शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
5
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
6
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
7
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
8
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
9
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
10
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
11
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
12
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
13
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
14
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
15
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
16
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
17
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
18
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
19
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
20
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी

पठाणकोट हल्लेखोराची युपीए सरकारने केली होती सुटका

By admin | Updated: May 17, 2016 15:03 IST

पठाणकोट दहशतवादी हल्ल्यातील मुख्य सुत्रधार जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी शाहीद लतीफ याची युपीए सरकारने 2010 मध्ये सुटका केली होती

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 17 - पठाणकोट दहशतवादी हल्ल्यावरुन काँग्रेस सरकारने भारतीय जनता पक्षाची (भाजपा) कोंडी करण्याचा प्रयत्न केला असताना आता काँग्रेसच गोत्यात येण्याची शक्यता आहे. पठाणकोट दहशतवादी हल्ल्यातील मुख्य सुत्रधार जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी शाहीद लतीफ याची युपीए सरकारने 2010 मध्ये सुटका केली होती. जानेवारी महिन्यात पंजाबमधील पठाणकोट एअर बेसवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी शाहीद लतीफवर होती. पाकिस्तानसोबत संबंध सुधारावेत यासाठी युपीए सरकारने 2010 मध्ये  शाहीद लतीफची सुटका केली होती. 
 
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार शाहीद लतीफला दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी झाल्यावरुन अटक करण्यात आली होती. 11 वर्ष तो कारागृहात होता. 28  मे 2010 मध्ये लष्कर-ए-तोयबा, हिजाब-उल-मुजाहिद्दीन आणि जैश-ए-मोहम्महदच्या 25 दहशतवाद्यांची सुटका करण्यात आली होती. यामध्ये शाहीद लतीफचादेखील समावेश होता. शेजारी राष्ट्र पाकिस्तानसोबत संबंध सुधारावेत यासाठी यांची सुटका करण्यात आली होती. जम्मू, श्रीनगर, आग्रा, वाराणसी, नैनी आणि तिहारमधील कारागृहात हे सर्व दहशतवाही बंदिस्त होती. वाघा बॉर्डरमार्गे त्यांना पाकिस्तानात पाठवण्यात आलं होतं. 
 
विशेष म्हणजे 1999 मध्ये इंडियन एअरलाईन्सच्या IC-814 विमानाचं जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी जेव्हा अपहरण केलं होतं तेव्हा शाहीद लतीफच्या सुटकेची मागणी करण्यात आली होती. 154 प्रवाशांना त्यावेळी बंधक म्हणून ठेवण्यात आलं होतं. त्याबदल्यात मसुद अजहर आणि अतर दोघांची सुटका करण्यात आली होती. मात्र वाजपेयी सरकारने दहशतवाद्यांच्या यादीतील शाहीद लतीफ आणि इतर 31 जणांची सुटका करण्यास नकार दिला होता. 
1999 मध्ये एनडीए सरकारने मुश्ताक अहमद जरगार आणि ओमर शेख यांची सुटका केली होती. अमेरिकन पत्रकार डॅनिअल पर्ल यांचं अपहरण करुन त्यांनी हत्या केली होती. 
 
दिल्लीत पठाणकोट हल्ल्याची तयारी - 
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दिल्लीच्या बाहेर तसंच उत्तर आणि पश्चिम दिल्लीत छापेमारी करत 12 दहशतवाद्यांना अटक केली होती. यामध्ये या तीन दहशतवाद्यांचादेखील समावेश आहे. चौकशी केली असता दिल्लीतील एअरबेस तसंच दिल्ली गाजियाबाद सीमारेषेवरील मॉलवर हल्ला करण्याच्या तयारीत होते अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दिली.दहशतवाद्यांचा म्होरक्या साजीदला उत्तर-पूर्व दिल्लीच्या चांदबाग नगरमधून अटक करण्यात आली होती. तर शाकीर आणि समीर यांनी उत्तरप्रदेश आणि गोरखपूरमधून अटक करण्यात आली होती. 
पठाणकोट हल्ला - 
2 जानेवारीला पठाणकोट एअर बेसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता ज्यामध्ये 7 जवान शहीद झाले होते. या दहशतवादी हल्यानंतर भारताने या हल्याचा कट पाकिस्तानमध्ये रचला गेल्याचे पुरावे दिले होते. तसंच या हल्यामागे जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या अजहर मसूद याचा हात असल्याचेही ठोस पुरावे देत कारवाई करण्याची मागणी भारताने वारंवार केली होती.