारतात आणण्यात आले. यापैकी 27 जण पंजाबचे, तर चार जण हिमाचल प्रदेशचे रहिवासी होते. उर्वरित सात जण हे पश्चिम बंगाल आणि बिहारचे होते. इराकमध्ये मारल्या गेलेल्या 27 जणांच्या कुटुंबांना काल पंजाब सरकारने प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर केली. याशिवाय त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरीही दिली जाणार आहे. यानंतर आता केंद्र सरकारने मृत पावलेल्या सर्व व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाखांची मदत जाहीर केली आहे. इराकमध्ये मृत पावलेले 39 जण अवैधरित्या भारताबाहेर गेल्याची माहिती काल परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी प्रसारमाध्यमांना दिली. ट्रॅव्हल एजंटच्या माध्यमातून होणारा अवैध प्रवास रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रितपणे काम करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. मृतदेहांचे अवशेष भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारला इतका वेळ का लागला, असा यावेळी प्रश्न सिंग यांना विचारण्यात आला. याबद्दल बोलताना, अजूनही इराकमधील युद्ध पूर्णपणे संपलेले नाही, असे उत्तर त्यांनी दिले.  'इराकमध्ये युद्ध सुरु आहे. या युद्धादरम्यान त्यांच्या सैन्याला मृतदेहांचे अवशेष गाडलेल्या स्थितीत आढळून आले. त्यांचे केस मोठे होते. त्यावरुन ते पंजाबी असल्याची शक्यता निर्माण झाली. यावरुन पुढील तपास करण्यात आला आणि मृतदेहांच्या अवशेषांची ओळख पटली,' असे सिंग यांनी सांगितले.  

टॅग्स :ISISइसिसNarendra Modiनरेंद्र मोदी