शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

राजधानी एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना लुटलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 11:31 IST

मुंबई-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसमध्ये चोरट्यांनी  लाखो रूपयांचा डल्ला मारल्याची घटना उघड झाली आहे.

ठळक मुद्देमुंबई-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसमध्ये चोरट्यांनी  लाखो रूपयांचा डल्ला मारल्याची घटना उघड झाली आहे. प्रवाशांकडील तीन ते पाच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला असल्याची माहिती मिळते आहे.राजस्थानमधील कोटा येथे बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली असून एक्स्प्रेसच्या एसी-२ टायर आणि एसी-३ टायर अशा नऊ डब्यांमधील प्रवाशांकडील ऐवज चोरीला गेला आहे.

कोटा, दि. 17- मुंबई-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसमध्ये चोरट्यांनी  लाखो रूपयांचा डल्ला मारल्याची घटना उघड झाली आहे. प्रवाशांकडील तीन ते पाच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला असल्याची माहिती मिळते आहे. राजस्थानमधील कोटा येथे बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली असून एक्स्प्रेसच्या एसी-२ टायर आणि एसी-३ टायर अशा नऊ डब्यांमधील प्रवाशांकडील ऐवज चोरीला गेला आहे. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, एक्स्प्रेसमधील 24 प्रवाशांनी त्यांच्याकडील सामान चोरी झाल्याची तक्रार केली आहे. यापैकी अकरा जणांनी निजामुद्दीन जीआरपीकडे चोरी झाल्याची तक्रार केली तर काही जणांनी मथुरा जीआरपीकडे चोरीची तक्रार केल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. 

आणखी वाचारस्त्यावर नमाज रोखू शकत नाही तर, पोलीस स्थानकात जन्माष्टमी कशी थांबवू - योगी आदित्यनाथराजौरीजवळच्या नियंत्रण रेषेवर जम्मू-काश्मीर सरकार बनवतंय 100 बंकर्स

प्रवाशांना पदार्थांमधून गुंगीचं औषध दिल्यानंतर झोप लागली. तेव्हा संधीचा फायदा घेत चोरट्यांनी बॅगांमधील रोकड आणि दागिने चोरून तेथून पसार झाल्याचं या प्रवाशांनी तक्रारीत म्हंटलं आहे.. काही प्रवाशांची रिकामी केलेली पाकीटं आणि पर्स एक्स्प्रेसमधील स्वच्छतागृहात सापडली, अशी माहितीही त्यांनी दिली.

माझ्याकडील एकुण 21 हजार 400 रूपयांचा ऐवज चोरीला गेला. तसंच या एक्स्प्रेसमधील एकुण सात ते आठ कोचेसमध्ये चोरी झाल्याचं समजलं असल्याची माहिती एका प्रवाशाने दिली आहे.

प्रवासादरम्यान बोगीतील सर्व प्रवाशांना अचानक गाढ झोप लागली. झोपेतून उठल्यावर आमच्याकडील पाकीटं आणि मौल्यवान वस्तू गायब झाल्याचं आमच्या लक्षात आलं. आम्ही लगेचच अटेंन्डंटला बोलावलं पण त्यांनी काहीही पाऊल उचलली नाही, असं एका प्रवाशाने म्हंटलं आहे.  या एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचा आयफोन, पासपोर्ट आणि अठरा हजार रूपयांची रोख रक्कम चोरीला गेली आहे. 

याआधीही अशा प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. या घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी एक्स्प्रेसमधील डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यामुळं घटनांचं प्रमाण कमी झालं आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिली आहे.