शहरं
Join us  
Trending Stories
1
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
2
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
3
संकष्ट चतुर्थी 2025 : असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
4
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
5
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
6
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
7
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
8
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
9
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
10
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
11
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
12
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
13
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
14
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
15
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
16
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
17
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
18
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
19
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
20
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम

संसदेत सोनिया गांधींचे भाजपाला खडे बोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2017 14:16 IST

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला

ठळक मुद्देस्वातंत्र चळवळीतील महत्वाचा भाग असणाऱ्या ‘चले जाव’ चळवळीला बुधवारी ७५ वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने लोकसभेत विशेष सत्राचं आयोजन करण्यात आलं. सत्रादरम्यान काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधलादेशात अशा काही संघटना आहेत, ज्यांचा देशाच्या स्वातंत्र चळवळीत काहीही सहभाग नव्हता, त्यांनी महात्मा गांधींनी चालवलेल्या 'चले जाव' चळवळीलाही विरोध केला होता.

नवी दिल्ली, दि. 9- स्वातंत्र चळवळीतील महत्वाचा भाग असणाऱ्या ‘चले जाव’ चळवळीला बुधवारी ७५ वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने लोकसभेत विशेष सत्राचं आयोजन करण्यात आलं. या सत्रादरम्यान काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला. देशात अशा काही संघटना आहेत, ज्यांचा देशाच्या स्वातंत्र चळवळीत काहीही सहभाग नव्हता, त्यांनी महात्मा गांधींनी चालवलेल्या 'चले जाव' चळवळीलाही विरोध केला होता. अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकून टीका केली. काँग्रेस अध्यक्ष सोनीया गांधी लोकसभेत बोलत होत्या. स्वातंत्र चळवळीतील महत्वाचा भाग असणाऱ्या ‘चले जाव’ चळवळीला आज ७५ वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्त लोकसभेत विशेष सत्राचं आयोजन करण्यात आलं.

सध्या देशात द्वेषाचं आणि सुडाचं राजकारण केलं जात आहे. यामध्ये खुला संवाद आणि चर्चेला स्थान नाही, अशा शब्दांत सोनीया गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला. त्यामुळे आज धर्मनिरपेक्षता आणि अभिव्यक्ती धोक्यात आली आहे. यालाच विभाजनाचं राजकारण म्हणतात. जर आपल्याला आपलं स्वातंत्र टिकवायचं असेल तर अशा विरोधी शक्तींचा सामना करायला हवा, असंही सोनीया गांधी म्हणाल्या आहेत. स्वातंत्र्य चळवळीदरम्यान पंडित नेहरुंनी त्यांच्या जीवनातील अनेक वर्ष तुरुंगात घालवली. अनेक काँग्रेस नेत्यांचा तुरुंगातच मृत्यू झाला. इंग्रजांनी भारतातून निघून जावं, यासाठी सुरु झालेल्या ‘चले जाव’ चळवळीदरम्याना आंदोलकांवर अनेक अत्याचार झाले. पण तरीही काँग्रेसचे नेते मागे हटले नाहीत, असं मत स्वातंत्र्य चळवळीतील माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इतर काँग्रेस नेत्यांविषयी सोनिया गांधी यांनी व्यक्त केलं. सोनिया गांधी यांच्या या वक्तव्यानंतर लोकसभेत काही सदस्यांनी गदारोळही केला. 

सोनिया गांधीचा सरकारवर हल्लाबोलभाषणात सोनिया गांधी म्हणाल्या, चले जाव चळवळीची 75 वर्ष साजरी करत असताना देशातील नागरीकांच्या मनात अनेक शंका आहेत. आपल्या देशात स्वातंत्र्याचं वातावरण आहे का? तिथेही भीतीचं वातावरण आहे ? असा सवाला सोनिया गांधी यांनी उपस्थित केला. लोकशाहीच्या मुलभूत अधिकाऱ्याला दडपण्याचा प्रयत्न केला जातो आहे का, असंही सोनिया गांधी म्हणाल्या आहेत. द्वेषाच्या राजकारणाचे लोण सगळीकडे पसरले असल्यासारखं वाटत असल्याचं सोनिया गांधी यांनी म्हंटलं.