शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
3
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
4
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
5
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
6
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
7
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
8
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
9
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
10
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
11
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
12
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
14
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
15
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
16
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
17
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
18
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
19
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
20
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू

ईशान्य दिल्लीतील लोकांना आता हवा आहे फक्त आत्मविश्वासच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 06:17 IST

विद्यार्थी आपल्या पालकांसह शाळेतील आपल्या नष्ट झालेले वर्ग पाहून रडवेले झाले आहेत.

नवी दिल्ली : ईशान्य दिल्ली दोन दिवसांपासून शांत आहे, पण जळून खाक झालेली घरे, इमारती, कारखाने याबरोबरच उद्ध्वस्त झालेल्या तीन शाळा, इतस्तत: पडलेली पुस्तके आणि वह्या, तुटलेली बाके, त्यामुळे उदास झालेले हजारो विद्यार्थी आणि या हिंसाचारात हरवलेले आपले नातेवाईक शोधण्यात गुंतलेल्यांचे भकास झालेले चेहरे... असे चित्र तिथे आहे. त्या सर्वांना आता हवा आहे आत्मविश्वास, जो तीन दिवसांमध्ये पार नष्ट झाला आहे.त्या भागांतील तीन शाळा पार उद्ध्वस्त झाल्या आहेत. विद्यार्थी आपल्या पालकांसह शाळेतील आपल्या नष्ट झालेले वर्ग पाहून रडवेले झाले आहेत. ज्या वर्गांत गेल्या शनिवारपर्यंत आपण बसून अभ्यास करीत होतो, तेच नाहीसे झाले आहेत. वर्गातील फळ्यांना खिंडारे पाडण्यात आली आहेत. वह्या-पुस्तकांचा खच वाट्टेल तसा पडला आहे. तुटलेली बाके आणि शिक्षकांच्या खुर्च्या पाहून अनेकांना जीव कासावीस होत आहे.एकाला अशाच खाली पडलेला वर्गात भारताचा ध्वज सापडला, तेव्हा त्याने तो आपल्या हातात घेतला. तेव्हा सारे काही संपलेले नाही, याची खात्री पटली, पण मी या शाळेत शिकतो, असे म्हणण्याची त्याची हिंमत झाली नाही. तो म्हणाला, ‘मी या शाळेत शिकत होतो.’ शाळा पुन्हा उभी राहील का, याची जणू त्याला खात्रीच नसावी. अर्थात, ७ मार्चपर्यंत तेथील शाळा बंदच राहणार आहेत. सर्व परीक्षाही पुढे ढकलल्या आहेत.मोबाइलवर आपल्या मुलाचा, मुलीचा वा नातेवाइकांचा फोटो दाखवत, यांना तुम्ही पाहिलेत का, असा प्रश्न विचारत फिरणारे अनेक जण तिथे दिसत आहेत. त्यांनी जवळपासच्या सर्व रुग्णालयांत, शवगृहात चकरा मारल्या. दोन्ही ठिकाणी ते सापडले नाहीत. त्यामुळे ते जिवंत असतील, असे अनेकांना वाटत आहे. कुठेतरी नाल्यात, गटारात, ढिगाऱ्याखाली त्यांचे देह सापडू नयेत, अशीच या आत्मविश्वास हरवून बसलेल्या मंडळींची इच्छा आहे.>त्यांनी एकमेकांना वाचविलेतिथे काहींनी धर्माचा न विचारता करता एकमेकांना वाचविले, धार्मिक स्थळांवर हल्ले होऊ नयेत, यासाठी धर्म न विचारता त्यांनी हल्लेखोरांना एकत्र येऊ न अडविले, तरीही विश्वास डळमळत चालला आहे. पुढील आयुष्य इथे शांततेने काढता येईल का, अशी अनेकांना भीती आहे. त्यांना मदत मिळू लागली आहे आणि हवा आहे केवळ व केवळ आत्मविश्वास! तो जात-धर्म-पंथ न पाहता सर्वांनीच द्यायला हवा.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNational Register of Citizensएनआरसी