शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
2
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
3
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
4
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
5
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
6
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
7
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
8
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
9
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
10
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
11
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
12
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
13
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
14
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
15
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
16
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
17
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
18
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
19
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
20
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास

भारताच्या सीमांचा अधिकृत इतिहास लिहिण्याची योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 06:03 IST

भारताच्या सीमांचा अधिकृत इतिहास लिहिण्याची संरक्षण मंत्रालयाची योजना

नवी दिल्ली : भारताच्या सीमांचा अधिकृत इतिहास लिहिण्याची संरक्षण मंत्रालयाची योजना असून, संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी हे काम सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. सर्वंकष स्वरूपाचा हा इतिहास येत्या दोन वर्षांत लिहून पूर्ण होणे अपेक्षित आहे.संरक्षण मंत्रालयाने ही माहिती देताना एका निवेदनात म्हटले : भारताच्या सीमा कशा ठरविल्या गेल्या व त्यात वेळोवेळी कसे बदल होत गेले, यासह सीमेसंबंधीच्या सर्व पैलूंचा आंतर्भाव करून हे इतिहास लेखन करण्याचा प्रस्ताव आहे. सीमांच्या संदर्भात सुरक्षा दलांची भूमिका, तसेच सीमा भागांमधील लोकांची वांशिक पृष्ठभूमी, जीवनशैली, संस्कृती यांचाही यात समावेश असेल. यासंदर्भात राजनाथसिंग यांनी मंगळवारी भारतीय इतिहास संशोधन परिषद, नेहरू स्मृती संग्रहालय व ग्रंथालय, पुरातत्त्व महासंचालनालय आणि संरक्षण, गृह व परराष्ट्र व्यवहार या मंत्रालयातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.सर्वसामान्य नागरिकांना व खास करून सरकारमधील अधिकाऱ्यांना देशाच्या सीमा व तेथील परिस्थितीचे वस्तुनिष्ठ ज्ञान व्हावे यासाठी हे इतिहास लेखन महत्त्वाचे आहे, यावर संरक्षणमंत्र्यांनी भर दिला. यासाठी सूचनांचे स्वागत केले जाईल, असे सांगून त्यांनी अधिकाºयांना निर्देश दिले की, या इतिहास लेखनासाठी कोणत्या संदर्भसाधनांचा उपयोग करावा, त्यासाठी कोणती पद्धत वापरावी, ढोबळ रूपरेखा काय असावी व याचे कसे नियोजन करावे, यासंदर्भात अधिकाºयांनी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घ्यावे.>पाक, चीनला लागून असलेल्या सीमांचा वादभारताच्या खासकरून पाकिस्तान व चीनला लागून असलेल्या सीमा हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे व सीमांची नेमकी आखणी कशी व कुठे आहे, याविषयी एकवाक्यता नसल्याने तंटे-बखेडे होत असतात. जम्मू-काश्मीरची सीमा हा तर मोठ्या संघर्षाचा विषय बनला आहे. चीननेही भारताच्या हद्दीत घुसखोरी केल्याच्या बातम्या अधूनमधून येत असतात. या घडामोडींचे सामान्य नागरिकांना नीट आकलन व्हावे यासाठी हा इतिहास उपयुक्त ठरेल.