शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

ईशान्य दिल्लीतील लोकांना आता हवा आहे फक्त आत्मविश्वासच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 06:17 IST

विद्यार्थी आपल्या पालकांसह शाळेतील आपल्या नष्ट झालेले वर्ग पाहून रडवेले झाले आहेत.

नवी दिल्ली : ईशान्य दिल्ली दोन दिवसांपासून शांत आहे, पण जळून खाक झालेली घरे, इमारती, कारखाने याबरोबरच उद्ध्वस्त झालेल्या तीन शाळा, इतस्तत: पडलेली पुस्तके आणि वह्या, तुटलेली बाके, त्यामुळे उदास झालेले हजारो विद्यार्थी आणि या हिंसाचारात हरवलेले आपले नातेवाईक शोधण्यात गुंतलेल्यांचे भकास झालेले चेहरे... असे चित्र तिथे आहे. त्या सर्वांना आता हवा आहे आत्मविश्वास, जो तीन दिवसांमध्ये पार नष्ट झाला आहे.त्या भागांतील तीन शाळा पार उद्ध्वस्त झाल्या आहेत. विद्यार्थी आपल्या पालकांसह शाळेतील आपल्या नष्ट झालेले वर्ग पाहून रडवेले झाले आहेत. ज्या वर्गांत गेल्या शनिवारपर्यंत आपण बसून अभ्यास करीत होतो, तेच नाहीसे झाले आहेत. वर्गातील फळ्यांना खिंडारे पाडण्यात आली आहेत. वह्या-पुस्तकांचा खच वाट्टेल तसा पडला आहे. तुटलेली बाके आणि शिक्षकांच्या खुर्च्या पाहून अनेकांना जीव कासावीस होत आहे.एकाला अशाच खाली पडलेला वर्गात भारताचा ध्वज सापडला, तेव्हा त्याने तो आपल्या हातात घेतला. तेव्हा सारे काही संपलेले नाही, याची खात्री पटली, पण मी या शाळेत शिकतो, असे म्हणण्याची त्याची हिंमत झाली नाही. तो म्हणाला, ‘मी या शाळेत शिकत होतो.’ शाळा पुन्हा उभी राहील का, याची जणू त्याला खात्रीच नसावी. अर्थात, ७ मार्चपर्यंत तेथील शाळा बंदच राहणार आहेत. सर्व परीक्षाही पुढे ढकलल्या आहेत.मोबाइलवर आपल्या मुलाचा, मुलीचा वा नातेवाइकांचा फोटो दाखवत, यांना तुम्ही पाहिलेत का, असा प्रश्न विचारत फिरणारे अनेक जण तिथे दिसत आहेत. त्यांनी जवळपासच्या सर्व रुग्णालयांत, शवगृहात चकरा मारल्या. दोन्ही ठिकाणी ते सापडले नाहीत. त्यामुळे ते जिवंत असतील, असे अनेकांना वाटत आहे. कुठेतरी नाल्यात, गटारात, ढिगाऱ्याखाली त्यांचे देह सापडू नयेत, अशीच या आत्मविश्वास हरवून बसलेल्या मंडळींची इच्छा आहे.>त्यांनी एकमेकांना वाचविलेतिथे काहींनी धर्माचा न विचारता करता एकमेकांना वाचविले, धार्मिक स्थळांवर हल्ले होऊ नयेत, यासाठी धर्म न विचारता त्यांनी हल्लेखोरांना एकत्र येऊ न अडविले, तरीही विश्वास डळमळत चालला आहे. पुढील आयुष्य इथे शांततेने काढता येईल का, अशी अनेकांना भीती आहे. त्यांना मदत मिळू लागली आहे आणि हवा आहे केवळ व केवळ आत्मविश्वास! तो जात-धर्म-पंथ न पाहता सर्वांनीच द्यायला हवा.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNational Register of Citizensएनआरसी