शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल
2
ब्रिटिशांसारखीच भारतावरही २१ वर्षांपूर्वी वेळ आलेली...; जेव्हा मिराज-२००० मॉरीशसमध्ये अडकलेले...
3
"मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवा अन्...." हिंदू सेनेच्या तलवार बाबाचे संतापजनक विधान
4
FD, SIP सर्व विसरुन जाल... Post Office कडे आहेत जबरदस्त सेव्हिंग स्कीम्स; एकदा गुंतवणूक, दरवर्षी मिळतील २.४६ लाख
5
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
6
चीनच्या 'मच्छर'नंतर आता 'झुरळ' बनणार युद्धभूमीतलं नवं शस्त्र; 'या' देशानं बनवला खतरनाक प्लॅन
7
श्रीराम-भरत मिलाप! रामायणातील महत्वाची घटना; सिनेमाबद्दल आदिनाथ कोठारे म्हणतो...
8
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
9
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा; उद्धवसेनेकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता
10
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
11
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
12
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
13
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
14
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
15
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
16
उंच गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बांधणे शक्य आहे का? हायकोर्टाने सरकारकडे मागितली माहिती
17
एटीएसमुळे आयुष्य उद्ध्वस्त झाले, शेख यांची खंत; ना वडिलांच्या दफनविधीला, ना मुलीच्या लग्नाला आलाे !
18
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
19
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
20
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी एक; तानसा तलाव भरून वाहू लागला!

संसदीय समिती करणार ईव्हीएम प्रकरणाची चौकशी

By admin | Updated: March 15, 2017 04:09 IST

बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांची उत्तर प्रदेशातील निवडणुकीत मतदान यंत्रांमध्ये हेराफेरी झाली असल्याची तक्रार निवडणूक आयोगाने फेटाळली असली

हरीश गुप्ता , नवी दिल्लीबहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांची उत्तर प्रदेशातील निवडणुकीत मतदान यंत्रांमध्ये हेराफेरी झाली असल्याची तक्रार निवडणूक आयोगाने फेटाळली असली तरी संसदीय स्थायी समितीने याची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा व महानगरपालिकांच्या निवडणुकीमधील मतदान यंत्रांत हेराफेरी झाल्याच्या तक्रारींची ही समिती चौकशी करणार आहे.‘लोकमत’शी बोलताना गृह विभागाच्या समितीचे अध्यक्ष आनंद शर्मा यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील विविध शहरे व जिल्ह्यांतून याबाबत तक्रारी आल्या आहेत. तसेच याचे पुरावेही पाठविण्यात आले आहेत. विशेषत: पुणे, नाशिक, धुळे व इतरही ठिकाणांहून अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. एका उमेदवाराने तर अशी तक्रार केली आहे की, जिल्हा परिषदेसाठी माझ्या कुटुंबात २८ सदस्य आहेत. तरीही मतदान यंत्राने मला एकही मत पडल्याचे दाखवले नाही. समिती या तक्रारी एकत्रित करीत आहे व माहितीची शहानिशा केली जात आहे. निवडणूक आयोगाचे अधिकारी समितीच्या संपर्कात आहेत व बारकावे तपासत आहे. याबाबत अधिक काही बोलण्यास नकार देत शर्मा म्हणाले की, आम्ही आता चौकशी करीत आहोत. मतदान यंत्रात केलेल्या प्रत्येक मताची कागदी नोंद ठेवली जावी, या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाबाबतही समिती विचार करणार आहे. तथापि, ही समिती उत्तर प्रदेशसह इतर राज्यांतील विधानसभा निवडणुकीत मतदान यंत्रात हेराफेरी झाल्याच्या एकाही आरोपाची चौकशी करीत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ईव्हीएमप्रणालीचा तपास करणारी स्थायी समिती मतदान यंत्रातील हेराफेरीच्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक अभियंते, पुरवठादार आणि तज्ज्ञांची मदत घेणार आहे. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील आगामी एमसीडी निवडणुकीत ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांचा वापर करण्याची मागणी केली आहे.