शहरं
Join us  
Trending Stories
1
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
2
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
3
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
4
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
5
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
6
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
7
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
8
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
9
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
10
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
11
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
12
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
13
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
14
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
15
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
16
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
17
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
18
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
19
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
20
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...

देशद्रोह कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिका ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 12:06 IST

Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी भारतीय दंडविधानअंतर्गत (आयपीसी) वसाहतकालीन राजद्रोह कायद्याच्या तरतुदींच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिका किमान पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवल्या. 

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी भारतीय दंडविधानअंतर्गत (आयपीसी) वसाहतकालीन राजद्रोह कायद्याच्या तरतुदींच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिका किमान पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवल्या. 

संसदेने दंडसंहितेच्या तरतुदी पुन्हा लागू करत असल्याने आणि विधेयक स्थायी समितीकडे पाठविल्या आहेत. त्यामुळे  सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने हा खटला मोठ्या घटनापीठाकडे पाठवण्याचा निर्णय पुढे ढकलण्याची केंद्राची विनंती फेटाळली. सरकारने मागील महिन्यात आयपीसीसह अन्य दोन कायदे बदलण्यासाठी विधेयक मांडले होते.

खंडपीठ काय म्हणाले? - भादंविचे कलम ‘१२४ अ’ (देशद्रोह) कायद्यात कायम आहे. नवे विधेयक पारित झाले, तरी नवा दंड कायदा पूर्वलक्षी प्रभावाने नाही, तर भविष्यात लागू होईल.- जोपर्यंत कलम ‘१२४ अ’ अस्तित्वात राहील, तोपर्यंत त्यासंबंधित खटल्याच्या वैधतेचे मूल्यांकन करावे लागेल.- १९६२ च्या केदार नाथसिंग विरुद्ध बिहार राज्य खटल्यात, ‘कलम १२४ अ’ च्या घटनात्मक वैधतेचे सर्वोच्च न्यायालयाने पुनरावलोकन संविधानाच्या कलम १९(१)(अ) नुसार नसल्याचे म्हटले होते.- भादंविचे कलम ‘१२४ अ’ हे घटनेच्या ‘कलम १४’ चे (कायद्यासमोर समानता) उल्लंघन करते. त्याबाबत त्यावेळी कोणतीही याचिका दाखल करण्यात आली नव्हती.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय