शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

पायलटने डबा धुवायला सांगितले; वादावादीमुळे एअर इंडियाच्या विमानाला दोन तास उशीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 15:46 IST

एअर इंडिया सरकारी विमान कंपनी आहे. या कंपनीविरोधात बऱ्याच तक्रारी येत असतात.

नवी दिल्ली : सोमवारी बंगळुरुहून कोलकाता जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला दोन तासांचा उशीर झाला. यामागचे कारणही क्षुल्लक होते. पायलटने विमानातील कर्मचाऱ्याला जेवणाचा डबा धुण्यास सांगितल्याचा राग आल्याने त्यांच्यात प्रवाशांसमोरच वादावादी झाली. याचे पर्यावसान धक्काबुक्कीमध्ये झाल्याने दुसरा पायलट आणि कर्मचारी शोधेपर्यंत विमानाला दोन तासांचा उशीर झाला. 

एअर इंडिया सरकारी विमान कंपनी आहे. या कंपनीविरोधात बऱ्याच तक्रारी येत असतात. कधी मागवलेला बर्गर उशिराने आल्याने विमानाला उशीर तर कधी तांत्रिक कारणे यामुळे ही विमानसेवा कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीतर विमानाच्या आसनक्षमतेपेक्षा तिकिटे वाटल्याचा हास्यास्पद प्रकार समोर आला होता. सोमवारची घटनाही सरकारी विमान कंपनीची प्रतिमा मलिन करणारीच ठरली. 

पायलटने डबा धुण्यास सांगितल्याचा राग पर्सर म्हणजेच हिशेब ठेवणाऱ्या अधिकाऱ्यास आला. यानंतर त्यांच्यामध्ये सुरु झालेला वाद थांबायचे नाव घेईना. प्रकरण हातघाईवर आले. प्रवाशांसमोरच त्यांच्यात धक्काबुक्की सुरु झाली. शेवटी क्रू मेंबरनी वरिष्ठांना या प्रकाराची माहिती दिल्याने दोघांना विमानातून खाली उतरविण्यात आले. मात्र, हे विमान उडविण्यासाठी एअर इंडियाकडे दुसरा पायलट आणि पर्सर नव्हता. त्यांची व्यवस्था करण्यात एअर इंडियाला दीड तास गेले. यानंतर विमानाने उड्डाण केले. 

या झालेल्या प्रकाराची चौकशी एअर इंडिया आणि डीजीसीए करत आहेत. चौकसी करणाऱ्या अधिकाऱ्याने सांगितले की, पायलटने घरून डबा आणला होता. तो त्याने गरम करण्यास दिला होता. डबा खाऊन झाल्यानंतर पायलटने त्याच कर्मचाऱ्याला डबा धुण्यास सांगितले. याला त्या कर्मचाऱ्याने नकार देताच वादाला तोंड फुटले. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाBengaluruबेंगळूर