शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

संकुचित मनाच्या लोकांना विकास दिसत नाही, टीकाकारांना मोदींचे उत्तर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 22:06 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या आर्थिक परिस्थितीचा लेखाजोखा सादर केला. यावेळी नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसच्या काळात विकासदरात घसरण झाली नाही का? असा सवाल करत टीकाकारांना उत्तर दिले.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या आर्थिक परिस्थितीचा लेखाजोखा सादर केला. यावेळी नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसच्या काळात विकासदरात घसरण झाली नाही का? असा सवाल करत टीकाकारांना उत्तर दिले. येथील कंपनी सेक्रेटरींच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात नरेंद्र मोदी बोलत होते. नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँकांमध्ये जवळपास 99 टक्के जमा झालेल्या नोटा, जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर व्यवहारात येत असलेल्या अडचणी तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीत घट होऊनही देशात पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीचे भाव चढे असल्याने केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे.  त्या पार्श्वभूमीवर मोदींनी सरकारवर होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. त्यांनी आपल्या सरकारची गेल्या तीन वर्षांतील आकडेवारी आणि काँग्रेसच्या कार्यकाळातील कामगिरीची आकडेवारी सादर केली. तसेच 8 नोव्हेंबर 2016 हा भ्रष्टाचार मुक्ती दिन असल्याचे सांगत नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन केले. सरकारच्या आर्थिक धोरणांवर यशवंत सिन्हा आणि अरुण शौरी यांनी टीका करून सरकारला घरचा आहेर दिला होता. त्यालाही मोदींनी उत्तर दिले. तसेच देशाची अर्थव्यवस्था भक्कम असल्याचे सांगत आगामी काळात विकासाच्या दृष्टीने मोठ्या घोषणा करणार असल्याचेही जाहीर केले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील काही मुद्दे - 

- मागील सरकारच्या अखेरच्या तीन वर्षांच्या काळात 12 हजार मेगावॅट अक्षय्य ऊर्जेची (Renewable) निर्मिती, या सरकारने 3 वर्षांत 22हजार मेगावॅटपेक्षा जास्त अक्षय्य ऊर्जेची निर्मिती केली. 

- 2100 किमीपेक्षा जास्त किमीचे रेल्वेमार्ग बनवले- जास्तीत जास्त परदेशी चलन भारतात यावं यासाठी आमचं सरकार प्रयत्नशील आहे.- जुने व्यवहार उरकणर नाही, व्यापारांचा मोदींना मोदींचा सल्ला- कांग्रेसच्या काळात आठ वेळी विकासदर पाच टक्क्यांहून कमी- काळ्या पैशाविरोधात देशात सफाई मोहिम.- मी अर्थतज्ज्ञ असल्याचा दावा कधीही केला नाही.- 8 नोव्हेंबर 2016 हा भ्रष्टाचार मुक्ती  दिन- देशात परदेशी गुंतवणूकीचा विक्रम.- कॉंग्रेसच्या काळात विकासदरात घसरण झाली नाही का? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सवाल- प्रामाणिक लोकांच्या हिताचं संरक्षण करणार.- देशाची अर्थव्यवस्था भक्कमपणे उभी आहे.- विकासासाठी मोठे निर्णय घेणार आहेत.- जून महिन्यानंतर पॅसेंजर गाड्या विक्रीत 12 टक्क्यांनी वाढ झाली. - गेल्या 3 वर्षांत सरासरी 7.5 टक्के इतका विकासदर होता. - एप्रिल-जूनमध्ये विकासदर खाली आला हे मान्य पण ही परिस्थिती बदलण्यास सरकार वचनबद्ध. 

- सर्व ज्ञान आम्हालाच आहे असा दावा आम्ही कधीच करत नाही.- आरबीआयने येत्या तिमाहीत 7.7 टक्के विकासदराचे लक्ष्य ठेवले आहे. - विमान प्रवास संख्येतही लक्षणीय वाढ. - ट्रॅक्टर विक्रीत 34 टक्क्यांनी वाढ झाली आहे.- रेल्वे लाइनचे दुपदरीकरण मागील सरकारच्या तुलनेत दुप्पट झाले.- रेल्वे, रस्ते बांधणी क्षेत्रातले विद्यमान सरकारचे काम मागील सरकारच्या तुलनेत जास्त.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी