शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

पाणीटंचाईमुळे चेन्नईत लोकांचे स्थलांतर; बंगळुरूकडे घेतली धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 02:59 IST

चार तलावांची पाणीपातळी घटली, काही भागात दहा दिवसांनी पाणी

चेन्नई : यंदा तीव्र पाणीटंचाईची झळ चेन्नईसारख्या महानगरालाही सोसावी लागत असून, तेथील अनेक रहिवासी शहर सोडून अन्यत्र राहायला गेले आहेत. जे सुट्टी घेऊन फिरायला गेले होते त्यांनी चेन्नईमध्ये परतणे लांबणीवर टाकले आहे.

चेन्नईला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही तलावांची पाणीपातळी खूपच घटली आहे. पाणी मिळत नसल्याने रहिवासी हैराण झाले आहेत. शहराच्या कोडम्बक्कम भागात वर्षानुवर्षे राहणारे अनेक जण नाईलाजास्तव के. के. नगरामध्ये राहायला गेले आहेत. तेथे दिवसभरात तीन तास पाणीपुरवठा होतो. पाणी येण्याच्या वेळेस घरात कोणी नसले तर त्यांची खूपच पंचाईत होते.

पेरूनगुडीचे रहिवासी एम. एस. श्रीकांत हे आपल्या कुटुंबासह दोन दिवस नातेवाईकांकडे राहायला गेले. त्यानंतर ते रेल्वे प्रवास करून बंगळुरूला बहिणीकडे गेले. ते काही सहलीला गेले नव्हते. श्रीकांत म्हणाले की, आम्ही जिथे राहतो तिथे दहा दिवस पाणीपुरवठाच झाला नव्हता. त्यामुळे दुसरीकडे जाण्याशिवाय पर्यायच नव्हता. पाणीटंचाईमुळे आता पुढचा मुक्काम कोणाकडे करायचा हा विचार त्यांचा मनात घोळत असतो. चेन्नईतील अनेक जण थेट केरळला नातेवाईकांकडे राहायला गेले होते. 

१७ जिल्हे दुष्काळग्रस्तगेली दोन वर्षे झालेल्या पावसामुळे भूजल पातळी घटली आहे. चेन्नई, कांचीपुरम यांसह १७ जिल्हे दुष्काळग्रस्त असल्याचे राज्य सरकारने नुकतेच जाहीर केले. या जिल्ह्यांत गेल्या वर्षी १९ ते ५६ टक्के इतकाच पाऊस पडला होता. एकीकडे पाण्याची टंचाई, तर कडक उन्हाळा यामुळे या जिल्ह्यातील लोक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांनी शहराची वाट धरली आहे.