शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

कंदाहार विमान अपहरणात होता पाक गुप्तचर संघटनेचा सहभाग

By admin | Updated: January 16, 2017 04:51 IST

पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस इंटलिजन्स (आयएसआय) या गुप्तचर संस्थेचा हात होता, असा खळबळजनक दावा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी केला

नवी दिल्ली : इंडियन एअरलाइन्सच्या काठमांडूहून दिल्लीकडे येणाऱ्या २४ डिसेंबर १९९९ रोजी झालेल्या अपहरणामागे पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस इंटलिजन्स (आयएसआय) या गुप्तचर संस्थेचा हात होता, असा खळबळजनक दावा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी केला आहे. या विमानाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले होते आणि प्रवाशांच्या सुटकेसाठी भारताला मसूद अझहरसह तीन दहशतवाद्यांची सुटका करावी लागली होती.कंदाहार विमान अपहरण नावाने ओळखल्या जाणाऱ्या या घटनेत ओलीस ठेवण्यात आलेल्या प्रवाशांच्या सुटेकसाठी जी बोलणी सुरू होती, त्यात अजित डोवाल होते. रॉयटर्स या वृत्तसंस्थेचे भारतातील माजी ब्युरोप्रमुख मायरा मॅकडोनाल्ड यांनी लिहिलेल्या पुस्तकात डिफीट इज अ‍ॅन आॅर्फन : हाऊ पाकिस्तान लॉस्ट द ग्रेट साउथ एशियन वॉर हे पुस्तक लिहिले असून, त्यातील कंदाहार विमान अपहरण प्रकरणात डोवाल यांच्या मुलाखतीचा भाग आहे. त्यांनी अपहरणात आयएसआयचा सहभाग होता, असे म्हटले आहे. अपहरणकर्त्यांना आयएसआयचा पाठिंबा होता. तसा नसता, तर प्रवाशांची सुटका करणे सोपे झाले असते. आम्ही अपहरणकर्त्यांशी बोलणी करायला कंदाहारला पोहोचलो, तेव्हा विमानतळाच्या परिसरात अनेक शस्त्रधारी तालिबानी दहशतवादी दिसत होते. आम्ही अपहरणकर्त्यांशी चर्चा करायला पोहोचलो, तेव्हाच आम्हाला यात आयएसआयचा हात असल्याचे लक्षात आले. विमानाजवळच दोन आयएसआयचे अधिकारी होते. त्यापैकी एक लेफ्टनंट कर्नल तर दुसरा मेजर दर्जाचा होता. अपहरणकर्ते प्रत्येक गोष्टीबाबत त्यांच्याशी चर्चा करताना दिसत होते. आम्ही अपहरणकर्त्यांवर दबाव आणत होतो. पण आयएसआयमुळे त्यात अडचणी येत होत्या, असे डोवाल मुलाखतीत म्हणतात. त्यांची सुटका झाल्यानंतरच हे अपहरण नाट्य संपुष्टात आले, हे सर्वज्ञात आहे. दहशतवाद्यांना सोडल्याबद्दल अटलबिहारी वाजपेयी सरकारवर त्यावेळी टीकाही झाली होती. मसूद अझहर हे पाकिस्तानातील जैश-ए-महमद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख असून, भारतातील अनेक हल्ल्यांमागे त्याचा हात असल्याचे आढळन आले आहे. त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावे, यासाठी भारत संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रयत्नशील असून, दरवेळी त्यात चीन खोडा घालत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>म्हणून करावी लागली सुटकाविमानातील १७८ प्रवाशांच्या सुटकेच्या बदल्यात त्यांनी मसूद अझहर, अहमद उमर सईद शेख आणि मुश्ताक झरगार या तीन दहशतवाद्यांची सुटका करण्याची अट आम्हाला घातली.त्यांना सोडण्याची भारताची अजिबात तयारी नव्हती. पण अडकलेल्यांची सुटका करणे हे आव्हान होते. दहशतवाद्यांची सुटका केली नसती, तर प्रवाशांच्या जीवाला धोका होता.अखेर या तीन दहशतवाद्यांना विशेष विमानाने भारतातून कंदाहारला आणून त्यांची सुटका करावी लागली, याचा त्यांनी उल्लेख केला आहे.