शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

"ज्या योजनेची तुम्ही खिल्ली उडवलीत, आज त्याच योजनेत...", सोनिया गांधी 'मनरेगा'वरुन मोदी सरकारवर बरसल्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 17:04 IST

Parliament News: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी लोकसभेत मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. नरेंद्र मोदी सरकारनं मनरेगा योजनेताल कमकुवत केल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी केला आहे. 

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी लोकसभेत मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. नरेंद्र मोदी सरकार 'मनरेगा'ला कमकुवत करत असल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी केला. "काही वर्षांपूर्वी 'मनरेगा'ची काही लोकांकडून खिल्ली उडवली गेली, कोविड-19 आणि लॉकडाऊनमध्ये कोट्यवधी गरीब कुटुंबांना वेळेत मदत केली आणि सरकारला वाचवण्यातही महत्त्वाची भूमिका 'मनरेगा'नं बजावली. असं असतानाही 'मनरेगा'च्या बजेटमध्ये सातत्यानं कपात केली जात आहे", असा हल्लाबोल सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव घेता केला.

"सध्या देशात वेळेवर पेमेंट आणि नोकऱ्यांची कायदेशीर हमी कमकुवत होत आहे. बेरोजगारी सातत्यानं वाढत आहे, तरीही २०२० च्या तुलनेत यंदा 'मनरेगा'चं बजेट ३५ टक्क्यांनी कमी करण्यात आलं आहे. अर्थसंकल्पातील कपातीमुळे कामगारांच्या पगाराला विलंब होत आहे", असा आरोप सोनियांनी लोकसभेतील भाषणात केला. दुसरीकडे, गुरुवारी राज्यसभेत ७२ सदस्यांना निरोप देण्यात आला. राज्यसभेत १९ राज्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या सदस्यांचा कार्यकाळ मार्च ते जुलै दरम्यान पूर्ण होत आहे. निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये एके अँटनी, आनंद शर्मा, काँग्रेसच्या अंबिका सोनी, कपिल सिब्बल, भारतीय जनता पक्षाचे सुरेश प्रभू, सुब्रमण्यम स्वामी, बहुजन समाज पक्षाचे सतीशचंद्र मिश्रा, शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांचा समावेश आहे.

निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये निर्मला सीतारामन, पीयूष गोयल, मुख्तार अब्बास नक्वी आणि आरसीपी सिंग या मंत्र्यांचा देखील समावेश आहे. नामनिर्देशित सदस्य एमसी मेरी कोम, स्वपन दासगुप्ता आणि नरेंद्र जाधव यांचाही कार्यकाळ संपुष्टात येत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेच्या निवृत्त सदस्यांना चांगल्या भविष्यासाठी शुभेच्छा देताना त्यांचे अनुभव देशाच्या कानाकोपऱ्यात घेऊन जावेत आणि देशाच्या भावी पिढीला प्रेरणा द्यावी, असं आवाहन केलं. निवृत्त होणाऱ्या सदस्यांकडे अनुभवाचा मोठा खजिना असतो आणि कधी कधी ज्ञानापेक्षा अनुभवाची ताकद जास्त असते, असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस