शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

जनतेने 18% GST लावला अन् BJP च्या जागा 303 वरुन 240 वर आल्या; AAP खासदाराची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 18:04 IST

आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा वाढती महागाई, घसरलेले उत्पन्न आणि बेरोजगारी यासह अनेक मुद्द्यांवरुन भाजपवर जोरदार हल्ला चढवला.

Raghav Chadha in Rajya Sabha : केंद्र सरकारने 23 जुलै रोजी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आता संसदेत त्यावर चर्चा सुरू आहे. दरम्यान, आज राज्यसभेतील चर्चेदरम्यान आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांनी भाजपवर बोचरी टीका केली. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या कमी झालेल्या जागांवर बोलताना ते म्हणाले की, देशातील जनतेने भाजपच्या जागांवर 18 टक्के जीएसटी लावला आणि पक्षाची संख्या 240 वर आणली.

यावेळी राघव यांनी वस्तू आणि सेवा करात (GST) सुधारणा, पुनरावलोकन आणि सुलभीकरण सुचवले. तसेच, जीएसटीचे 'गब्बर सिंग टॅक्स' असे वर्णन करत म्हणाले की, 2019 मध्ये भाजपने 303 जागा जिंकल्या. पण, यंदा या देशातील जनतेने भाजपच्या जागांवर जागांवर 18% GST लावला आणि संख्या 240 वर आणली. आपल्या भाषणात राघव चढ्ढा यांनी ग्रामीण भागातील वाढती महागाई, घसरलेले ग्रामीण उत्पन्न, अन्नधान्याची वाढती महागाई आणि बेरोजगारी यासह अनेक मुद्द्यांवर भाजपवर जोरदार हल्ला चढवला.

घसरलेले ग्रामीण उत्पन्न आणि वाढत्या महागाईवरुन सरकारवर टीका करताना चढ्ढा म्हणाले की, 2023-24 या आर्थिक वर्षात ग्रामीण उत्पन्नाची वाढ दशकाच्या नीचांकावर आहे आणि वास्तविक ग्रामीण वेतनात गेल्या 25 महिन्यांत सातत्याने घट झाली आहे. आज परिस्थिती अशी आहे की, 2014 मध्ये 3 किलो डाळ विकत घेणारा मजूर आज तीच डाळ फक्त 1.5 किलो खरेदी करू शकतो. 

ते पुढे म्हणाले, आज आपण भारतात ब्रिटनप्रमाणे कर भरत आहोत आणि सोमालियासारख्या सेवा मिळत आहेत. अन्नधान्य महागाई 9 ते 9.5% दरम्यान आहे. ज्या वस्तूंवर आपण स्वावलंबी होतो आणि ज्यांची निर्यातही करत होतो, त्या वस्तूंमध्येही आपण महागाईचा अनुभव घेत आहोत. 2014 मध्ये एक किलो गव्हाची किंमत 21 रुपये होती, ती 2024 मध्ये वाढून 42 रुपये प्रति किलोग्रॅम झाली. ही परिस्थिती वाढती महागाई आणि घसरलेल्या वेतनाचा परिणाम आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :AAPआपBJPभाजपाRajya Sabhaराज्यसभा