शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

Petrol : निवडणुका झाल्या आता दरवाढ कधी?, पेट्रोलियममंत्र्यांनी संसदेत दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 16:52 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 4 नोव्हेंबर 2021 रोजी देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले.

मुंबई - पाच राज्यांमधील निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या 5 पैकी 4 राज्यात भाजपला चांगलं यशही मिळालं. या कालावधीत गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर स्थिर होते. युक्रेन-रशियामध्ये सुरू झालेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर वाढले. मात्र भारतात इंधनाच्या दरात वाढ झाली नाही. त्यामुळे, निवडणूक निकालानंतर आता पेट्रोल-डिझेलचे दर वाढतील, अशी चर्चा होत आहे. विशेष म्हणजे, संसदेतही विरोधी पक्षाच्या खासदारांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यास, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी उत्तर दिलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 4 नोव्हेंबर 2021 रोजी देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले. मात्र, 9 राज्यांनी त्यांच्या राज्यात हे दर कमी केले नाहीत. ग्राहकांवर सातत्याने वाढत असलेला आर्थिक भार कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सरकार, तेल कंपन्या सतत रुसी संघ आणि नवीन बाजारात संवाद साधत आहे. त्यातूनच, लवकर नवे बाजार खुले होतील आणि नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळेल, असे हरदीपसिंग पुरी यांनी म्हटलं. 

काँग्रेस खासदार छाया वर्मा यांनी राज्यसभेत सरकारवर निशाणा साधला होता. सरकारच तेलाचे भाव ठवरत असून निवडणूक आली की भाव कमी होतात आणि निकाल लागल्यानंतर ते वाढतात, आता कधी वाढणार?, असा प्रश्न त्यांनी विचारला होता. त्यावर, तेलाचे भाव सरकार ठरवत नसून आंतरराष्ट्रीय तेलाच्या किंमतींच्या आधारे तेल कंपन्या हे दर ठरवतात, असे पुरी यांनी सांगितले. तसेच, भारत देशात पाचही वर्षे निवडणुकाच असतात. त्यामुळे, निवडणुकांवेळी तेलाचे भाव कमी केले जातात हे म्हणणं चुकीचं आहे. नुकत्याच निवडणुका संपत आल्या आहेत, आता, पुढील वर्षाच्या सुरुवातीलाही निवडणुका आहेत, असे उत्तर पुरी यांनी लोकसभेत बोलताना दिले. 

दरम्यान, अमेरिका, कॅनाडा, जर्मनी यांसारख्या देशांत वाढलेल्या तेलाच्या किमतींची भारतासोबत तुलनात्मक आंकडेवारीही त्यांनी शेअर केली. 

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलRajya Sabhaराज्यसभाParliamentसंसदElectionनिवडणूक