शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

'काही नुकसान होईल, पण भारत...' अमेरिका-इराण संघर्षावर पियुष गोयल यांची महत्वाची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 13:54 IST

US-Iran तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतात LPG टंचाईची भीती? केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले...

Piyush Goyal On Fuel Crisis : अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे जागतिक स्तरावर अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या संघर्षामुळे तेल-गॅस बाजारावर गंभीर परिणाम पडला असून, अनेक देशांमध्ये ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. भारतातही एलपीजी (LPG) पुरवठा खंडित होईल, या भीतीने नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात सिलेंडर बुकिंग केली जात आहेत. मात्र, केंद्र सरकारने देशात तेल आणि गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे. 

मी ज्योतिषी नाही, पण भारत सक्षम- पीयूष गोयल

एका वृत्त वाहिनीच्या पुरस्कार समारंभात बोलताना केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी भारतात कोणतेही मोठे इंधन संकट उद्भवणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, अमेरिका-इराण संघर्षामुळे भारताला अल्पकालीन आर्थिक परिणाम सहन करावे लागू शकतात. मात्र देशाची अर्थव्यवस्था मजबूत असून, भारत या आव्हानांवर मात करेल. सध्या युद्धाची परिस्थिती आहे. मी ज्योतिषी नाही, त्यामुळे हे युद्ध किती काळ चालेल हे सांगू शकत नाही. मात्र भारतातील लोकांना माहिती आहे की, हे एक आव्हान आहे आणि आपण ते नक्की पार करू.

भारतात तेल संकटाची शक्यता नाही

जागतिक ऊर्जा संकटाबाबत बोलताना गोयल यांनी भारतात तेलाचा मोठा तुटवडा निर्माण होईल, या शक्यतेला नकार दिला. त्यांनी सांगितले की, देशाकडे कच्चे तेल, पेट्रोल, डिझेल आणि एव्हिएशन टर्बाइन फ्यूल (ATF) यांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. भारतीय रुपयावर दबाव येत असल्याच्या चर्चेबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. युद्धामुळे काही काळ आर्थिक क्रियाकलापांवर परिणाम होऊ शकतो, परंतु पुढील काही महिन्यांत त्याची भरपाई केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

LPG पुरवठ्याबाबत सरकारचे स्पष्टीकरण

भारतामध्ये एलपीजी टंचाई निर्माण होईल का? या प्रश्नावर पीयूष गोयल यांनी स्पष्ट केले की, एलपीजी पुरवठ्यात काही विलंब झाल्यास सरकारने केरोसिन उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच भारत विविध देशांकडून आयात करून LPG आणि LNG ची गरज पूर्ण करत आहे. त्यांनी सांगितले की, भारतात गॅसची खेप पोहोचण्यासाठी साधारणतः तीन ते चार दिवस लागतात आणि जास्तीत जास्त सात दिवसांत पुरवठा होऊ शकतो.

भारत पुढील दोन दशके वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था

सध्याची भू-राजकीय परिस्थिती भारतासाठी एक इशारा असला तरी, भारताने प्रत्येक संकटाला संधीमध्ये बदलण्याची क्षमता दाखवली आहे, असेही गोयल म्हणाले. त्यांनी विश्वास व्यक्त केला की, पुढील किमान दोन दशके भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक राहील. 

English
हिंदी सारांश
Web Title : India resilient despite US-Iran tension: Piyush Goyal assures fuel security.

Web Summary : Piyush Goyal allayed fears of an Indian fuel crisis amid US-Iran tensions. He acknowledged potential short-term impacts but asserted India's economic strength and sufficient oil, gas reserves. LPG supply delays are manageable with increased kerosene production and diversified imports. India remains a fast-growing economy.
टॅग्स :piyush goyalपीयुष गोयलUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरFuel Crisisइंधन टंचाई