शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

पेन्शन थकबाकी उशिरा मागितली म्हणून नाकारता येणार नाही : सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 08:55 IST

Supreme Court : एम.एल. पाटील आणि इतरांना गोवा सरकारने वयाच्या ६० ऐवजी ५८व्या वर्षी सेवानिवृत्त केले

- डॉ. खुशालचंद बाहेती

नवी दिल्ली : निवृत्तीवेतनाची थकबाकी मागणी करण्यास उशीर झाला या कारणास्तव ती नाकारता येत नाही. निवृत्तीवेतन हे सतत कारवाईचे कारण आहे. यामुळे यात उशीर नसतो, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

एम.एल. पाटील आणि इतरांना गोवा सरकारने वयाच्या ६० ऐवजी ५८व्या वर्षी सेवानिवृत्त केले. ते जेव्हा सरकारी सेवेमध्ये रुजू झाले तेव्हाच्या सेवा अटीप्रमाणे वयाच्या ६० वर्षांनंतर ते निवृत्तीस पात्र होते. शासनाच्या ५८व्या वर्षी निवृत्ती देणाऱ्या आदेशाविरुद्ध त्यांनी २०१५ मध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली. २०२० मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने या याचिकेचा निकाल त्यांच्या बाजूने दिला. 

५८व्या वर्षी झालेली निवृत्ती बेकायदेशीर असल्याचे हायकोर्टाने ठरवले. मात्र, हायकोर्टाने पाटील यांना हायकोर्टात यायला उशीर झाल्याचे मत व्यक्त केले. यामुळे ते दोन वर्षांचा पगार मिळण्यास पात्र नाहीत. त्यांनी वयाची ६० वर्षे पूर्ण होईपर्यंत सेवा सुरू ठेवल्याच्या आधारावर पेन्शनची गणना केली जाईल; परंतु पेन्शनची कोणतीही थकबाकी दिली जाणार नाही. सुधारित दरांवरील पेन्शनदेखील ०१/०१/२०२० पासूनच देय असेल असे आदेश दिले. या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले. दरम्यान पाटील यांचे निधन झाले. 

हायकोर्टाचा आदेश केला रद्दसुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती एम. आर. शहा आणि बी.व्ही. नागरथना यांच्या खंडपीठाने निवृत्तीवेतनाची थकबाकी नाकारण्याचा हायकोर्टाचा आदेश रद्द केला.पेन्शन हे सतत कारवाईचे कारण आहे. त्यामुळे उशिरा मागणी केली म्हणता येणार नाही. पेन्शनची थकबाकी नाकारण्याचे कोणतेही औचित्य नाही, असे निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवले. सुप्रीम कोर्टाने पेन्शनची थकबाकी चार आठवड्यांत देण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय