शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

कंदाहार विमान अपहरणात होता पाक गुप्तचर संघटनेचा सहभाग

By admin | Updated: January 16, 2017 04:51 IST

पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस इंटलिजन्स (आयएसआय) या गुप्तचर संस्थेचा हात होता, असा खळबळजनक दावा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी केला

नवी दिल्ली : इंडियन एअरलाइन्सच्या काठमांडूहून दिल्लीकडे येणाऱ्या २४ डिसेंबर १९९९ रोजी झालेल्या अपहरणामागे पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस इंटलिजन्स (आयएसआय) या गुप्तचर संस्थेचा हात होता, असा खळबळजनक दावा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी केला आहे. या विमानाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले होते आणि प्रवाशांच्या सुटकेसाठी भारताला मसूद अझहरसह तीन दहशतवाद्यांची सुटका करावी लागली होती.कंदाहार विमान अपहरण नावाने ओळखल्या जाणाऱ्या या घटनेत ओलीस ठेवण्यात आलेल्या प्रवाशांच्या सुटेकसाठी जी बोलणी सुरू होती, त्यात अजित डोवाल होते. रॉयटर्स या वृत्तसंस्थेचे भारतातील माजी ब्युरोप्रमुख मायरा मॅकडोनाल्ड यांनी लिहिलेल्या पुस्तकात डिफीट इज अ‍ॅन आॅर्फन : हाऊ पाकिस्तान लॉस्ट द ग्रेट साउथ एशियन वॉर हे पुस्तक लिहिले असून, त्यातील कंदाहार विमान अपहरण प्रकरणात डोवाल यांच्या मुलाखतीचा भाग आहे. त्यांनी अपहरणात आयएसआयचा सहभाग होता, असे म्हटले आहे. अपहरणकर्त्यांना आयएसआयचा पाठिंबा होता. तसा नसता, तर प्रवाशांची सुटका करणे सोपे झाले असते. आम्ही अपहरणकर्त्यांशी बोलणी करायला कंदाहारला पोहोचलो, तेव्हा विमानतळाच्या परिसरात अनेक शस्त्रधारी तालिबानी दहशतवादी दिसत होते. आम्ही अपहरणकर्त्यांशी चर्चा करायला पोहोचलो, तेव्हाच आम्हाला यात आयएसआयचा हात असल्याचे लक्षात आले. विमानाजवळच दोन आयएसआयचे अधिकारी होते. त्यापैकी एक लेफ्टनंट कर्नल तर दुसरा मेजर दर्जाचा होता. अपहरणकर्ते प्रत्येक गोष्टीबाबत त्यांच्याशी चर्चा करताना दिसत होते. आम्ही अपहरणकर्त्यांवर दबाव आणत होतो. पण आयएसआयमुळे त्यात अडचणी येत होत्या, असे डोवाल मुलाखतीत म्हणतात. त्यांची सुटका झाल्यानंतरच हे अपहरण नाट्य संपुष्टात आले, हे सर्वज्ञात आहे. दहशतवाद्यांना सोडल्याबद्दल अटलबिहारी वाजपेयी सरकारवर त्यावेळी टीकाही झाली होती. मसूद अझहर हे पाकिस्तानातील जैश-ए-महमद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख असून, भारतातील अनेक हल्ल्यांमागे त्याचा हात असल्याचे आढळन आले आहे. त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावे, यासाठी भारत संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रयत्नशील असून, दरवेळी त्यात चीन खोडा घालत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>म्हणून करावी लागली सुटकाविमानातील १७८ प्रवाशांच्या सुटकेच्या बदल्यात त्यांनी मसूद अझहर, अहमद उमर सईद शेख आणि मुश्ताक झरगार या तीन दहशतवाद्यांची सुटका करण्याची अट आम्हाला घातली.त्यांना सोडण्याची भारताची अजिबात तयारी नव्हती. पण अडकलेल्यांची सुटका करणे हे आव्हान होते. दहशतवाद्यांची सुटका केली नसती, तर प्रवाशांच्या जीवाला धोका होता.अखेर या तीन दहशतवाद्यांना विशेष विमानाने भारतातून कंदाहारला आणून त्यांची सुटका करावी लागली, याचा त्यांनी उल्लेख केला आहे.