शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

अरबी समुद्रातील शिवस्मारक योजना रद्द करण्यासाठी याचिका; यथावकाश होणार सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 05:25 IST

नौदलाचे निवृत्त व्हाईस अ‍ॅडमिरल आय. सी. राव, ज्येष्ठ निवृत्त सनदी अधिकारी द. म. सुकथनकर, वनशक्ति ट्रस्ट आणि आदिवासी कोळी समाज समन्वय समिती यांच्याकडून ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

नवी दिल्ली: ६,२०० कोटी रुपयांहून अधिक खर्च करून मुंबईजवळच्या अरबी समुद्रात अश्वारूढ पुतळ््यासह छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याची महाराष्ट्र सरकारची योजना बेकायदा आणि वायफळ खर्चाची असल्याने ती रद्द करावी, अशी विनंती करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे.नौदलाचे निवृत्त व्हाईस अ‍ॅडमिरल आय. सी. राव, ज्येष्ठ निवृत्त सनदी अधिकारी द. म. सुकथनकर, वनशक्ति ट्रस्ट आणि आदिवासी कोळी समाज समन्वय समिती यांच्याकडून ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांच्या वकील अ‍ॅड. रोनिता भट्टाचार्य यांचे म्हणणे थोडक्यात ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने प्रतिवादींना नोटीस जारी केली.समुद्रात होणााऱ्या या स्मारकामुळे पर्यावरणाची भरून न काढता येणारी अशी अपरिमित हानी होणारआहे, पर्यावरणाची हानी होणे हे गंभीर आहे, असा मुद्दा अ‍ॅड. भट्टाचार्य यांनी प्रामुख्याने मांडला. ही योजना जाहीर झाल्यापासून अरबी समुद्रात होणाºया या शिवस्मारकासाठी निवडण्यात आलेल्या ठिकाणाची अयोग्यता, त्याचा पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम तसेच येथील मच्छिमार समाजातील १५ हजार लोकांच्या चरितार्थाची यामुळे होणारी हानी यावरून अनेक वाद निर्माण झाले आहेत.अरबी समुद्रात होणाºया या शिवस्मारकाच्या डिझाईनमध्ये त्रुटी असल्याची व त्या ठिकाणचा समुद्राचा तळ स्मारकाच्या बांधकामाचे आठ लाख टनांचे ओझे पेलू शकेल का, हा प्रश्न आहे. याविषयी राज्य सरकारच साशंक आहे, याकडेही त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.याचिकेतील प्रमुख आव्हान देणारे मुद्देया स्मारकासाठी दिलेल्या परवानग्या व पर्यावरणीय संमती कायदा आणि नियमांचे उल्लंघन करून देण्यात आली आहे.पूर्ण झाल्यावर या स्मारकास दररोज १० हजार पर्यटक भेट देतील व गर्दीच्या वेळी ही संख्या तासाला चार हजारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे शहराच्या त्या भागात आधीच असलेली वाहतूक समस्या आणखीनच बिकट होईल.या नियोजित स्मारकापासून जेमतेम २०० मीटर अंतरावर समुद्राच्या तळाशी विदेश संचार निगमच्या ५००० व्होल्टच्या केबल टाकलेल्या आहेत. यामुळे तेथे येणारे पर्यटक व स्मारकासाठी टाकला जाणारा भराव यांच्या सुरक्षेस संभाव्य धोका आहे.राज्य सकारकडे निधीची चणचण असताना आणि कल्याणकारी योजनांसाठी पुरेसा पैसा देणे शक्य होत नसताना या स्मारकावर केला जाणारा खर्च अनाठायी आहे.

टॅग्स :Shiv Smarakशिवस्मारकSupreme Courtसर्वोच्च न्यायालय