शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
2
जे इंग्रजांनाही जमले नाही, ते पंतप्रधान मोदींनी करुन दाखवले; ओमर अब्दुल्लांकडून स्तुतीसुमने
3
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदला पाकिस्तान भारताला सोपवणार?; मुलगा तल्हा सईदचा खुलासा
4
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारी हनुमान मंदिरात गुप्तपणे का केले जाते काडेपेटीचे दान? 
5
बेपत्ता झालेल्या राजा आणि सोनमची करण्यात आली होती रेकी, दुचाकीचे लोकेशन आले समोर
6
Nirjala Ekadashi 2025:निर्जला एकादशी विशेष साबुदाण्याची खमंग, कुरकुरीत भजी रेसेपी!
7
३ वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण करून बलात्कार; २४ तासांत पोलिसांनी नराधमाला यमसदनी धाडले
8
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा एकत्र होणार का? सुनील तटकर म्हणाले, 'तसा विषय..."
9
Chenab Railway Bridge: आयफेल टॉवरपेक्षाही उंच! मोदींच्या हस्ते चिनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन
10
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
11
मस्क-ट्रम्प वादात स्टारलिंकसाठी मोठी बातमी! भारताने लायसन्स दिले...
12
रशियाच्या बदल्यानं युक्रेन हादरलं! ४०० ड्रोन अन् ४० हून अधिक मिसाईल हल्ल्यानं सगळीकडे विनाश
13
IND vs ENG : पतौडी ट्रॉफी आता तेंडुलकर-अँडरसन नावाने ओळखली जाणार! गावसकर नाराज, कारण...
14
टाळ-मृदुंगात आधुनिकतेचा सूर, 'AI DIndi'तून अनुभवता येणार वारीतील नवचैतन्याची दिंडी!
15
पाण्यासाठी पाकिस्तानकडून विनवण्या, एक-दोन नव्हे चारवेळा पाठवलं पत्र! पण... 
16
तिसऱ्या मुलासाठी अधिकाऱ्यांनी प्रसूती रजा नाकारली पण सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय
17
एकीकडे युतीची चर्चा, पण दुसरीकडे मनसेचा बडा नेता मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन
18
'मी हा अध्याय संपवत आहे' टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू तडकाफडकी निवृत्त!
19
Makarand Anaspure : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मकरंद अनासपुरेंनीही केलं होतं भाष्य, म्हणालेले की, "मराठी माणूस..."
20
Narendra Modi : "तो कुटुंबासाठी कष्ट करत होता, दहशतवाद्यांनी त्याला मारलं"; आदिलच्या आठवणीत मोदी भावुक

"कुंभमेळ्यात ६० लोकांचा मृत्यू झाला, तेव्हा मी..."; बंगळुरुतल्या चेंगराचेंगरीवर CM सिद्धरामय्यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 09:16 IST

बंगळुरुतील चेंगराचेंगरीच्या घटनेवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केलेल्या विधानानंतर आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत

CM Siddaramaiah on Bengaluru Stampede: तब्बल १८ वर्षांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीलएलच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. त्यामुळे बंगळुरूच्या संघाचा विजयोत्सव बुधवारी साजरा करण्यात आला. मात्र काही वेळातच आरसीबीच्या आयपीएल विजयाचा उत्सव एका मोठ्या अपघातात बदलला. आरसीबीच्या संघातील क्रिकेटपटूंचा सत्कार सोहळा चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार होता. यासाठी स्टेडियमबाहेर लाखो चाहत्यांची गर्दी उसळली होती. परंतु, ही गर्दी पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर गेल्याने तिथे चेंगराचेंगरी झाली आणि ११ जणांचा मृत्यू झाला, तर ४७ जण जखमी झाले. या दुर्दैवी घटनेनंतर राजकारणही पेटलं आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घटनेबाबत बोलताना कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीचे उदाहरण दिल्याने नवा वाद उफाळून आला आहे.

बुधवारी बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत किमान ११ जणांचा मृत्यू झाला आणि ४७ जण जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बंगळुरुचा संघ विशेष विमानाने पोहोचल्यानंतर संघाला मिरवणुकीद्वारे चिन्नास्वामी स्टेडियमकडे घेऊन जाण्याचे नियोजन होते. मात्र  याचवेळी चेंगराचेंगरी झाली. ही घटना घडल्यानंतर खेळाडूंचा सत्कार सोहळा दहा मिनिटांत संपविण्यात आला. अपेक्षेपेक्षा मोठ्या संख्येने म्हणजे सुमारे दोन ते तीन लाख लोक चिन्नास्वामी स्टेडियम परिसरात जमले होते. चेंगराचेंगरीत मरण पावलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत कर्नाटक सरकार देणार आहे, असं मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी दिले. 

बंगळुरूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेसाठी भाजपने कर्नाटकच्या काँग्रेस सरकारला जबाबदार धरले आहे. काँग्रेस सरकारच्या बेजबाबदारपणामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकांचा मृत्यू झाला. गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे कोणतेही नियोजन नव्हते. कोणतीही मूलभूत व्यवस्था नव्हती असा आरोप भाजपने केला. दुसरीकडे, कर्नाटक सरकारने जबाबदारी झटकून टाकली आणि क्रिकेट असोसिएशनला दोष दिला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपच्या प्रश्नांना उत्तर देताना महाकुंभ मेळ्यादरम्यानही चेंगराचेंगरीही झाली होती, असं म्हटलं आहे.

"अशा घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत. मी त्यांची तुलना करून आणि इकडेही तेच घडले असे म्हणून त्याचे समर्थन करणार नाही. कुंभमेळ्यात ५०-६० लोकांचा मृत्यू झाला होता. मी टीका केली नाही. जर काँग्रेस टीका करत असेल तर ती वेगळी बाब आहे. त्या घटनेवर मी किंवा कर्नाटक सरकारने टीका केली होती का?," असा सवाल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला.

"मला या घटनेचा बचाव करायचा नाही. आमचे सरकार या घटनेचे राजकारण करणार नाही. मी दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले आहेत आणि त्यांना १५ दिवसांची मुदत दिली आहे. लोकांनी स्टेडियमचे दरवाजेही तोडले आणि चेंगराचेंगरी झाली. इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी येण्याची कोणालाही अपेक्षा नव्हती. स्टेडियमची क्षमता फक्त ३५,००० लोकांची आहे, पण २-३ लाख लोक आले होते," असेही मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले. 

टॅग्स :Bengaluru Stampedeबंगळुरुमध्ये चेंगराचेंगरीRoyal Challengers Bangaloreरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरsiddaramaiahसिद्धरामय्या