शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

संसदेचे अधिवेशन संपले; आता संघर्ष रस्त्यावर! मोदींच्या गॅरंटीची गाडी भाजप प्रत्येक घरी पोहोचवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 06:08 IST

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अखेरच्या संसद अधिवेशनाचे गुरुवारी सूप वाजले. आता संघर्ष संसदेऐवजी रस्त्यांवर लढला जाणार आहे.

- संजय शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटीची गाडी प्रत्येक घरी पोहोचवण्याबरोबरच काँग्रेस व विरोधकांच्या कारभाराचा पर्दाफाशही प्रत्येक घरी पोहोचवण्याचे काम आता भाजप करणार आहे. 

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अखेरच्या संसद अधिवेशनाचे गुरुवारी सूप वाजले. आता संघर्ष संसदेऐवजी रस्त्यांवर लढला जाणार आहे. हे संसदेचे अधिवेशन ऐतिहासिक ठरले. कारण, आजवर कोणत्याही संसद अधिवेशनात एवढ्या मोठ्या संख्येने खासदार कधीही निलंबित करण्यात आले नव्हते. संसदेऐवजी आता देशातील रस्ते रणक्षेत्र होणार आहेत. दोन महिन्यांनी २०२४च्या लोकसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विजयाची हॅट् ट्रिक करण्यासाठी मैदानात उतरत आहेत तर काँग्रेस व विरोधी पक्ष इंडिया आघाडीच्या माध्यमातून टक्कर देण्याची तयारी करीत आहेत.

१ जानेवारीपासून भाजप व केंद्र सरकार संपूर्ण देशात अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची मोहीम उघडत आहे. यातून जनतेपर्यंत जाण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. 

‘भाजप’ची निवडणुकीची तयारी सुरू 

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांपैकी तीन राज्यांत मिळालेल्या विजयाने भाजपमध्ये उत्साह संचारला आहे. भाजप आता अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची मोहीम उघडत आहे. २०२४च्या निवडणुकीचाही हाच अजेंडा असणार आहे. ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ प्रत्येक घरी नेण्यासाठीची मोहीम आधीच सुरू केलेली आहे. ही मोहीम २६ जानेवारीपर्यंत चालणार आहे.

राहुल गांधी यांच्यावर सर्वांच्या नजरासर्व नजरा राहुल गांधी यांच्यावर आहेत. राहुल गांधी यांच्यासह संपूर्ण काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरण्याची तयारी करीत आहे. भाजपच्या विरोधात सर्व विरोधकांचा एकच उमेदवार उतरवून विरोधकांची मते विभागली जाऊ नयेत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.  रस्त्यांवर उतरण्याची रणनीती भाजपकडूनही सुरू आहे.

‘इंडिया’ आघाडीत अडथळा काय?इंडिया आघाडीच्या बैठकीत मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाचा पंतप्रधान पदाच्या उमेदवारासाठी प्रस्ताव आल्याने काँग्रेसबरोबरच सर्व विरोधी पक्षांचे नेते आश्चर्यचकीत झाले होते. विरोधकांचा नेता कोण होणार, ही इंडिया आघाडीची सर्वांत कमजोरी राहिली आहे तर जागावाटपाची दुसरी मोठी समस्या आहे. 

टॅग्स :ParliamentसंसदWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन