शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

मोदींच्या ‘मित्रों’ची लोकांना आता धास्ती!, काँग्रेसचा प्रतिहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 03:20 IST

हिमाचल प्रदेश निवडणूक प्रचारात तोंडसुख घेणाºया पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काँग्रेसने रविवारी प्रतिहल्ला चढविला आणि मोदींच्या भाषणांतील ‘मित्रों’ या पालुपदाची लोकांनी आता धास्ती घेतली असल्याचा टोला लगावला.

धर्मशाला : हिमाचल प्रदेश निवडणूक प्रचारात तोंडसुख घेणाºया पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काँग्रेसने रविवारी प्रतिहल्ला चढविला आणि मोदींच्या भाषणांतील ‘मित्रों’ या पालुपदाची लोकांनी आता धास्ती घेतली असल्याचा टोला लगावला.गुजरातमधील प्रचारात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘जीएसटी’ची फोड ‘गब्बर सिंग टॅक्स’ अशी केली होती. तेच सूत्र पकडून पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला येथील प्रचार सभेत मोदींची तुलना ‘शोले’ चित्रपटातील खलनायक गब्बर सिंग या डाकूशी केली. गब्बर सिंगने ‘कितने आदमी थे’ असे विचारले की, लोकांचा भीतीने थरकाप उडायचा. तशीच मोदींच्या ‘मित्रों’ या पालुपदाची लोकांनी आता धास्ती घेतली आहे. कारण आता नशिबी काय वाढून ठेवले आहे, याची त्यांना भीती वाटते, असे ते म्हणाले.मोदी सरकारने ‘पोकळ’ भाषणे बंद करावीतनवी दिल्ली : वाढत्या किमतींना आळा घालून लोकांना रोजगार देता येत नसेल, तर नरेंद्र मोदी सरकारने ‘पोकळ’ भाषणे देण्याचे थांबवावे, अशा शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी हल्ला केला. टिष्ट्वटरवर गांधी म्हणाले की, ‘‘महेंगी गॅस, महेंगा रेशन, बंद करो, खोखला भाषण, दाम बांधो, काम दो, वर्ना खाली करो सिंघासन.’’ या टिष्ट्वटसोबत त्यांनी घरगुती गॅस व इतर वस्तूंच्या वाढलेल्या किमतीची बातमीही जोडली आहे. गुजरात दौºयात राहुल गांधी यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती, बेरोजगारी, नोटाबंदी, वस्तू आणि सेवा कर आणि खालावलेल्या आर्थिक परिस्थितीबद्दल मोदी सरकारवर जोरदार टीका करून, लोकांचे (विशेषत: समाज माध्यमांवर सक्रिय असलेल्यांचे) लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते.काँग्रेसने मैदानातून पळ काढला, निवडणूक एकतर्फीउना : हिमाचल प्रदेशातील निवडणुकीत आता मजा राहिली नाही. कारण काँग्रेसने मैदानातून पळ काढल्याने निवडणूक एकतर्फी झाली आहे, असे सांगतानाच, आम्हाला बहुमत मिळेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी उना येथे झालेल्या सभेत व्यक्त केला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, ही निवडणूक आमचा पक्ष नव्हे, तर राज्यातील जनता लढवित आहे. भ्रष्टाचार आणि कायदा व सुव्यवस्थेचा निर्माण झालेला प्रश्न, यावरून राज्यातील जनता काँग्रेसला धडा शिकविणार आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेसला लक्ष्य करताना मोदी म्हणाले की, काँग्रेसच्या नेतृत्वातील सरकारने ५७ हजार कोटी रुपयांच्या सबसिडीचा दुरुपयोग केला. आम्ही हा दुरुपयोग थांबविला. गरिबांच्या कल्याणासाठी आता हा निधी वापरला जात आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी