शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

पायलटने डबा धुवायला सांगितले; वादावादीमुळे एअर इंडियाच्या विमानाला दोन तास उशीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 15:46 IST

एअर इंडिया सरकारी विमान कंपनी आहे. या कंपनीविरोधात बऱ्याच तक्रारी येत असतात.

नवी दिल्ली : सोमवारी बंगळुरुहून कोलकाता जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला दोन तासांचा उशीर झाला. यामागचे कारणही क्षुल्लक होते. पायलटने विमानातील कर्मचाऱ्याला जेवणाचा डबा धुण्यास सांगितल्याचा राग आल्याने त्यांच्यात प्रवाशांसमोरच वादावादी झाली. याचे पर्यावसान धक्काबुक्कीमध्ये झाल्याने दुसरा पायलट आणि कर्मचारी शोधेपर्यंत विमानाला दोन तासांचा उशीर झाला. 

एअर इंडिया सरकारी विमान कंपनी आहे. या कंपनीविरोधात बऱ्याच तक्रारी येत असतात. कधी मागवलेला बर्गर उशिराने आल्याने विमानाला उशीर तर कधी तांत्रिक कारणे यामुळे ही विमानसेवा कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीतर विमानाच्या आसनक्षमतेपेक्षा तिकिटे वाटल्याचा हास्यास्पद प्रकार समोर आला होता. सोमवारची घटनाही सरकारी विमान कंपनीची प्रतिमा मलिन करणारीच ठरली. 

पायलटने डबा धुण्यास सांगितल्याचा राग पर्सर म्हणजेच हिशेब ठेवणाऱ्या अधिकाऱ्यास आला. यानंतर त्यांच्यामध्ये सुरु झालेला वाद थांबायचे नाव घेईना. प्रकरण हातघाईवर आले. प्रवाशांसमोरच त्यांच्यात धक्काबुक्की सुरु झाली. शेवटी क्रू मेंबरनी वरिष्ठांना या प्रकाराची माहिती दिल्याने दोघांना विमानातून खाली उतरविण्यात आले. मात्र, हे विमान उडविण्यासाठी एअर इंडियाकडे दुसरा पायलट आणि पर्सर नव्हता. त्यांची व्यवस्था करण्यात एअर इंडियाला दीड तास गेले. यानंतर विमानाने उड्डाण केले. 

या झालेल्या प्रकाराची चौकशी एअर इंडिया आणि डीजीसीए करत आहेत. चौकसी करणाऱ्या अधिकाऱ्याने सांगितले की, पायलटने घरून डबा आणला होता. तो त्याने गरम करण्यास दिला होता. डबा खाऊन झाल्यानंतर पायलटने त्याच कर्मचाऱ्याला डबा धुण्यास सांगितले. याला त्या कर्मचाऱ्याने नकार देताच वादाला तोंड फुटले. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाBengaluruबेंगळूर