शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या सीमांचा अधिकृत इतिहास लिहिण्याची योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 06:03 IST

भारताच्या सीमांचा अधिकृत इतिहास लिहिण्याची संरक्षण मंत्रालयाची योजना

नवी दिल्ली : भारताच्या सीमांचा अधिकृत इतिहास लिहिण्याची संरक्षण मंत्रालयाची योजना असून, संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी हे काम सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. सर्वंकष स्वरूपाचा हा इतिहास येत्या दोन वर्षांत लिहून पूर्ण होणे अपेक्षित आहे.संरक्षण मंत्रालयाने ही माहिती देताना एका निवेदनात म्हटले : भारताच्या सीमा कशा ठरविल्या गेल्या व त्यात वेळोवेळी कसे बदल होत गेले, यासह सीमेसंबंधीच्या सर्व पैलूंचा आंतर्भाव करून हे इतिहास लेखन करण्याचा प्रस्ताव आहे. सीमांच्या संदर्भात सुरक्षा दलांची भूमिका, तसेच सीमा भागांमधील लोकांची वांशिक पृष्ठभूमी, जीवनशैली, संस्कृती यांचाही यात समावेश असेल. यासंदर्भात राजनाथसिंग यांनी मंगळवारी भारतीय इतिहास संशोधन परिषद, नेहरू स्मृती संग्रहालय व ग्रंथालय, पुरातत्त्व महासंचालनालय आणि संरक्षण, गृह व परराष्ट्र व्यवहार या मंत्रालयातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.सर्वसामान्य नागरिकांना व खास करून सरकारमधील अधिकाऱ्यांना देशाच्या सीमा व तेथील परिस्थितीचे वस्तुनिष्ठ ज्ञान व्हावे यासाठी हे इतिहास लेखन महत्त्वाचे आहे, यावर संरक्षणमंत्र्यांनी भर दिला. यासाठी सूचनांचे स्वागत केले जाईल, असे सांगून त्यांनी अधिकाºयांना निर्देश दिले की, या इतिहास लेखनासाठी कोणत्या संदर्भसाधनांचा उपयोग करावा, त्यासाठी कोणती पद्धत वापरावी, ढोबळ रूपरेखा काय असावी व याचे कसे नियोजन करावे, यासंदर्भात अधिकाºयांनी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घ्यावे.>पाक, चीनला लागून असलेल्या सीमांचा वादभारताच्या खासकरून पाकिस्तान व चीनला लागून असलेल्या सीमा हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे व सीमांची नेमकी आखणी कशी व कुठे आहे, याविषयी एकवाक्यता नसल्याने तंटे-बखेडे होत असतात. जम्मू-काश्मीरची सीमा हा तर मोठ्या संघर्षाचा विषय बनला आहे. चीननेही भारताच्या हद्दीत घुसखोरी केल्याच्या बातम्या अधूनमधून येत असतात. या घडामोडींचे सामान्य नागरिकांना नीट आकलन व्हावे यासाठी हा इतिहास उपयुक्त ठरेल.