शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांवर करुणा व सहानुभूतीने उपचारांची गरज : नायडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 01:47 IST

युवा डॉक्टरांनी भलेही त्यांची पार्श्वभूमी कोणतीही असली तरी रुग्णांवर उपचार करुणा आणि सहानुभूतीने करावा, असे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले.

नवी दिल्ली : युवा डॉक्टरांनी भलेही त्यांची पार्श्वभूमी कोणतीही असली तरी रुग्णांवर उपचार करुणा आणि सहानुभूतीने करावा, असे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले. शुक्रवारी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) ४६ व्या वार्षिक दीक्षांत समारंभात ते बोलत होते.ते म्हणाले, वैद्यकीय शिक्षणात बदल झाले आहेत म्हणून परवाना अशाच व्यक्तीला मिळावा ज्याच्याकडे उपचारांचे कौशल्य आहे. आम्हाला गुणवत्ता असलेल्या आरोग्यसेवा तयार करायला हव्यात व त्या सगळ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. एका अहवालाचा संदर्भ देऊन नायडू म्हणाले, ‘भारतात एक हजार लोकसंख्येत फक्त १.१ पलंग उपचारासाठी रुग्णालयात आहेत, तर जगात हीच सरासरी २.७ आहे. भारताची ७० टक्के आरोग्यसेवा महत्त्वाच्या २० शहरांत आहे. नायडू यांनी युवा डॉक्टर आरोग्य क्षेत्रात गुणवत्तापूर्ण सेवा देऊन शहर आणि गाव यातील अंतर संपवून टाकू शकतात, असे म्हटले.इतर देशांतून लोक भारतात येऊन मूत्रपिंड प्रत्यारोपण व गुडघे बदलण्याचे उपचार करून घेतात व त्याचवेळी अनेक भारतीयांना असे उपचार परवडत नाहीत. आम्हाला सगळ्या भारतीयांसाठी स्वस्तात उपचार सुनिश्चित करून या विरोधाभासी परिस्थितीतून बाहर यायला हवे. या दिशेने सरकारचा मेक इन इंडिया कार्यक्रम महत्त्वाचे पाऊल आहे, असे नायडू म्हणाले. दीक्षांत समारंभात डॉ. ए.के. सराया, डॉ. समीरा नंदी, डॉ. कमल बक्षी यांना आरोग्यसेवेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला गेला. त्यांनी सर्वोच्च योग्यता मिळवणाऱ्या ३१ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक आणि प्रमाणपत्र दिले. केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नद्दा आणि एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया आदी उपस्थित होते.प्रसारमाध्यमे हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे व त्याने समाजाला योग्य दिशा द्यावी ही त्याची जबाबदारी आहे, असे लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी म्हटले. त्या भारतीय जनसंचार संस्थानमध्ये आयोजित ५१ व्या दीक्षांत समारंभात बोलत होत्या. त्यांच्या हस्ते विद्यापीठ परिसरात अटल बिहारी वाजपेयी मार्गाचे उद्घाटन झाले.समारंभात ३३३ विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांच्या अभ्यासक्रमाची पदवी दिली गेली. यावेळी आयआयएमसीचे महासंचालक के.जी. सुरेश यांनी संस्कृत भाषेत संस्थेने लाल बहादूर शास्त्री संस्कृत विद्यापीठात पत्रकारिता अभ्यासक्रम सुरू केल्याचे सांगितले.दिल्लीच्या आंबेडकर विद्यापीठात झालेल्या सातव्या दीक्षांत समारंभात उपराज्यपाल अनिल बैजल युवक देशाचे भविष्य आहेत, असे म्हटले.

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडूMedicalवैद्यकीयdocterडॉक्टर