शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
4
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
5
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
6
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
7
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
8
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
9
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
10
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
11
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
12
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
13
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
14
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
15
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
16
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
17
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
18
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
19
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
20
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; आतापर्यंत १४ मृत्यू ८० हून अधिक जखमी

"कुंभमेळ्यात ६० लोकांचा मृत्यू झाला, तेव्हा मी..."; बंगळुरुतल्या चेंगराचेंगरीवर CM सिद्धरामय्यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 09:16 IST

बंगळुरुतील चेंगराचेंगरीच्या घटनेवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केलेल्या विधानानंतर आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत

CM Siddaramaiah on Bengaluru Stampede: तब्बल १८ वर्षांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीलएलच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. त्यामुळे बंगळुरूच्या संघाचा विजयोत्सव बुधवारी साजरा करण्यात आला. मात्र काही वेळातच आरसीबीच्या आयपीएल विजयाचा उत्सव एका मोठ्या अपघातात बदलला. आरसीबीच्या संघातील क्रिकेटपटूंचा सत्कार सोहळा चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार होता. यासाठी स्टेडियमबाहेर लाखो चाहत्यांची गर्दी उसळली होती. परंतु, ही गर्दी पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर गेल्याने तिथे चेंगराचेंगरी झाली आणि ११ जणांचा मृत्यू झाला, तर ४७ जण जखमी झाले. या दुर्दैवी घटनेनंतर राजकारणही पेटलं आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घटनेबाबत बोलताना कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीचे उदाहरण दिल्याने नवा वाद उफाळून आला आहे.

बुधवारी बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत किमान ११ जणांचा मृत्यू झाला आणि ४७ जण जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बंगळुरुचा संघ विशेष विमानाने पोहोचल्यानंतर संघाला मिरवणुकीद्वारे चिन्नास्वामी स्टेडियमकडे घेऊन जाण्याचे नियोजन होते. मात्र  याचवेळी चेंगराचेंगरी झाली. ही घटना घडल्यानंतर खेळाडूंचा सत्कार सोहळा दहा मिनिटांत संपविण्यात आला. अपेक्षेपेक्षा मोठ्या संख्येने म्हणजे सुमारे दोन ते तीन लाख लोक चिन्नास्वामी स्टेडियम परिसरात जमले होते. चेंगराचेंगरीत मरण पावलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत कर्नाटक सरकार देणार आहे, असं मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी दिले. 

बंगळुरूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेसाठी भाजपने कर्नाटकच्या काँग्रेस सरकारला जबाबदार धरले आहे. काँग्रेस सरकारच्या बेजबाबदारपणामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकांचा मृत्यू झाला. गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे कोणतेही नियोजन नव्हते. कोणतीही मूलभूत व्यवस्था नव्हती असा आरोप भाजपने केला. दुसरीकडे, कर्नाटक सरकारने जबाबदारी झटकून टाकली आणि क्रिकेट असोसिएशनला दोष दिला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपच्या प्रश्नांना उत्तर देताना महाकुंभ मेळ्यादरम्यानही चेंगराचेंगरीही झाली होती, असं म्हटलं आहे.

"अशा घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत. मी त्यांची तुलना करून आणि इकडेही तेच घडले असे म्हणून त्याचे समर्थन करणार नाही. कुंभमेळ्यात ५०-६० लोकांचा मृत्यू झाला होता. मी टीका केली नाही. जर काँग्रेस टीका करत असेल तर ती वेगळी बाब आहे. त्या घटनेवर मी किंवा कर्नाटक सरकारने टीका केली होती का?," असा सवाल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला.

"मला या घटनेचा बचाव करायचा नाही. आमचे सरकार या घटनेचे राजकारण करणार नाही. मी दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले आहेत आणि त्यांना १५ दिवसांची मुदत दिली आहे. लोकांनी स्टेडियमचे दरवाजेही तोडले आणि चेंगराचेंगरी झाली. इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी येण्याची कोणालाही अपेक्षा नव्हती. स्टेडियमची क्षमता फक्त ३५,००० लोकांची आहे, पण २-३ लाख लोक आले होते," असेही मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले. 

टॅग्स :Bengaluru Stampedeबंगळुरुमध्ये चेंगराचेंगरीRoyal Challengers Bangaloreरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरsiddaramaiahसिद्धरामय्या