शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
4
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
5
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
6
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
7
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
8
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
9
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
10
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
11
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
12
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
13
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
15
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
16
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
17
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
18
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
19
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
20
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे

बोलण्याचे स्वातंत्र्य देणाऱ्या संस्थांवर सुनियोजित हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 06:38 IST

काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा आरोप

केंब्रिज (ब्रिटन) : भारतातील लोकांना बोलण्याचे स्वातंत्र्य देणाऱ्या संस्थांवर सुनियोजित हल्ला होत आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी येथे केला. केंब्रिज विद्यापीठाच्या कॉर्पस क्रिस्टी कॉलेजमध्ये आयोजित इंडिया ॲट ७५ या कार्यक्रमात ते बोलत होते. 

यावेळी राहुल गांधी यांनी विद्यार्थी आणि विशेषत: मूळ भारतीय विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. हिंदू राष्ट्रवाद, काँग्रेस पक्षात गांधी कुटुंबाची भूमिका आणि देशातील लोकांना एकत्रित करण्याचे प्रयत्न या विषयावर त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, आमच्यासाठी भारत तेव्हा जिवंत होतो, जेव्हा भारत बोलत असतो. जेव्हा हा देश गप्प होतो, तेव्हा तो नीरस होतो. संसद, निवडणूक प्रणाली, लोकशाहीची पायाभूत रचना यावर एका संघटनेकडून ताबा मिळविला जात आहे. या मुद्द्यावरुन राहुल गांधी यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्यावर टीकाही केली. (वृत्तसंस्था)

तो धडा देणारा मोठा अनुभव तीन दशकांपूर्वी वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा एका हल्ल्यात मृत्यू झाला. माझ्यासाठी धडा देणारा जीवनातील हा सर्वात मोठा अनुभव होता, असेही राहुल गांधी म्हणाले. या घटनेनंतर मला ज्या गोष्टी शिकायला मिळाल्या, त्या बहुधा मी कधीच शिकू शकलो नसतो. एक मुलगा म्हणून मी वडिलांना गमावलो होतो, हे खूपच दु:खद होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी