शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

लोकांवर विचारसरणी लादली जातेय

By admin | Updated: October 18, 2015 02:08 IST

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट लक्ष्य साधताना त्यांचे सरकार लोकांवर आपली विचारसरणी लादण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला.

बक्सर (बिहार) : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट लक्ष्य साधताना त्यांचे सरकार लोकांवर आपली विचारसरणी लादण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला.बिहार विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने येथे आयोजित पक्षाच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या. मोदी सरकारच्या कार्यकाळात सांप्रदायिक उन्माद निर्माण करण्यात येत असल्याचा आरोप करून गांधी म्हणाल्या, अफवांवरून निर्दोष लोकांचे बळी जात आहे. यामुळे देशाची लोकशाही आणि सामाजिक सलोखा धोक्यात आला आहे. सहा दशकांच्या काँग्रेस शासनावर मोदींकडून वारंवार होणाऱ्या हल्ल्यांचा त्यांनी यावेळी खरपूस समाचार घेतला. काँग्रेसने देशात लोकशाही बळकट करण्याचा सातत्याने प्रयत्न केला आणि मोदी यांचे पंतप्रधानपदी विराजमान होणे हे त्याचेच फलित आहे. याउलट केंद्रातील भाजपाप्रणीत सरकार मात्र लोकशाही मूल्यांपासून भरकटले आहे. लोकांवर आपली विचारसरणी थोपून हे सरकार लोकशाहीसाठी मोठा धोका निर्माण करीत असून सांप्रदायिक तणाव निर्माण करण्यात येत आहे, असे प्रत्युत्तर गांधी यांनी दिले. दादरीत गोमांस खाल्ल्याच्या अफवेवरून एका मुस्लीम इसमाची झालेली हत्या, बुद्धिजीवींवरील वाढलेले हल्ले आदी घटनांचा उल्लेख त्यांनी केला. (वृत्तसंस्था)पंतप्रधान अपयशी ठरलेत- महागाई आकाशाला भिडली असून सर्वसामान्य लोकांना जगणे कठीण झाले आहे.- महिला व युवापिढीला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यास पंतप्रधान अपयशी ठरले आहेत.- काँग्रेसने ६० वर्षात काय केले अशी विचारणा केली जाते. आमच्या पक्षाने अनेक क्षेत्रात क्रांतिकारक बदल केले. काँग्रेसने या देशाची एकता, अखंडता आणि वारसा जपून ठेवला.- बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात येत्या २८ आॅक्टोबरला ५० जागांवर मतदान होणार आहे.