शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

Pegasus Case: पेगासस प्रकरण; 5 फोनमध्ये मालवेअर पण स्पायवेअरचा पुरावा नाही- सुप्रीम कोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 13:46 IST

आज सरन्यायाधिशांसमोर पेगासस हेरगिरी प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी.

नवी दिल्ली: पेगासस हेरगिरी प्रकरणाची गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यादरम्यान, न्यायमूर्ती आरव्ही रवींद्रन समितीच्या वतीने खंडपीठासमोर सीलबंद कव्हरमध्ये अहवाल सादर करण्यात आला. सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांच्या तीन सदस्यीय खंडपीठाने या अहवालाची दखल घेतली. सुनावणीदरम्यान वकील कपिल सिब्बल यांनी अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी केली. याला सरन्यायाधीशांनी नकार दिला आणि न्यायालय या अहवालाची चौकशी करेल असे सांगितले. समितीच्या शिफारशी सार्वजनिक केल्या जातील असेही CJI म्हणाले.

या प्रकरणाची पुढील सुनावणी महिनाभरानंतर होईल, असे आदेश रमणा यांनी दिले आहेत. समितीच्या तपासात केंद्र सरकारने सहकार्य केले नसल्याचे त्यांनी सांगितले. सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, समितीच्या अहवालाचा विचार केला तर तांत्रिक समितीला 29 मोबाईल फोनमध्ये पेगासस वापरल्याचे पुरावे मिळालेले नाहीत. यापैकी 5 मोबाईल फोनवर कोणत्या ना कोणत्या मालवेअरचा प्रभाव असल्याचे आढळून आले मात्र ते पेगाससचेच होते, असे पुरावे मिळाले नाहित.

तीन भागात अहवाल CJI म्हणाले की, अहवाल तीन भागात आहे. या समितीने कायद्यात सुधारणा करून तो अधिक कठोर करण्याची शिफारस केली आहे.  सरन्यायाधीशांनी अहवाल वाचून सहा पैलू सांगितले. ते म्हणाले, “समितीचा अहवाल सार्वजनिक केला जाणार नाही. असे 29 फोन होते ज्यात मालवेअर सापडले. याचा अर्थ असा नाही की प्रत्येकाकडे पेगासस होता.'' सध्याच्या सायबर कायद्यात काही सुधारणा केल्या पाहिजेत, असा सल्ला या रिपोर्टमध्ये देण्यात आला आहे. 

काय आहे प्रकरण?एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता की, 2019 मध्ये भारतातील किमान 1400 लोकांचे खाजगी मोबाईल किंवा सिस्टमची हेरगिरी केली जात आहे. यात 40 प्रसिद्ध पत्रकार, विरोधी पक्षाचे तीन मोठे नेते, घटनात्मक पदावर असलेले एक मान्यवर, केंद्र सरकारचे दोन मंत्री, सुरक्षा यंत्रणांचे अनेक उच्चपदस्थ अधिकारी, दिग्गज उद्योगपती यांचाही यात समावेश असल्याचे सांगण्यात आले. बराच गदारोळ झाल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय