शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

कामाचे तास संपल्याचं सांगत वैमानिकाचा उड्डाणास नकार, प्रवाशांवर बसने जयपूर - दिल्ली प्रवास करण्याची नामुष्की

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2017 13:02 IST

वैमानिकाने कामाचे तास संपले असल्याचं सांगत विमानाचं उड्डाण करण्यास नकार दिल्याने जयपूर - दिल्ली प्रवास करणा-या प्रवाशांवर बसने प्रवास करण्याचा नामुष्की ओढवली

ठळक मुद्देवैमानिकाचा कामाचे तास संपले असल्याचं सांगत विमान उड्डाण करण्यास नकार जयपूर - दिल्लीसाठी एलायन्स एअरलाइन्सने 40 प्रवासी प्रवास करणार होतेयानंतर काही प्रवाशांसाठी बसची सुविधा करण्यात आली आणि त्यांना दिल्लीला पोहोचवण्यात आलं

जयपूर - वैमानिकाने कामाचे तास संपले असल्याचं सांगत विमानाचं उड्डाण करण्यास नकार दिल्याने जयपूर - दिल्ली प्रवास करणा-या प्रवाशांवर बसने प्रवास करण्याचा नामुष्की ओढवली. एलायन्स एअरलाइन्स ही एअर इंडियाची मालकी असलेली कंपनी आहे. जयपूर - दिल्लीसाठी एलायन्स एअरलाइन्सने 40 प्रवासी प्रवास करणार होते. मात्र वैमानिकाने आपले कामाचे तास संपले असून, उड्डाण करणार नाही असं सांगितल्याने विमान उड्डाणच करु शकलं नाही. 

अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, यानंतर काही प्रवाशांसाठी बसची सुविधा करण्यात आली आणि त्यांना दिल्लीला पोहोचवण्यात आलं. उर्वरित प्रवाशांसाठी हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा करण्यात आली होती. त्यांना सकाळी दुस-या विमानाने दिल्लीला पाठवण्यात आलं.

'वैमानिकाचे कामाचे तास संपले असल्या कारणाने तो उड्डाण करु शकत नव्हता', अशी माहिती जयपूरमधील संगनेर विमानतळाचे संचालक जे एस बल्हारा यांनी दिली आहे. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) नियमांनुसार, सुरक्षेच्या कारणास्तव वैमानिकाच्या कामाचे तास वाढवले जाऊ शकत नाहीत.

'दिल्लीहून येणा-या वैमानिक आणि क्रू ने रात्रीच जयपूर ते दिल्ली विमानाचं (9I-644) उड्डाण करण अपेक्षित होतं. पण दिल्लीहून येणा-या विमानाला उशीर झाला आणि रात्री 1.30 वाजता जयपूरमध्ये विमानाचं लँडिंग झालं', अशी माहिती एअर इंडियाच्या एका कर्मचा-याने दिली आहे. डीजीसीएने आखून दिलेल्या नियमानुसार, वैमानिकाने आपल्या कामाचे तास वाढवू नयेत. यामुळेच वैमानिकाने मर्यादेपेक्षा जास्त काम करण्यास नकार देत उड्डाणाला नकार दिला. 

काही प्रवाशांची हॉटेलमध्ये सोय करण्यात आली, तर काहींना रस्ते मार्गाने दिल्ली पोहोचवण्यात आलं. उर्वरित प्रवाशांची सकाळच्या विमानाने दिल्लीला पोहोचण्याची सोय करण्यात आली.  

टॅग्स :Airportविमानतळ