शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

सरकारला जाणीव नाही वाटतं का? सुप्रीम कोर्टाने फेटाळली बांगलादेशी हिंदूंच्या सुरक्षेशी याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 11:33 IST

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराबाबत दाखल याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे.

Bangladesh Voilene:बांगलादेशात गेल्या वर्षी जुलैमध्ये सुरु झालेल्या हिंसाचाराची आग अद्यापही धुमसत आहे. या हिंसाचारात हिंदूंना आणि तिथल्या मंदिरांना लक्ष्य करण्यात आलं होतं. हिंसाचाराच्या काळात डझनभर हिंदूंची हत्या, १५२ मंदिरांवर हल्ले झाल्याची कबुला खुद्द सरकारनेच दिली होती. त्यामुळे हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी भारतातल्या नागरिकांकडूनही दबाव टाकण्यात येत होता. या संदर्भात सरकारनेही बांगलादेशमधल्या सरकारला लक्ष घालण्यास सांगितले होते. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयातही या संदर्भात याचिका दाखल करण्यात आली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका आता फेटाळून लावली आह.

बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांना संरक्षण देण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली. या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाला न्यायासाठी केंद्र सरकारला निर्देश देण्यास सांगण्यात आले होते. बांगलादेशात हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर अत्याचार होत असल्याचे याचिकेत म्हटलं आहे. मात्र बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. इतर देशांच्या अंतर्गत बाबींवर भाष्य करू शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं.

सरन्यायाधीश  संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठासमोर या याचिकेची सुनावणी झाली. हा परराष्ट्र व्यवहाराशी संबंधित मुद्दा आहे. अशा परिस्थितीत न्यायालय दुसऱ्या देशाच्या अंतर्गत बाबींवर भाष्य करू शकत नाही. यानंतर याचिकाकर्त्याने आपली जनहित याचिका मागे घेतली आणि खटला फेटाळण्यात आला. लुधियानाचे व्यापारी राजेश धांडा यांच्या वतीने ही जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. राजेश धांडा हे लुधियाना स्थित भगवान जगन्नाथ रथयात्रा महोत्सव समितीचे ते अध्यक्ष देखील आहेत.

या याचिकेत भारतात येणाऱ्या हिंदूंच्या नागरिकत्वाच्या अर्जांवर विचार करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली होती. बांगलादेशात हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर अत्याचार होत असल्याचा दावा त्यात करण्यात आला होता. असे गुन्हे रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायद्याने मान्यताप्राप्त इतर पावले उचलली पाहिजेत, असं याचिकाकर्त्याने म्हटलं.

यावर सर्वोच्च न्यायालयाने, "हे प्रकरण भारताच्या परराष्ट्र धोरणाशी संबंधित आहे आणि भारतीय न्यायव्यवस्था त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. इतर कोणत्याही देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. न्यायालयाने अशा बाबींमध्ये हस्तक्षेप करणे खूप विचित्र ठरेल. सरकारला याची जाणीव नाही असे वाटते का? यावर न्यायालय कसे भाष्य करू शकते?" असा सवाल केला आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात बांगलादेशातील हिंदूंबाबत आकडेवारी सादर केली होती. बांगलादेशच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार उलथून टाकल्यानंतर गेल्या वर्षी सुरू झालेल्या हिंदूविरोधी हिंसाचारात  २३ हिंदूंचा मृत्यू झाला असून १५२ हिंदू मंदिरांवर हल्ले आणि तोडफोड करण्यात आल्याचे सरकारने सांगितले.

टॅग्स :BangladeshबांगलादेशSupreme Courtसर्वोच्च न्यायालय