शहरं
Join us  
Trending Stories
1
शुक्रवारची रात्र असती तर...! गोव्यातील त्या क्लबमध्ये हाहाकार उडाला असता; नाताळ, थर्टीफर्स्टपूर्वी पर्यटकांत खळबळ...
2
स्फोटानंतर घाबरून बेसमेंटमध्ये पळाले लोक; २० जणांचा तिथेच गुदमरून जीव गेला, आतापर्यंत २५ मृत्यू
3
झोंबणाऱ्या थंडीनं भरलं कापरं, उत्तर भारतात थंडीची लाट; उत्तराखंड, हिमाचलमध्ये बर्फवृष्टीचा इशारा
4
शनिवारची रात्र, गोव्यात क्लबमध्ये सिलिंडर स्फोट; २५ मृतांमध्ये चार पर्यटक, उर्वरित नाईट क्लबचा स्टाफ...
5
आदिवासी, ओबीसींचा वेगळा विदर्भ व्हायला हवा; विजय वडेट्टीवार : काँग्रेस श्रेष्ठींकडे पाठपुरावा करणार
6
विरोधी पक्षनेता नसेल तर उपमुख्यमंत्रिपदही रद्द करा; उद्धव ठाकरे : सरकार विरोधी पक्षाला घाबरते का?
7
दिल्लीत PM नरेंद्र मोदी अन् राज ठाकरे एकत्र; मुलगा अमित अन् नातू किआननं मोदींसोबत काढला फोटो
8
गोव्यातील क्लबमध्ये भीषण आग, २३ जणांचा मृत्यू; सिलिंडर स्फोट झाल्याची शक्यता, CM कडून चौकशीचे आदेश
9
Indigo आज १५०० उड्डाणे घेणार, १३५ ठिकाणांना जोडणार; एअरलाइन्सनं जारी केले निवेदन
10
आजचे राशीभविष्य, ०७ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभाची संधी पण नकारात्मक विचार दूर करणे हितावह राहील
11
‘स्थानिक’ निवडणुकीची रणधुमाळी; ‘हिवाळी’ अधिवेशन ठरणार वादळी; उद्यापासून नागपुरात प्रारंभ; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
12
धक्कादायक... मेळघाटात व्यसनामुळे वाढतोय कॅन्सर; युवा ते प्रौढ व्यक्तींमध्ये रक्ताल्पता : संशोधन चमू काढणार निष्कर्ष
13
क्रेडिट कार्डांच्या विळख्यात..! क्रेडिट कार्डवर राेख रक्कम उचलली तर काय हाेते?
14
हा हा हा... आमच्यासारखे तुम्हाला भांडता येते का...?
15
विमान तिकीट दरवाढीला केंद्राचा चाप, चौथ्या दिवशीही इंडिगोचा घोळ कायम
16
घोडबंदर मार्गावर आज ‘अवजड’ प्रवेशबंदी; मोठा पोलिस फौजफाटा तैनात, पण कोंडी टळणार का?
17
इंडिगोवर रेल्वेचा दिलासा : ३७ ट्रेनला ११६ अतिरिक्त डबे, मध्य आणि पश्चिम रेल्वे चालवणार ४९ विशेष फेऱ्या
18
डॉ. आंबेडकरांनी भारताच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले : राज्यपाल
19
राणीच्या बागेत झेब्रा, जिराफ, जॅग्वार, चिंपांझीसाठी लगबग..! ‘एक्झॉटिक झोन’साठी प्रक्रिया सुरू; १७ प्रदर्शिनी, सुविधा निर्माण करणार
20
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
Daily Top 2Weekly Top 5

तिकीट काढले विमानाचे, प्रवास घडला कारचा; Air India च्या प्रवाशांसोबत नेमके काय घडले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 15:32 IST

टाटा ग्रुपची Air India गेल्या काही काळापासून चर्चेत आहे.

Air India News: कल्पना करा की, तुम्ही विमानाचे तिकीट काढता आणि विमानतळावर वेळेत पोहोचता, पण तुम्हाला विमानात बसू दिले नाही. तुम्हाला सांगितले जाते की, विमानातील सर्व फुल्ल झाले आहे, त्यामुळे तुमच्यासाठी कारची व्यवस्था करण्यात आली आहे. अशावेळी तुमची काय अवस्था होईल..? गुजरातच्या भुज विमानतळावर एअर इंडियाच्या प्रवाशांची अशीच अवस्था झाली. 

काय घडले?अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघाताच्या घटनेपासून एअर इंडिया कुठल्या ना कुठल्या कारणाने सतत चर्चेत येत आहे. गेल्या शनिवारी भुज विमानतळावर एअर इंडियाच्या प्रवाशांना एका विचित्र समस्येचा सामना करावा लागला. प्रवाशांनी मुंबईला जाण्यासाठी तिकीट काढले, मात्र एअर इंडियाकडून त्या प्रवाशांसाठी कारने जाण्याची व्यवस्था करण्यात आली. टाईम्स ऑफ इंडिया (TOI) च्या बातमीनुसार, एअर इंडियाचे विमान AI609 शनिवारी सकाळी 8:55 वाजता भुजहून मुंबईला जाणार होते. 

काही प्रवाशांनी चेक इन केले, बोर्डिंग पासही घेतले. परंतु 13 प्रवासी विमानात चढू शकले नाहीत. विमानात बसायला जागा नाही, असे या प्रवाशांना सांगण्यात आले. त्यातील बरेच प्रवासी कच्छ जिल्ह्यातील दुर्गम भागातून विमान पकडण्यासाठी आले होते. तांत्रिक कारणांमुळे एअर इंडियाने शेवटच्या क्षणी विमानात बदल केल्यामुळे ही समस्या उद्भवली होती. अशा परिस्थितीत, एअर इंडियाने त्या लोकांना कारने अहमदाबादला नेण्याची आणि नंतर त्यांना मुंबईला जाण्याची ऑफर दिली. काहींनी ऑफर स्वीकारली, तर काहींनी नाकारली. या गैरसोईबद्दल एअर इंडियाने दिलगीरी व्यक्त केली.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाairplaneविमानGujaratगुजरात