शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मुंबई, पाटणा, जयपूर, कोलकाता...देशभरातील 40 विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 17:46 IST

धमकीचा ई-मेल मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत.

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशभरातील विविध ठिकाणी बॉम्बस्फोटाच्या धमक्या दिल्या जात आहेत. आता आज(मंगळवार) मुंबई, दिल्ली आणि पाटणासह देशातील 40 विमानतळांना बॉम्बची धमकी मिळाली आहे. ही धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली आहे. धमकी मिळाल्यानंतर सर्व विमानतळांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच, पोलिस आणि सीआयएसएफने परिसराची झडती घेतली. सुदैवाने काहीही संशयास्पद आढळले नाही. यापूर्वी एप्रिलमध्येही विमानतळ अधिकाऱ्यांना अशाच प्रकारच्या धमक्या आल्या होत्या.

यापूर्वी दिल्लीहून दुबईला जाणाऱ्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली होती, पण त्यातही काही आढळले नाही. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सोमवारी सकाळी 9.35 वाजता IGI विमानतळाच्या डायल ऑफिसला एक ई-मेल मिळाला, ज्यात दिल्ली-दुबई फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर विमानाची तपासणी करण्यात आली, पण त्यात कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही.

विशेष म्हणजे, यापूर्वी एप्रिलमध्ये जयपूर, नागपूर, कानपूर, गोवासह देशातील अनेक विमानतळांना ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली होती. विमानतळ अधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर बॉम्बशोधक पथकाने विमानतळाची झडती घेतली, मात्र काहीही सापडले नाही.

शाळांना बॉम्बच्या धमक्या याआधी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीतील एका शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. पोलिस आयुक्तांच्या अधिकृत मेल आयडीवर हा धमकीचा मेल आला होता. त्यापूर्वी दिल्ली-एनसीआरमधील 150 शाळांना बॉम्बची धमकी मिळाली होती, त्यामुळे सर्वत्र दहशत पसरली होती. हा धमकीचा मेल दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांच्या अधिकृत मेल आयडीवर आला होता. धमकी दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ तपास केला आणि तो फसवा कॉल असल्याचे निष्पन्न झाले. 

टॅग्स :AirportविमानतळBombsस्फोटकेBlastस्फोट