शहरं
Join us  
Trending Stories
1
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
6
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
7
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
8
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
9
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
10
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
11
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
12
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
13
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
14
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
15
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
16
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
17
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
18
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
19
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
20
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली

काश्मीरवर लक्ष द्या, अन्यथा युद्धाचा भडका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 06:38 IST

इम्रान खान यांचा इशारा । चर्चेसाठी सर्व पक्ष, काश्मिरींनाही सहभागी करून घ्या

इस्लामाबाद : काश्मीरवर भारताने घेतलेला निर्णय रोखण्यासाठी जगाने काहीही केले नाही, तर दोन्ही अण्वस्त्र सज्ज देश युद्धापर्यंत पोहोचतील, असा इशारा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिला आहे. न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रकाशित एका लेखात इम्रान खान यांनी म्हटले आहे की, काश्मीरवर चर्चेसाठी सर्व पक्ष विशेषत: काश्मिरींनाही सहभागी करून घ्यावे; पण काश्मीरबाबत भारताने घेतलेला निर्णय मागे घेतला तरच भारताशी चर्चा होऊ शकेल. त्यासाठी भारताने अगोदर तेथून सैन्य माघारी घ्यावे.

इम्रान खान म्हणाले की, गत आॅगस्टमध्ये आपण पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर दक्षिण आशियात शांतता निर्माण करणे ही आपली प्राथमिकता होती. मात्र, शांततेसाठी चर्चा करण्याचा मार्ग भारताकडून बंद करण्यात आला. जागतिक समुदायाने या मुद्याकडे व्यापारी संबंध आणि लाभ याच्यापलीकडे जाऊन पाहावे. काश्मीर मुद्यावर जागतिक समुदायाने काही पाऊल उचलले नाही तर, पूर्ण जगाला याचे परिणाम भोगावे लागतील. कारण, दोन्ही देश अण्वस्त्र सज्ज आहेत, यामुळे युद्धाचा भडका उडू शकतो.जानेवारी २०१६ मध्ये पठाणकोटमध्ये पाकिस्तानच्या अतिरेक्यांकडून झालेल्या हल्ल्यानंतर या दोन देशांतील संवाद तुटलेला आहे. चर्चा आणि दहशतवाद एकाच वेळी सोबत चालू शकत नाहीत, अशी भूमिका भारताने घेतलेली आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरImran Khanइम्रान खान