शहरं
Join us  
Trending Stories
1
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
3
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
4
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
5
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
6
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
7
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...
8
बाजारात मोठी अस्थिरता! सेंसेक्स-निफ्टी सपाट पातळीवर बंद; महिंद्रा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले
9
प्रणित मोरे ऐकत नाय! क्रिकेटपटूच्या बहिणीसोबत वाढतेय जवळीक? 'बिग बॉस'च्या घरातील व्हिडीओ पाहून चाहतेही अवाक्
10
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
11
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
12
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
13
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
14
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
16
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
17
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
18
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
19
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
20
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा

भारतावर 2002 मध्ये अणुहल्ला करणार होते मुशर्रफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 19:27 IST

पाकिस्तानचे माजी लष्कर प्रमुख आणि माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. 2002 साली भारतावर अणुहल्ला करण्याचा विचार होता असं मुशर्रफ म्हणाले आहेत. 

ठळक मुद्देभारतावर अणुहल्ला करण्याचा विचार होता, मात्र प्रत्युत्तरात भारताकडून होणा-या हल्ल्याचा विचार करून हा अणुहल्ल्याचा विचार डोक्यातून काढून टाकलातणावाच्या त्या दिवसांमध्ये मुशर्रफ यांनी अनेक रात्रं केवळ हाच विचार करत जागवल्या होत्या.

नवी दिल्ली, दि. 27 - पाकिस्तानचे माजी लष्कर प्रमुख आणि माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. 2002 साली भारतावर अणुहल्ला करण्याचा विचार होता असं मुशर्रफ म्हणाले आहेत. 

2001 मध्ये भारतीय संसदेवर झालेल्या दहशतवाही हल्ल्यानंतर चांगलाच तणाव निर्माण झाला होता. त्याच्यानंतर भारतावर अणुहल्ला करण्याचा विचार होता, मात्र प्रत्युत्तरात भारताकडून होणा-या हल्ल्याचा विचार करून हा अणुहल्ल्याचा विचार डोक्यातून काढून टाकला असं मुशर्रफ म्हणाले. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, तणावाच्या त्या दिवसांमध्ये मुशर्रफ यांनी अनेक रात्रं केवळ हाच विचार करत जागवल्या होत्या. या दरम्यान भारतावर अणुहल्ला करावा की नाही हाच विचार ते करत होते. जापानचं वृत्तपत्र 'मेनची शिमबुने’सोबत बोलताना मुशर्रफ यांनी याबाबत खुलासा केला आहे.  2002 मध्ये भारत-पाकिस्तान दोन्ही देशांमधील तणाव कमालीचा वाढला होता. एक वेळ अशी होती की अणुहल्ल्याचा वापर करण्याबाबत बनवण्यात आलेल्या नीतिचं उल्लंघन करण्याचा विचार होता असं मुशर्रफ म्हणाले.  

विशेष म्हणजे 2002 मध्ये परवेज मुशर्रफ यांनी सार्वजनिक स्थरावर याबाबत विधानही केलं होतं. अणुहल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही असं मुशर्रफ त्यावेळी म्हणाले होते. 

कसाबपेक्षा कुलभूषण जाधव मोठे दहशतवादी - परवेझ मुशर्रफ

कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय कोर्टाने दिलेला आदेश मान्य करणे पाकिस्तानात अनेकांना जड जात आहे.याला पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफही अपवाद नाहीत. भारतीय नागरीक कुलभूषण जाधव हे अजमल कसाबपेक्षा मोठे दहशतवादी आहेत असे वक्तव्य मुशर्रफ यांनी केले आहे. मुशर्रफ सध्या पाकिस्तानात देशद्रोहाच्या आरोपाचा सामना करत आहेत. 

कसाब फक्त एक प्यादा होता. पण जाधव दहशतवादाला खतपाणी घालत होते. त्यांनी घातपात घडवून पाकिस्तानात अनेकांना ठार मारले असते असा आरोप मुशर्रफ यांनी एआरवाय न्यूज या पाकिस्तानी वृत्तवाहिनीशी बोलताना केला. पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना गुप्तहेर ठरवून सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय कोर्टाने स्थगिती दिली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा प्रकारे उघडे पडल्यामुळे पाकिस्तानात अऩेकांचे पित्त खवळले असून असे उलट-सुलट आरोप केले जात आहेत. 

नवाझ शरीफ यांची सत्ता उलथवून पाकिस्तानची सूत्रे आपल्या हाती घेणा-या शरीफ यांच्या मते पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय कोर्टात जायलाच नको होते हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे. दुस-या कोणाला आपल्या सुरक्षेसंबंधी ठरवण्याचा अधिकार नाही असे त्यांनी सांगितले. 

दरम्यान मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी दहा पाक पुरस्कृत  दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या दहा दहशतवाद्यांपैकी अजमल कसाब हा जिवंत हाती लागलेला एकमेव दहशतवादी होता. कसाबमुळे भारताच्या हाती मोठा पुरावा लागला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचा खरा दहशतवादी चेहरा उघडा पडला. आता त्याच कसाबपेक्षा जाधव अधिक धोकादायक होते असे मुशर्रफ यांनी म्हटले आहे.