शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

चीनमधून वीज उपकरणे आयातीसाठी घ्यावी लागणार परवानगी : ऊर्जामंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2020 23:28 IST

ज्या उपकरणांची आयात करणे गरजेचे आहे त्यांना परवानगी दिली जाईल, मात्र ही आयात चीन अथवा पाकिस्तानकडून होत असल्यास त्यासाठी पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

नवी दिल्ली : चीनमधून आयात करण्यात येणाऱ्या वीज उपकरणांच्या सुरक्षिततेबाबत ऊर्जा मंत्रालय अधिक सतर्क झाले आहेत. वीज उपकरणांची आयात करण्यापूर्वी ऊर्जा मंत्रालयाची परवानगी घेणे अत्यावश्यक करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी केली. या उपकरणांची सायबर सुरक्षिततेच्या दृष्टीने देशाच्या प्रयोगशाळांमध्ये चाचणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

चीनमधून भारतावर सायबर हल्ला होण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने या हल्ल्यांपासून बचाव कसा करावयाचा याची रणनीती तयार करण्यासाठी केंद्रीय विद्युत प्राधिकरणांतर्गत एक समिती स्थापन करण्यात आल्याची घोषणा सिंग यांनी केली. वीज हे रणनीतीच्या बाबतीत एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. जर वीजपुरवठा ठप्प झाला तर देशाची अर्थव्यवस्थाच ठप्प होण्याचा धोका निर्माण होईल. त्यामुळे या क्षेत्राबाबत आम्ही अधिक सावधानता बाळगत असल्याचे सिंग यांनी सांगितले.

ज्या उपकरणांची आयात करणे गरजेचे आहे त्यांना परवानगी दिली जाईल, मात्र ही आयात चीन अथवा पाकिस्तानकडून होत असल्यास त्यासाठी पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. शक्य असेल तर अन्य देशांतून आयातीचा पर्याय वापरावा अशा सूचना मंत्रालयातर्फे संबंधितांनाच दिल्या जात असल्याचे सिंग यांनी स्पष्ट केले. देशाच्या ऊर्जा क्षेत्राला चीन, सिंगापूर आणि रशिया यांसारख्या देशांकडून सायबर हल्ला होण्याची भीती असल्याची माहितीही सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.भारतीय कंपन्या सक्षम बनाव्यात : भार्गवचीनमधून होणारी आयात कमी करावयाची असेल तर भारतीय कंपन्या अधिक सक्षम बनविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मारुती सुझुकीचे चेअरमन आर. सी. भार्गव यांनी केले. चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याच्या मागणीसाठी केले जात असलेल्या आंदोलनाबाबत भार्गव म्हणाले की, यासाठी देशातील नागरिकांनी आपल्या देशात बनलेल्या मात्र अधिक किंमत असलेल्या वस्तू खरेदी करण्याची तयारी ठेवली पाहिजे. काही वस्तूंची आयात करणे हे देशासाठी आवश्यक असल्याने त्यांची आयात कायम ठेवावी लागेल, मात्र अन्य वस्तूंबाबत देशी वस्तूंचा पर्याय हा आपण स्वीकारणे गरजेचे आहे. रुपयाचे मूल्य घटत असल्याने आयात होणाºया वस्तू या दिवसेंदिवस महाग होत आहेत. त्यामुळे कारखान्यांना वस्तू आयात करणे हे आता परवडणारे राहिलेले नाही. आपल्याकडे आयात करण्यासाठी जर पर्याय उपलब्ध असतील तर आपण त्यांचा वापर योग्य प्रकारे करण्याची गरज असल्याचे भार्गव यांनी स्पष्ट केले.