शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

काश्मीरवर लक्ष द्या, अन्यथा युद्धाचा भडका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 06:38 IST

इम्रान खान यांचा इशारा । चर्चेसाठी सर्व पक्ष, काश्मिरींनाही सहभागी करून घ्या

इस्लामाबाद : काश्मीरवर भारताने घेतलेला निर्णय रोखण्यासाठी जगाने काहीही केले नाही, तर दोन्ही अण्वस्त्र सज्ज देश युद्धापर्यंत पोहोचतील, असा इशारा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिला आहे. न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रकाशित एका लेखात इम्रान खान यांनी म्हटले आहे की, काश्मीरवर चर्चेसाठी सर्व पक्ष विशेषत: काश्मिरींनाही सहभागी करून घ्यावे; पण काश्मीरबाबत भारताने घेतलेला निर्णय मागे घेतला तरच भारताशी चर्चा होऊ शकेल. त्यासाठी भारताने अगोदर तेथून सैन्य माघारी घ्यावे.

इम्रान खान म्हणाले की, गत आॅगस्टमध्ये आपण पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर दक्षिण आशियात शांतता निर्माण करणे ही आपली प्राथमिकता होती. मात्र, शांततेसाठी चर्चा करण्याचा मार्ग भारताकडून बंद करण्यात आला. जागतिक समुदायाने या मुद्याकडे व्यापारी संबंध आणि लाभ याच्यापलीकडे जाऊन पाहावे. काश्मीर मुद्यावर जागतिक समुदायाने काही पाऊल उचलले नाही तर, पूर्ण जगाला याचे परिणाम भोगावे लागतील. कारण, दोन्ही देश अण्वस्त्र सज्ज आहेत, यामुळे युद्धाचा भडका उडू शकतो.जानेवारी २०१६ मध्ये पठाणकोटमध्ये पाकिस्तानच्या अतिरेक्यांकडून झालेल्या हल्ल्यानंतर या दोन देशांतील संवाद तुटलेला आहे. चर्चा आणि दहशतवाद एकाच वेळी सोबत चालू शकत नाहीत, अशी भूमिका भारताने घेतलेली आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरImran Khanइम्रान खान