शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

दरवर्षी १४ ऑगस्टला फाळणी वेदना स्मृतिदिन, समाजात एकोपा वाढायला हवा - पंतप्रधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 06:22 IST

Narendra Modi : रविवारी देशात ७५ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होणार आहे. त्याच्या आदल्या दिवशी नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, सामाजिक दुही दूर सारून एकोपा वाढावा यासाठीच फाळणी वेदना स्मृतिदिन पाळण्यात येणार आहे. देशातील सर्व लोकांमध्ये सलोखा कायम राहावा हाही या दिनामागचा उद्देश आहे.

नवी दिल्ली : देशाच्या फाळणीच्या वेदना कधीच विसरता येणार नाहीत. हिंसाचार व विद्वेषामुळे लाखो बंधुभगिनींना स्थलांतर करावे लागले. अनेक लोकांनी आपला जीव गमावला. त्या लोकांच्या बलिदानाची आठवण ठेवण्यासाठी यापुढे दरवर्षी १४ ऑगस्टला फाळणी वेदना स्मृतिदिन (विभाजन विभीषिका स्मृती दिवस) पाळण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.रविवारी देशात ७५ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होणार आहे. त्याच्या आदल्या दिवशी नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, सामाजिक दुही दूर सारून एकोपा वाढावा यासाठीच फाळणी वेदना स्मृतिदिन पाळण्यात येणार आहे. देशातील सर्व लोकांमध्ये सलोखा कायम राहावा हाही या दिनामागचा उद्देश आहे.देशाच्या स्वातंत्र्यदिनी उद्या, रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून भाषण करतील. त्यामध्ये ते कोणते मुद्दे मांडणार आहेत याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिले आहे. ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त होत असतानाच भारताची फाळणी झाली व त्यातून १९४७ साली पाकिस्तानची निर्मिती झाली. १४ ऑगस्टला पाकिस्तान स्वातंत्र्यदिन साजरा करतो. भारताची झालेली फाळणी ही कधीही भरून न येणारी जखम आहे असे म्हटले जाते.

महात्मा गांधी यांचे शांततेसाठी प्रयत्नभारताच्या फाळणीच्या वेळी नौखाली व बिहारसहित अन्य काही प्रांतांमध्ये मोठ्या प्रमाणावर दंगली उसळल्या होत्या. नौखालीमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी महात्मा गांधी यांनी त्या भागाचा दौराही केला होता.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndependence Dayस्वातंत्र्य दिन