शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसमुक्त भारताकडे जनतेची वाटचाल - अमित शहा

By admin | Updated: May 19, 2016 16:07 IST

भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेसवर टीका करत काँग्रेसमुक्त भारताकडे जनतेने अजून दोन पावलं टाकली आहेत असा टोमणा मारला आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 19 - पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालावरुन भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेसवर टीका करत काँग्रेसमुक्त भारताकडे जनतेने अजून दोन पावलं टाकली आहेत असा टोमणा मारला आहे. अमित शहा यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी आसाममधील पक्षाच्या विजयासोबत इतर राज्यांमधील पक्षाच्या कामगिरीवर मत मांडले. 
 
ज्यांनी संसदेतील कामकाजात अडचण आणली, मुद्द्यांचं राजकारण केलं त्यांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला असल्याचं निकालावरुन स्पष्ट होत आहे. अडवणुकीचं राजकारण करणा-या काँग्रेस पक्षाला हा निकाल धडा आहे. निकाल पाहून कोणीही काँग्रेससोबत जाण्याची हिंमत करणार नाही. जे गेले आहेत त्यांचा पराभव झाला असल्याची टीका अमित शहा यांनी केली आहे. 
 
( इथे पाहा २०१६ विधानसभा निवडणूक निकाल) 
 
निवडणुकीतील निकालामुळे जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 2 वर्षाच्या कार्यकाळावर आनंदी असल्याचं स्पष्ट होत आहे असं अमित शहा बोलले आहेत. आसाममधील विजय अत्यंत महत्वाचा आहे. आसामला विकसित करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचं आश्वासनही अमित शहा यांनी दिलं आहे. 
 
राजकारणाला विकासाच्या मार्गावर नेण्याचं काम आम्ही केलं असल्याचा पुनरुच्चार पुन्हा एकदा अमित शहा यांनी केला आहे. भाजपाला स्वत:च्या बळावर बहुमत मिळालं आहे. 2019 मध्ये आमच्या कामगिरीच्या आधारावर निवडणूक लढवणार असल्याचा दावा अमित शहा यांनी केला आहे. देशाच्या विकासासाठी ज्यांना सोबत यायचं आहे त्यांचं स्वागत असल्याचंही अमित शहा बोलले आहेत.