शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पेन्शन थकबाकी उशिरा मागितली म्हणून नाकारता येणार नाही : सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 08:55 IST

Supreme Court : एम.एल. पाटील आणि इतरांना गोवा सरकारने वयाच्या ६० ऐवजी ५८व्या वर्षी सेवानिवृत्त केले

- डॉ. खुशालचंद बाहेती

नवी दिल्ली : निवृत्तीवेतनाची थकबाकी मागणी करण्यास उशीर झाला या कारणास्तव ती नाकारता येत नाही. निवृत्तीवेतन हे सतत कारवाईचे कारण आहे. यामुळे यात उशीर नसतो, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

एम.एल. पाटील आणि इतरांना गोवा सरकारने वयाच्या ६० ऐवजी ५८व्या वर्षी सेवानिवृत्त केले. ते जेव्हा सरकारी सेवेमध्ये रुजू झाले तेव्हाच्या सेवा अटीप्रमाणे वयाच्या ६० वर्षांनंतर ते निवृत्तीस पात्र होते. शासनाच्या ५८व्या वर्षी निवृत्ती देणाऱ्या आदेशाविरुद्ध त्यांनी २०१५ मध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली. २०२० मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने या याचिकेचा निकाल त्यांच्या बाजूने दिला. 

५८व्या वर्षी झालेली निवृत्ती बेकायदेशीर असल्याचे हायकोर्टाने ठरवले. मात्र, हायकोर्टाने पाटील यांना हायकोर्टात यायला उशीर झाल्याचे मत व्यक्त केले. यामुळे ते दोन वर्षांचा पगार मिळण्यास पात्र नाहीत. त्यांनी वयाची ६० वर्षे पूर्ण होईपर्यंत सेवा सुरू ठेवल्याच्या आधारावर पेन्शनची गणना केली जाईल; परंतु पेन्शनची कोणतीही थकबाकी दिली जाणार नाही. सुधारित दरांवरील पेन्शनदेखील ०१/०१/२०२० पासूनच देय असेल असे आदेश दिले. या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले. दरम्यान पाटील यांचे निधन झाले. 

हायकोर्टाचा आदेश केला रद्दसुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती एम. आर. शहा आणि बी.व्ही. नागरथना यांच्या खंडपीठाने निवृत्तीवेतनाची थकबाकी नाकारण्याचा हायकोर्टाचा आदेश रद्द केला.पेन्शन हे सतत कारवाईचे कारण आहे. त्यामुळे उशिरा मागणी केली म्हणता येणार नाही. पेन्शनची थकबाकी नाकारण्याचे कोणतेही औचित्य नाही, असे निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवले. सुप्रीम कोर्टाने पेन्शनची थकबाकी चार आठवड्यांत देण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय