शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
3
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
4
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
5
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
6
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांनी टीका
7
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
8
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
9
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
10
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
11
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
12
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
13
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
14
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
15
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
16
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
17
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
18
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
19
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
20
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
Daily Top 2Weekly Top 5

लाेक ‘तारीख पे तारीख’ला कंटाळले, त्यांना हवी तडजाेड...; लोक अदालत सप्ताहात सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2024 06:27 IST

सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी पुढे सांगितले की, लोक अदालत स्थापन करण्यात मला बार आणि बेंच असे सर्वांकडूनच खूप पाठबळ मिळाले. न्यायप्रक्रिया व्यापक व्हावी, यासाठी लोक अदालतीच्या प्रत्येक पॅनलवर २ न्यायमूर्ती आणि २ बारचे सदस्य राहतील, याची आम्ही खबरदारी घेतली.

नवी दिल्ली : लोक न्यायालयीन प्रकरणांना एवढे कंटाळले आहेत की, त्यांना आता केवळ तडजोड हवी आहे, असे प्रतिपादन भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी शनिवारी केले. 

सर्वोच्च न्यायालयात आयोजित विशेष लोक अदालत सप्ताहानिमित्ताने सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटले की, लोक न्यायालयीन प्रकरणांना एवढे कंटाळले आहेत की, त्यांना कोणतीही तडजोड हवी आहे. बस्स, न्यायालयापासून आम्हांला दूर करा, एवढेच त्यांचे म्हणणे आहे. न्यायालयीन प्रक्रिया म्हणजे एक शिक्षाच असून, ही बाब आपणा सर्वांसाठीच चिंतेची आहे. लोक अदालत हा तडजोडीसाठी उत्तम पर्याय आहे, असे चंद्रचूड म्हणाले.

सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी पुढे सांगितले की, लोक अदालत स्थापन करण्यात मला बार आणि बेंच असे सर्वांकडूनच खूप पाठबळ मिळाले. न्यायप्रक्रिया व्यापक व्हावी, यासाठी लोक अदालतीच्या प्रत्येक पॅनलवर २ न्यायमूर्ती आणि २ बारचे सदस्य राहतील, याची आम्ही खबरदारी घेतली. मी सरन्यायाधीश पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून देशभरातून अधिकारी आणण्याचा प्रयत्न केला आहे.

सुरुवातीला सात पीठांपासून लोकअदालतीला सुरुवात करण्यात आली होती. आम्ही यशस्वी होऊ काय, याबाबत आम्ही साशंक होतो. गुरुवारपर्यंत १३ न्यायपीठे झाली असून, त्यांच्याकडे भरपूर काम आहे. न्याय लोकांच्या घरापर्यंत घेऊन जाणे हा लाेक अदालतीचा हेतू आहे. प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करणे हाही त्यामागील एक उद्देश आहे.     - डी. वाय. चंद्रचूड, सरन्यायाधीश

पहिली लोकअदालत भगवान श्रीकृष्णाने आयोजित केलीपहिली लोक अदालत भगवान श्रीकृष्णाने आयोजित केली होती. कौरव व पांडव यांच्यातील वाद सोडविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. रामधारीसिंह दिनकर यांच्या रचनेचा दाखला देत, भगवान कृष्णाने शांततेच्या मार्गाने समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केल्याचे कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल म्हणाले. विवाहाशी निगडित वादांवर तोडगा काढण्यासाठी घेतलेल्या भूमिकेबद्दल त्यांनी न्यायालयाचे कौतुक केले. कधी काळी कुटुंबातील वादावर घरातील वरिष्ठ नागरिक तोडगा काढत होते. आता मात्र वादावर तोडगा काढण्याचे काम व्यवस्थेला करावे लागत आहेत, असे मेघवाल म्हणाले. 

टॅग्स :DY Chandrachudडी. वाय. चंद्रचूडSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालय