शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

Budget 2019: नोकरदारांना निवडणूक लाभणार, इन्कम टॅक्समध्ये मोठी सवलत मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 11:47 IST

मोदी सरकारच्या अंतरिम बजेटमध्ये अनेक घोषणा होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देमोदी सरकारच्या अंतरिम बजेटमध्ये अनेक घोषणा होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पातून कृषी क्षेत्रातील संकटाला दूर लोटण्यासह मध्यमवर्गाला करातून दिलासा देण्याचा सरकार प्रयत्न करणार मोदी सरकारसमोर येत्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवण्याचं मोठं आव्हान आहे.

नवी दिल्ली- मोदी सरकारच्या अंतरिम बजेटमध्ये अनेक घोषणा होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पातून कृषी क्षेत्रातील संकटाला दूर लोटण्यासह मध्यमवर्गाला करातून दिलासा देण्याचा सरकार प्रयत्न करणार आहे. खरं तर मोदी सरकारसमोर येत्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवण्याचं मोठं आव्हान आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांसह मध्यमवर्गाला चुचकारण्यासाठी सरकार मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे.  

  • करात मिळणार सूट, पण कशी ?

करातून कशा पद्धतीनं सवलत दिली जाईल, याची रूपरेषा अद्यापही मोदी सरकारनं स्पष्ट केलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, 1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या 2019-20 अर्थसंकल्पातून करात सवलत मिळण्याची शक्यता आहे. मोदी सरकार पुन्हा सत्तेत आलं, तर करातून दिलेल्या सवलतीला कालावधी वाढवण्यात येणार आहे. 

  • कोणता पर्याय स्वीकारणार सरकार ?

हंगामी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल अर्थसंकल्पातील भाषणात सरकारच्या पुढील वाटचालीचे सूतोवाच करू शकतात. करातून सवलत देण्यासाठी गोयल करांच्या टप्प्यात बदल करतील, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच  मानक कपातीची मर्यादा 40 हजार रुपयांपेक्षा जास्त करण्याची शक्यता आहे. वैद्यकीय विम्यातही सरकार सूट देऊ शकते. 

  • अरुण जेटलींनी दिले होते संकेत

मोदी सरकारच्या या अर्थसंकल्पात मोठ मोठ्या घोषणा होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. परंतु हे अंतरिम बजेट असल्यानं काही घोषणा मोदी सरकार शेवटच्या बजेटमध्येही करण्याची शक्यता आहे. उपचारासाठी केंद्रीय अर्थमंत्री अमेरिकेला गेले आहेत. अमेरिकेतूनच त्यांनी याचे संकेत दिले आहेत. सरकार अर्थव्यवस्थेतील आव्हानांचा सामना करण्यासाठी ठोस पावलं उचलू शकते. त्यामुळेच कृषी क्षेत्राचा अर्थव्यवस्थेवर पडणाऱ्या प्रभावाचा विचार करता समस्या सोडवण्यासाठी अर्थसंकल्पात अनेक तरतुदी करण्याला प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे.  

  • सरकारला हे मुद्दे ठरणार अडचणीचे

गेल्या वेळीच्या अर्थसंकल्पातही कर रचनेत बदल होण्याची मोठी आशा होती. परंतु त्यावेळी तसा कोणताच बदल करण्यात आलेला नव्हता. आयुष्यमान भारत सारख्या विशाल योजना चालवण्यासाठी सरकारला मोठ्या निधीची गरज आहे. अशातच जीएसटीमधूनही निर्धारित करवसुली होत नसल्यानं सरकारला या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. 

टॅग्स :Budget 2019अर्थसंकल्प 2019