शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

लोकांवर विचारसरणी लादली जातेय

By admin | Updated: October 18, 2015 02:08 IST

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट लक्ष्य साधताना त्यांचे सरकार लोकांवर आपली विचारसरणी लादण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला.

बक्सर (बिहार) : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट लक्ष्य साधताना त्यांचे सरकार लोकांवर आपली विचारसरणी लादण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला.बिहार विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने येथे आयोजित पक्षाच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या. मोदी सरकारच्या कार्यकाळात सांप्रदायिक उन्माद निर्माण करण्यात येत असल्याचा आरोप करून गांधी म्हणाल्या, अफवांवरून निर्दोष लोकांचे बळी जात आहे. यामुळे देशाची लोकशाही आणि सामाजिक सलोखा धोक्यात आला आहे. सहा दशकांच्या काँग्रेस शासनावर मोदींकडून वारंवार होणाऱ्या हल्ल्यांचा त्यांनी यावेळी खरपूस समाचार घेतला. काँग्रेसने देशात लोकशाही बळकट करण्याचा सातत्याने प्रयत्न केला आणि मोदी यांचे पंतप्रधानपदी विराजमान होणे हे त्याचेच फलित आहे. याउलट केंद्रातील भाजपाप्रणीत सरकार मात्र लोकशाही मूल्यांपासून भरकटले आहे. लोकांवर आपली विचारसरणी थोपून हे सरकार लोकशाहीसाठी मोठा धोका निर्माण करीत असून सांप्रदायिक तणाव निर्माण करण्यात येत आहे, असे प्रत्युत्तर गांधी यांनी दिले. दादरीत गोमांस खाल्ल्याच्या अफवेवरून एका मुस्लीम इसमाची झालेली हत्या, बुद्धिजीवींवरील वाढलेले हल्ले आदी घटनांचा उल्लेख त्यांनी केला. (वृत्तसंस्था)पंतप्रधान अपयशी ठरलेत- महागाई आकाशाला भिडली असून सर्वसामान्य लोकांना जगणे कठीण झाले आहे.- महिला व युवापिढीला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यास पंतप्रधान अपयशी ठरले आहेत.- काँग्रेसने ६० वर्षात काय केले अशी विचारणा केली जाते. आमच्या पक्षाने अनेक क्षेत्रात क्रांतिकारक बदल केले. काँग्रेसने या देशाची एकता, अखंडता आणि वारसा जपून ठेवला.- बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात येत्या २८ आॅक्टोबरला ५० जागांवर मतदान होणार आहे.