शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

"अब की बार चोको बार", DMK खासदारानं भाजपच्या घोषणेची उडवली खिल्ली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 18:01 IST

केंद्र सरकारवर हल्लाबोल करत लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या ४०० पारच्या घोषणेबाजीवरही निशाणा साधला. 

नवी दिल्ली : राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर मंगळवारी सुद्धा चर्चा सुरूच होती. यावेळी डीएमकेच्या खासदार डॉ. कनिमोझी एनव्हीएन सोमू यांच्यासह अनेक खासदारांनी आपल्या पक्षांची बाजू सभागृहात मांडली. तसेच, केंद्र सरकारवर हल्लाबोल करत लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या ४०० पारच्या घोषणेबाजीवरही निशाणा साधला. 

"अब की बार ४०० पार" ही भाजपची घोषणा "अब की बार चोको बार" झाली आहे, असे म्हणत राज्यसभा खासदार डॉ. कनिमोझी एनव्हीएन सोमू यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. तसेच, डॉ. कनिमोझी एनव्हीएन सोमू यांनी सभागृहात अनेक मुद्द्यांचा उल्लेख केला. त्या म्हणाला, "भाजपने लोकसभा निवडणुकीपूर्वी 'अब की बार ४०० पार'चा नारा दिला होता, पण तो नारा 'अब की बार चोको बार' असा निघाला. जोपर्यंत तो संपत नाही, तोपर्यंत भाजपने त्याचा आनंद घ्यावा."

याचबरोबर, डॉ. कनिमोझी एनव्हीएन सोमू यांनीही पेपरफुटीप्रकरणी सरकारवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, पेपरफुटी प्रकरणामुळे देशात रक्तपात होत आहे. देशातील विविध परीक्षांमध्ये प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. तसेच, राज्यांसोबत भेदभाव आणि विरोधी नेत्यांना त्रास देण्यासाठी केंद्रीय एजन्सींचा वापर केला जात असल्याचा आरोप डॉ. कनिमोझी एनव्हीएन सोमू यांनी राज्यसभेत केला. 

दरम्यान, राज्यसभेतील विरोधी पक्षांनी मंगळवारी केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले. अहंकाराने देश चालवता येत नाही, असा दावा विरोधी पक्षांनी केला. तसेच, लोकशाहीत विरोधकांची भूमिका ठाम असते. मात्र विरोधक आणि मीडिया त्यांना 'तुकडे तुकडे गँग, खान मार्केट गँग आणि लुटियन्स गँग' म्हणत बदनाम करण्यात येत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी सत्ताधाऱ्यांवर केला.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाParliamentसंसदBJPभाजपाDravid Munnetra Kazhagamद्रविड मुनेत्र कझागम