शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कामाचे तास संपल्याचं सांगत वैमानिकाचा उड्डाणास नकार, प्रवाशांवर बसने जयपूर - दिल्ली प्रवास करण्याची नामुष्की

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2017 13:02 IST

वैमानिकाने कामाचे तास संपले असल्याचं सांगत विमानाचं उड्डाण करण्यास नकार दिल्याने जयपूर - दिल्ली प्रवास करणा-या प्रवाशांवर बसने प्रवास करण्याचा नामुष्की ओढवली

ठळक मुद्देवैमानिकाचा कामाचे तास संपले असल्याचं सांगत विमान उड्डाण करण्यास नकार जयपूर - दिल्लीसाठी एलायन्स एअरलाइन्सने 40 प्रवासी प्रवास करणार होतेयानंतर काही प्रवाशांसाठी बसची सुविधा करण्यात आली आणि त्यांना दिल्लीला पोहोचवण्यात आलं

जयपूर - वैमानिकाने कामाचे तास संपले असल्याचं सांगत विमानाचं उड्डाण करण्यास नकार दिल्याने जयपूर - दिल्ली प्रवास करणा-या प्रवाशांवर बसने प्रवास करण्याचा नामुष्की ओढवली. एलायन्स एअरलाइन्स ही एअर इंडियाची मालकी असलेली कंपनी आहे. जयपूर - दिल्लीसाठी एलायन्स एअरलाइन्सने 40 प्रवासी प्रवास करणार होते. मात्र वैमानिकाने आपले कामाचे तास संपले असून, उड्डाण करणार नाही असं सांगितल्याने विमान उड्डाणच करु शकलं नाही. 

अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, यानंतर काही प्रवाशांसाठी बसची सुविधा करण्यात आली आणि त्यांना दिल्लीला पोहोचवण्यात आलं. उर्वरित प्रवाशांसाठी हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा करण्यात आली होती. त्यांना सकाळी दुस-या विमानाने दिल्लीला पाठवण्यात आलं.

'वैमानिकाचे कामाचे तास संपले असल्या कारणाने तो उड्डाण करु शकत नव्हता', अशी माहिती जयपूरमधील संगनेर विमानतळाचे संचालक जे एस बल्हारा यांनी दिली आहे. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) नियमांनुसार, सुरक्षेच्या कारणास्तव वैमानिकाच्या कामाचे तास वाढवले जाऊ शकत नाहीत.

'दिल्लीहून येणा-या वैमानिक आणि क्रू ने रात्रीच जयपूर ते दिल्ली विमानाचं (9I-644) उड्डाण करण अपेक्षित होतं. पण दिल्लीहून येणा-या विमानाला उशीर झाला आणि रात्री 1.30 वाजता जयपूरमध्ये विमानाचं लँडिंग झालं', अशी माहिती एअर इंडियाच्या एका कर्मचा-याने दिली आहे. डीजीसीएने आखून दिलेल्या नियमानुसार, वैमानिकाने आपल्या कामाचे तास वाढवू नयेत. यामुळेच वैमानिकाने मर्यादेपेक्षा जास्त काम करण्यास नकार देत उड्डाणाला नकार दिला. 

काही प्रवाशांची हॉटेलमध्ये सोय करण्यात आली, तर काहींना रस्ते मार्गाने दिल्ली पोहोचवण्यात आलं. उर्वरित प्रवाशांची सकाळच्या विमानाने दिल्लीला पोहोचण्याची सोय करण्यात आली.  

टॅग्स :Airportविमानतळ