शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

दिवाळखोरी कायद्यातील सुधारणांना संसदेची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 05:42 IST

कायदा नवाच असताना त्यात एवढ्या सुधारणा का करण्यात येत आहेत, असा प्रश्न अनेक खासदारांनी चर्चेदरम्यान उपस्थित केला होता

नवी दिल्ली : ‘नादारी व दिवाळखोरी संहिता (सुधारणा) विधेयक २०२०’ला (आयबीसी) संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिली आहे. दिवाळखोरीत निघालेली कंपनी विकत घेणाऱ्यास पूर्वव्यवस्थापनाने केलेल्या गुन्ह्यांपासून संरक्षण देण्याची तरतूद नव्या विधेयकात आहे.सुधारित विधेयकास गुरुवारी राज्यसभेने आवाजी मतदानाने मंजुरी दिली. लोकसभेने त्यास ६ मार्च रोजीच मंजुरी दिली होती. हे विधेयक अध्यादेशाची जागा घेईल.

विधेयकावरील अल्पकालीन चर्चेत बोलताना वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, विधेयकातील सुधारणा कालसुसंगत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालनही त्यात करण्यात आले आहे.

२०१६ मध्ये हा कायदा अमलात आला. त्यानंतर त्यात तीन वेळा बदल करण्यात आले आहेत. कायदा नवाच असताना त्यात एवढ्या सुधारणा का करण्यात येत आहेत, असा प्रश्न अनेक खासदारांनी चर्चेदरम्यान उपस्थित केला होता. त्यावर सीतारामन यांनी सांगितले की, बदलत्या गरजांनुसार कायद्यात बदल करण्यात येत आहेत. सरकारची भूमिका प्रतिसादात्मक आहे. सरकार औद्योगिक क्षेत्राशी सातत्याने बोलत आहे. त्यानुसार निर्णय घेत आहे. या कायद्यातील कोणताही बदल विचार न करता करण्यात आलेला नाही.केवळ १० टक्के थकीत कर्जाची वसुलीराज्यसभेतील चर्चेत सहभागी होताना काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सांगितले की, नादारी व दिवाळखोरी कायद्यामुळे (आयबीसी) मोठ्या सात कंपन्या वगळता अन्य कंपन्यांच्या थकीत कर्जापैकी केवळ १० टक्के कर्ज वसूल झाले आहे. आयबीसीकडे ९७० खटले वर्ग करण्यात आले. ७८० प्रकरणे अवसायनात काढण्यात आली. याचाच अर्थ आयबीसीकडे सोपविलेल्या कंपन्यांचा मृत्यूदर ८० टक्के आहे. वास्तविक कंपन्या वाचविण्यासाठी आयबीसी आणले गेले आहे. तो हेतू साध्य होताना दिसत नाही.