शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

PIB : ... तर पत्रकारांची सरकारी मान्यता रद्द, ऑनलाईन प्लॅटफॉर्मंनाही PIB ची परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 09:17 IST

नवीन धोरणानुसार भारताचे सार्वभौमत्वता, अखंडता आणि राज्यांना सुरक्षेला बाधा पोहोचविणारे काम करणारे पत्रकार त्यांची सरकारी मान्यता गमावू शकतात.

नवी दिल्ली - जागतिक प्रेस स्वतंत्रता यादीतील 180 देशांत 142 व्या स्थानावर असलेल्या भारताने देशाच्या सुरक्षेविरुद्ध काम करणाऱ्या पत्रकारांची सरकारी मान्यता काढून घेण्याची घोषणा केली. केंद्र सरकारने नवीन कायद्यान्वये भारताची सार्वभौमत्वता आणि अखंडता अबाधित ठेवण्यासाठी देशाच्या सुरक्षेविरुद्ध आशय पसरवणाऱ्या पत्रकारांची सरकारी मान्यता काढून टाकण्याचे जाहीर केले आहे. पीआयबीने नवीन मान्यतेची घोषणा केली असून केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने यासंदर्भातील धोरण निती ठरवली आहे. 

नवीन धोरणानुसार भारताचे सार्वभौमत्वता, अखंडता आणि राज्यांना सुरक्षेला बाधा पोहोचविणारे काम करणारे पत्रकार त्यांची सरकारी मान्यता गमावू शकतात. यापूर्वी 2013 मध्ये जारी केलेल्या धोरणानुसार दंडाचा उल्लेख करण्यात आला नव्हता. गत धोरणात नियमांचे उल्लंघन केल्यास निलंबित केले जाईल, असे म्हटले होते. तसेच, गंभीर गुन्ह्यातील दोषी आढळणाऱ्या पत्रकारांची मान्यता रद्द करण्यात येणार होती. मान्यता निलंबनाच्या अटींमध्ये, खोटा प्रसार करणे, गैर पत्रकारिता कृत्यांचा सहभाग होता. त्यामध्ये, सोशल मीडिया, व्हिसिटींग कार्ड आणि लेटरहेड इत्यादींवर भारत सरकार असा उल्लेख करण्यास बंदी घालण्यात आली होती. 

मान्यता देण्यात आलेल्या पत्रकारांना दिल्लीत सरकारी कार्यालयात पोहोचण्याची परवानगी देण्यात येते. तसेच, राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या उपस्थितीतील अनेक कार्यक्रमांच्या प्रवेशासाठी ही मान्यता बंधनकारक असते. नवीन धोरणानुसार ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर काम करणारे पत्रकारही मान्यतेसाठी पात्र असणार आहेत. त्यामध्ये, सदरचा प्लॅटफॉर्म 1 वर्षांपेक्षा अधिक काळ सक्रिय असला पाहिजे. दरमहा 10 ते 50 लाख युनिक व्हिसीटर्सची वेबसाईट एका पत्रकाराची मान्यता प्राप्त करू शकते. तर, दरमहा 1 कोटींपेक्षा अधिक युनिक व्हिसीटर्स असलेल्या मीडिया प्लॅटफॉर्मच्या 4 पत्रकारांना मान्यता मिळेल. सद्यस्थिती पीआयबीकडे 2457 मान्यता प्राप्त पत्रकार आहेत. नामांकित मीडिया संस्थांशिवाय 15 वर्षांपेक्षा अधिक काळ अनुभव असलेले फ्री लान्स पत्रकारिता करणारेही आहेत. तसेच, 65 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले आणि 30 ते 35 वर्षांचा अनुभव असणारेही पत्रकार आहेत. 

टॅग्स :delhiदिल्लीJournalistपत्रकारInformation & broadcasting ministryमाहिती व प्रसारण मंत्रालय