शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

दिवाळखोरी कायद्यातील सुधारणांना संसदेची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 05:42 IST

कायदा नवाच असताना त्यात एवढ्या सुधारणा का करण्यात येत आहेत, असा प्रश्न अनेक खासदारांनी चर्चेदरम्यान उपस्थित केला होता

नवी दिल्ली : ‘नादारी व दिवाळखोरी संहिता (सुधारणा) विधेयक २०२०’ला (आयबीसी) संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिली आहे. दिवाळखोरीत निघालेली कंपनी विकत घेणाऱ्यास पूर्वव्यवस्थापनाने केलेल्या गुन्ह्यांपासून संरक्षण देण्याची तरतूद नव्या विधेयकात आहे.सुधारित विधेयकास गुरुवारी राज्यसभेने आवाजी मतदानाने मंजुरी दिली. लोकसभेने त्यास ६ मार्च रोजीच मंजुरी दिली होती. हे विधेयक अध्यादेशाची जागा घेईल.

विधेयकावरील अल्पकालीन चर्चेत बोलताना वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, विधेयकातील सुधारणा कालसुसंगत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालनही त्यात करण्यात आले आहे.

२०१६ मध्ये हा कायदा अमलात आला. त्यानंतर त्यात तीन वेळा बदल करण्यात आले आहेत. कायदा नवाच असताना त्यात एवढ्या सुधारणा का करण्यात येत आहेत, असा प्रश्न अनेक खासदारांनी चर्चेदरम्यान उपस्थित केला होता. त्यावर सीतारामन यांनी सांगितले की, बदलत्या गरजांनुसार कायद्यात बदल करण्यात येत आहेत. सरकारची भूमिका प्रतिसादात्मक आहे. सरकार औद्योगिक क्षेत्राशी सातत्याने बोलत आहे. त्यानुसार निर्णय घेत आहे. या कायद्यातील कोणताही बदल विचार न करता करण्यात आलेला नाही.केवळ १० टक्के थकीत कर्जाची वसुलीराज्यसभेतील चर्चेत सहभागी होताना काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सांगितले की, नादारी व दिवाळखोरी कायद्यामुळे (आयबीसी) मोठ्या सात कंपन्या वगळता अन्य कंपन्यांच्या थकीत कर्जापैकी केवळ १० टक्के कर्ज वसूल झाले आहे. आयबीसीकडे ९७० खटले वर्ग करण्यात आले. ७८० प्रकरणे अवसायनात काढण्यात आली. याचाच अर्थ आयबीसीकडे सोपविलेल्या कंपन्यांचा मृत्यूदर ८० टक्के आहे. वास्तविक कंपन्या वाचविण्यासाठी आयबीसी आणले गेले आहे. तो हेतू साध्य होताना दिसत नाही.