शहरं
Join us  
Trending Stories
1
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
2
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
4
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
5
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
6
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”; मंत्री चंद्रकांत पाटील
7
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
8
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
9
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
10
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
11
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
12
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
13
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
14
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
15
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
16
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
17
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
18
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
19
चांदी झाली 'सोनेरी'! २ लाख रुपये किलोचा टप्पा पार, पण गुंतवणुकीपूर्वी 'हा' भयानक इतिहास वाचा
20
इम्रान खानचा काटा काढायला असीम मुनीरचा खतरनाक प्लॅन; देशद्रोहाचा खटला चालवला जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाऊसदैना - भारत, नेपाळ आणि बांगलादेशमध्ये पुराचे 1000 बळी

By namdeo.kumbhar | Updated: August 30, 2017 09:00 IST

गेल्या सहा महिन्यात आलेल्या पावसामुळे भारत, नेपाळसह दक्षिण आशियामध्ये अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली होती. या पूरामध्ये आतापर्यंत 1000 हजारपेक्षा आधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई, दि. 30 - दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसानं सध्या विसावा घेतला आसला तरी येणाऱ्या 24 तासांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या सहा महिन्यात आलेल्या पावसामुळे भारत, नेपाळसह दक्षिण आशियामध्ये अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली होती. या पुरामध्ये आतापर्यंत 1000 हजारपेक्षा आधिक जणांचा मृत्यू झाल्याचे संयुक्त राष्ट्राच्या एका एजन्सीनं सांगितले आहे.

संयुक्त राष्ट्राच्या एजन्सीनं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यात भारत, बांगलादेश आणि नेपाळमध्ये चार कोटी दहा लाख लोकांना फटका बसला आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यात पावसाच्या तडाख्यामध्ये अनेक जनांचा बळी गेला आहे.

संयुक्त राष्टाने भारत, नेपाळ आणि बांगलादेशमध्ये पावसाचा अलर्ट जारी केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीमध्ये सततच्या पडणाऱ्या पावसामुळे तिन्ही देशाची परिस्थिती आणखी खरब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच उपाययोजना करावी असे त्यांनी सांगिलते आहे. ज्या ठिकाणी पुरस्थिती आहे तिथे आगामी 48 तासांमध्ये आणखी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

गुजरात, राजस्थान, आसाम, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पाऊस सर्वाधिक फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळं पाच राज्यातील काही शहरांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं हाहाकार उडाला. पावसामुळं आलेल्या पुरानं आतापर्यंत गुजरातमध्ये 150 जणांचा बळी घेतला आहे. अहमदाबाद, गांधीनगर, बनासकांठा, पाटण या आणि इतर भागांना या पुराचा सर्वाधिक फटका बसला. एकट्या पश्चिम बंगाल राज्यात वीज पडणे, भिंत कोसळण्यांच्या घटनांमध्ये 80 जणांचा मृत्यू झाला. अनेक ठिकाणी इमारती कोसळल्याच्या दुर्घटना घडल्या. सुमारे दोन लाख घरे तसेच चार लाख ७२ हजार ६४५ हेक्टर शेतीचे पावसामुळे नुकसान झाले आहे. दोन लाख नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. आसाम, मेघालय, नागालँड, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम या राज्यांमध्ये पावसाने हाहाकार केला होता. आहे

पुरामुळं आसाममधील 19 लाख नागरिक बाधित झाले असून 5 लाख जणांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर कऱण्यात आलं आहे. दरम्यान पुरामुळं आसाममधील 25 जणांना आपले प्राण गमवावे लागलेत. मृतांच्या नातेवाईकांना 4 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तिकडे बिहारमधीलही अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत. पुरानं बिहारमध्ये 26 जणांचा बळी घेतलाय. महानंदा नदीसह प्रमुख नद्यांना पूर आल्यामुळं परिस्थिती चांगलीच बिकट झाली आहे. बिहारप्रमाणे उत्तर प्रदेशालाही पावसानं चांगलाच तडाखा दिला.

नेपाळच्या सततच्या मुसळधार पावसामुळे आलेला पूर आणि भूस्खलनाने आतापर्यंत 150 लोक मृत्युमुखी पडले आहेत तर ३५ जण अद्यापही बेपत्ता आहेत. या पूराचा फटका सुमारे 60 लाख नागरिकांना बसला आहे. नेपाळच्या गृहमंत्र्यालयाच्या हवाल्याने ह्यमाय रिपब्लिकाह्ण वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, या नैसर्गिक आपत्तीत २,८०० घरांचे नुकसान झाले.

बांगलादेशमध्ये पावसाने थैमान घातले असून विविध भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलनात 50 पेक्षा आधिक जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये महिला व लहान मुलांची संख्या अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे. वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे रंगमाटी, बंदरबर्न, आणि चित्तगॉंग हे भाग पाण्याखाली गेले आहेत. संततधार पावसामुळे भूस्खलन झाल्याने 50 जण ठार झाले आहेत. अनेक जण ढिगाऱ्याखाली दबल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पोलीस व बचाव पथके ढिगाऱ्याखाली दबलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान येत्या ४८ तासात बांगलादेशमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

टॅग्स :Mumbai Floodedमुंबईत पावसाचा हाहाकारGovernmentसरकार