शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

चीनमधून वीज उपकरणे आयातीसाठी घ्यावी लागणार परवानगी : ऊर्जामंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2020 23:28 IST

ज्या उपकरणांची आयात करणे गरजेचे आहे त्यांना परवानगी दिली जाईल, मात्र ही आयात चीन अथवा पाकिस्तानकडून होत असल्यास त्यासाठी पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

नवी दिल्ली : चीनमधून आयात करण्यात येणाऱ्या वीज उपकरणांच्या सुरक्षिततेबाबत ऊर्जा मंत्रालय अधिक सतर्क झाले आहेत. वीज उपकरणांची आयात करण्यापूर्वी ऊर्जा मंत्रालयाची परवानगी घेणे अत्यावश्यक करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी केली. या उपकरणांची सायबर सुरक्षिततेच्या दृष्टीने देशाच्या प्रयोगशाळांमध्ये चाचणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

चीनमधून भारतावर सायबर हल्ला होण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने या हल्ल्यांपासून बचाव कसा करावयाचा याची रणनीती तयार करण्यासाठी केंद्रीय विद्युत प्राधिकरणांतर्गत एक समिती स्थापन करण्यात आल्याची घोषणा सिंग यांनी केली. वीज हे रणनीतीच्या बाबतीत एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. जर वीजपुरवठा ठप्प झाला तर देशाची अर्थव्यवस्थाच ठप्प होण्याचा धोका निर्माण होईल. त्यामुळे या क्षेत्राबाबत आम्ही अधिक सावधानता बाळगत असल्याचे सिंग यांनी सांगितले.

ज्या उपकरणांची आयात करणे गरजेचे आहे त्यांना परवानगी दिली जाईल, मात्र ही आयात चीन अथवा पाकिस्तानकडून होत असल्यास त्यासाठी पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. शक्य असेल तर अन्य देशांतून आयातीचा पर्याय वापरावा अशा सूचना मंत्रालयातर्फे संबंधितांनाच दिल्या जात असल्याचे सिंग यांनी स्पष्ट केले. देशाच्या ऊर्जा क्षेत्राला चीन, सिंगापूर आणि रशिया यांसारख्या देशांकडून सायबर हल्ला होण्याची भीती असल्याची माहितीही सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.भारतीय कंपन्या सक्षम बनाव्यात : भार्गवचीनमधून होणारी आयात कमी करावयाची असेल तर भारतीय कंपन्या अधिक सक्षम बनविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मारुती सुझुकीचे चेअरमन आर. सी. भार्गव यांनी केले. चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याच्या मागणीसाठी केले जात असलेल्या आंदोलनाबाबत भार्गव म्हणाले की, यासाठी देशातील नागरिकांनी आपल्या देशात बनलेल्या मात्र अधिक किंमत असलेल्या वस्तू खरेदी करण्याची तयारी ठेवली पाहिजे. काही वस्तूंची आयात करणे हे देशासाठी आवश्यक असल्याने त्यांची आयात कायम ठेवावी लागेल, मात्र अन्य वस्तूंबाबत देशी वस्तूंचा पर्याय हा आपण स्वीकारणे गरजेचे आहे. रुपयाचे मूल्य घटत असल्याने आयात होणाºया वस्तू या दिवसेंदिवस महाग होत आहेत. त्यामुळे कारखान्यांना वस्तू आयात करणे हे आता परवडणारे राहिलेले नाही. आपल्याकडे आयात करण्यासाठी जर पर्याय उपलब्ध असतील तर आपण त्यांचा वापर योग्य प्रकारे करण्याची गरज असल्याचे भार्गव यांनी स्पष्ट केले.