शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

Petrol : निवडणुका झाल्या आता दरवाढ कधी?, पेट्रोलियममंत्र्यांनी संसदेत दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 16:52 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 4 नोव्हेंबर 2021 रोजी देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले.

मुंबई - पाच राज्यांमधील निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या 5 पैकी 4 राज्यात भाजपला चांगलं यशही मिळालं. या कालावधीत गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर स्थिर होते. युक्रेन-रशियामध्ये सुरू झालेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर वाढले. मात्र भारतात इंधनाच्या दरात वाढ झाली नाही. त्यामुळे, निवडणूक निकालानंतर आता पेट्रोल-डिझेलचे दर वाढतील, अशी चर्चा होत आहे. विशेष म्हणजे, संसदेतही विरोधी पक्षाच्या खासदारांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यास, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी उत्तर दिलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 4 नोव्हेंबर 2021 रोजी देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले. मात्र, 9 राज्यांनी त्यांच्या राज्यात हे दर कमी केले नाहीत. ग्राहकांवर सातत्याने वाढत असलेला आर्थिक भार कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सरकार, तेल कंपन्या सतत रुसी संघ आणि नवीन बाजारात संवाद साधत आहे. त्यातूनच, लवकर नवे बाजार खुले होतील आणि नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळेल, असे हरदीपसिंग पुरी यांनी म्हटलं. 

काँग्रेस खासदार छाया वर्मा यांनी राज्यसभेत सरकारवर निशाणा साधला होता. सरकारच तेलाचे भाव ठवरत असून निवडणूक आली की भाव कमी होतात आणि निकाल लागल्यानंतर ते वाढतात, आता कधी वाढणार?, असा प्रश्न त्यांनी विचारला होता. त्यावर, तेलाचे भाव सरकार ठरवत नसून आंतरराष्ट्रीय तेलाच्या किंमतींच्या आधारे तेल कंपन्या हे दर ठरवतात, असे पुरी यांनी सांगितले. तसेच, भारत देशात पाचही वर्षे निवडणुकाच असतात. त्यामुळे, निवडणुकांवेळी तेलाचे भाव कमी केले जातात हे म्हणणं चुकीचं आहे. नुकत्याच निवडणुका संपत आल्या आहेत, आता, पुढील वर्षाच्या सुरुवातीलाही निवडणुका आहेत, असे उत्तर पुरी यांनी लोकसभेत बोलताना दिले. 

दरम्यान, अमेरिका, कॅनाडा, जर्मनी यांसारख्या देशांत वाढलेल्या तेलाच्या किमतींची भारतासोबत तुलनात्मक आंकडेवारीही त्यांनी शेअर केली. 

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलRajya Sabhaराज्यसभाParliamentसंसदElectionनिवडणूक