शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग अंत:प्रेरणेतून; स्वातंत्र्यसैनिकांची भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 01:35 IST

राष्ट्रपतींच्या हस्ते झाला सत्कार; जुन्या आठवणींना दिला उजाळा

नवी दिल्ली : ब्रिटिशांनंतर, स्वतंत्र संस्थानांची जुलमी राजवट उलथून टाकण्याची गरज होती. स्वातंत्र्यासाठी महाराष्ट्रात चळवळ उभारणे, कार्यकर्ते जमवणे, शस्त्र जमवणे, मोर्चे काढणे या माध्यमातून लढा दिल्याच्या आठवणींना उजाळा देताना अंत:प्रेरणेमुळेच स्वातंत्र्य संग्राम लढ्यात सहभागी होऊ शकल्याचे स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी सांगितले.‘भारत छोडो’, गोवा, हैदराबाद व मराठवाडा मुक्तिसंग्रामात मोलाचे योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील ९ स्वातंत्र्यसैनिकांचा शुक्रवारी राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या स्वातंत्र्यसैनिकांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.नागपूरचे रतनचंद जैन म्हणाले की, स्वातंत्र्य चळवळीतील नेते आम्हाला शस्त्रे पुरविण्याचे काम सोपवायचे. लहान असल्यामुळे पोलीस आम्हाला कारवाई न करता सोडून द्यायचे. एकदा आम्ही ११ बंदुका जमिनीत पुरून ठेवल्या होत्या. नेत्यांना ताब्यात घेऊ न छळ करण्यात आला. त्यांनी बंदुका लपवल्याची माहिती पोलिसांना दिली. ते पाठीमागे लागताच आम्ही दहा बंदुका नदीत फेकल्या. मात्र, एक हस्तीदंती बनवलेली बंदूक आवडल्यामुळे ती बॅगेत ठेवली आणि पोलिसांच्या तावडीत सापडलो. त्याबद्दल सहा महिन्यांची कैद झाली.औरंगाबादमधील लक्ष्मण राधाजी उघडे म्हणाले की, निजामाकडून छळ व्हायचा. त्यामुळे आम्ही बंड पुकारले. निजामाच्या घरावर तिरंगा फडकावल्यानंतर सैन्याने गोळीबार केला. त्यात आमचे तिघे मारले गेले. आम्ही पळून जाण्यात यशस्वी ठरलो. शिवलिंग इरप्पा ऊर्फ वीरभद्र सिद्रामप्पा मडगे म्हणाले की, सप्टेंबर १९४८ मध्ये आम्ही लातूर जिल्ह्यात निजामाविरोधात बंड पुकारले. स्वातंत्र्यसैनिक अप्पाराव पाटील यांना शस्त्रे पुरविण्याची जबाबदारी आमच्यावर होती. आम्ही पुरविलेल्या शस्त्रांच्या जोरावर कार्यकर्त्यांनी अनेक सैनिकांची हत्या केली. सोलापूरवरून बीदरला शस्त्र आणताना पोलिसांना सापडलो आणि एक वर्षाची शिक्षा झाली. परभणीचे माधवराव कुलकर्णी यांनीही भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि हैदराबाद मुक्तिसंग्रामातील लढ्याच्या आठवणी सांगितल्या.भाकरीच्या पापुद्र्याआडून...रझाकारांचा भयंकर त्रास होता. त्यामुळे आम्ही रामलिंग स्वामी, काशीनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हैदराबाद मुक्तिसंग्रामात भाग घेतला. व्यापारी असल्यामुळे कार्यकर्त्यांना मदत करणे सोपे होते.माझ्या दुकानात साहित्य लपवून ठेवायचो. भाकरीच्या पापुद्र्यातून चळवळीच्या कागदपत्रांची देवाण-घेवाण करायचो. क्रांतीसिंह नाना पाटील, गोंविदभाई श्रॉफ यांचे मार्गदर्शन मिळाले, असे मराठवाडा मुक्तिसंग्रामातील बीडचे बन्सी जाधव म्हणाले.