शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

जम्मू-काश्मीरच्या विशेष दर्जाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2017 14:46 IST

जम्मू- काश्मीरला मिळालेल्या विशेष दर्जाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरला कलम 35 नुसार विशेष दर्जा देण्यात आला आहे.

ठळक मुद्देजम्मू-काश्मीरला कलम 35 नुसार विशेष दर्जा देण्यात आला आहे. यानुसार जम्मू- काश्मीरमधील नागरिकांना स्थायी नागरिकत्व मिळते. याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए एम खानविलकर आणि दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने हे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करण्याचे संकेत दिले आहेत. चारूवली खुराणा यांनी कलम 35 अ रद्द करण्यासाठी केलेल्या याचिकेची सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि ए एम खानविलकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

नवी दिल्ली, दि. 14 - जम्मू- काश्मीरला मिळालेल्या विशेष दर्जाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरला कलम 35 नुसार विशेष दर्जा देण्यात आला आहे. यानुसार जम्मू- काश्मीरमधील नागरिकांना स्थायी नागरिकत्व मिळते. याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए एम खानविलकर आणि दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने हे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करण्याचे संकेत दिले आहेत. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे या याचिका वर्ग करता येतील असे मत सुप्रीम कोर्टाने मांडले आहे. चारूवली खुराणा यांनी कलम 35 अ रद्द करण्यासाठी केलेल्या याचिकेची सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि ए एम खानविलकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. तीन सदस्यीय खंडपीठाकडे याप्रकरणाची आधीच सुनावणी सुरु आहे. त्यामुळे सुरू असलेल्या सर्व याचिका एकत्र करुन पाच सदस्यीस घटनापीठाकडे सुनावणी घेता येईल. पण यासाठी तीन सदस्यीय खंडपीठालाच शिफारस करता येईल असे न्यायमूर्तींनी सांगितले. कायद्यात त्रुटी असतील तर ते प्रकरण घटनापीठाकडे जाऊ शकेल असेही त्यांनी नमूद केले.काय होतं याचिकाकर्त्यांचं म्हणणं --35 अमध्ये लैंगिक भेदभाव, संविधानातील मूलभूत हक्कांचे उल्लंघन होते. -संविधानात स्त्री-पुरुषांना समान हक्क , पण 35 अ मध्ये पुरुषांना जास्त अधिकार मिळतात. -35 अ मध्ये जम्मू-काश्मीरमधील महिलेने परराज्यातील पुरुषाशी लग्न केल्यास ती जम्मू-काश्मीरची नागरिक राहत नाही. तिला राज्यात जागा विकत घेता येत नाही, राज्यात नोकरी मिळत नाही तसेच राज्यात मतदानाचा हक्कही तिला मिळत नाही. -याऊलट राज्यातील पुरुषाने परराज्यातील महिलेशी लग्न केल्यास त्या महिलेला जम्मू-काश्मीरमध्ये नागरिकत्व मिळते आणि तिलादेखील विशेष अधिकार प्राप्त होतात याकडे याचिकाकर्त्यांनी लक्ष वेधले होते.