शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

कामाचे तास संपल्याचं सांगत वैमानिकाचा उड्डाणास नकार, प्रवाशांवर बसने जयपूर - दिल्ली प्रवास करण्याची नामुष्की

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2017 13:02 IST

वैमानिकाने कामाचे तास संपले असल्याचं सांगत विमानाचं उड्डाण करण्यास नकार दिल्याने जयपूर - दिल्ली प्रवास करणा-या प्रवाशांवर बसने प्रवास करण्याचा नामुष्की ओढवली

ठळक मुद्देवैमानिकाचा कामाचे तास संपले असल्याचं सांगत विमान उड्डाण करण्यास नकार जयपूर - दिल्लीसाठी एलायन्स एअरलाइन्सने 40 प्रवासी प्रवास करणार होतेयानंतर काही प्रवाशांसाठी बसची सुविधा करण्यात आली आणि त्यांना दिल्लीला पोहोचवण्यात आलं

जयपूर - वैमानिकाने कामाचे तास संपले असल्याचं सांगत विमानाचं उड्डाण करण्यास नकार दिल्याने जयपूर - दिल्ली प्रवास करणा-या प्रवाशांवर बसने प्रवास करण्याचा नामुष्की ओढवली. एलायन्स एअरलाइन्स ही एअर इंडियाची मालकी असलेली कंपनी आहे. जयपूर - दिल्लीसाठी एलायन्स एअरलाइन्सने 40 प्रवासी प्रवास करणार होते. मात्र वैमानिकाने आपले कामाचे तास संपले असून, उड्डाण करणार नाही असं सांगितल्याने विमान उड्डाणच करु शकलं नाही. 

अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, यानंतर काही प्रवाशांसाठी बसची सुविधा करण्यात आली आणि त्यांना दिल्लीला पोहोचवण्यात आलं. उर्वरित प्रवाशांसाठी हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा करण्यात आली होती. त्यांना सकाळी दुस-या विमानाने दिल्लीला पाठवण्यात आलं.

'वैमानिकाचे कामाचे तास संपले असल्या कारणाने तो उड्डाण करु शकत नव्हता', अशी माहिती जयपूरमधील संगनेर विमानतळाचे संचालक जे एस बल्हारा यांनी दिली आहे. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) नियमांनुसार, सुरक्षेच्या कारणास्तव वैमानिकाच्या कामाचे तास वाढवले जाऊ शकत नाहीत.

'दिल्लीहून येणा-या वैमानिक आणि क्रू ने रात्रीच जयपूर ते दिल्ली विमानाचं (9I-644) उड्डाण करण अपेक्षित होतं. पण दिल्लीहून येणा-या विमानाला उशीर झाला आणि रात्री 1.30 वाजता जयपूरमध्ये विमानाचं लँडिंग झालं', अशी माहिती एअर इंडियाच्या एका कर्मचा-याने दिली आहे. डीजीसीएने आखून दिलेल्या नियमानुसार, वैमानिकाने आपल्या कामाचे तास वाढवू नयेत. यामुळेच वैमानिकाने मर्यादेपेक्षा जास्त काम करण्यास नकार देत उड्डाणाला नकार दिला. 

काही प्रवाशांची हॉटेलमध्ये सोय करण्यात आली, तर काहींना रस्ते मार्गाने दिल्ली पोहोचवण्यात आलं. उर्वरित प्रवाशांची सकाळच्या विमानाने दिल्लीला पोहोचण्याची सोय करण्यात आली.  

टॅग्स :Airportविमानतळ