शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

G20 नंतर भारत आता P20 चे आयोजन करण्याच्या तयारीत, देशाची नवी संसद जगाला दिसणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2023 13:52 IST

देशाच्या नवीन संसद भवनात हा कार्यक्रम होणार आहे. P-20 परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण जग भारताच्या लोकशाहीच्या नव्या मंदिरासमोर येणार आहे. 

नवी दिल्ली : G20 शिखर परिषदेच्या मोठ्या यशानंतर आता P20 म्हणजेच पार्लमेंट-20 साठी दिल्लीत तयारी सुरू आहे. 12 ते 14 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या या परिषदेत G20 शिखर परिषदेत सहभागी सर्व देशांच्या संसदेचे अध्यक्ष आणि त्यांच्यासोबत येणारे खासदारांचे शिष्टमंडळ सहभागी होणार आहे. देशाच्या नवीन संसद भवनात हा कार्यक्रम होणार आहे. P-20 परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण जग भारताच्या लोकशाहीच्या नव्या मंदिरासमोर येणार आहे. 

एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य या ध्येयांसह भारत P20 परिषदेत आपला शतकानुशतके जुना लोकशाही इतिहास जगासमोर मांडणार आहे. P20 शिखर परिषदेचा मुख्य कार्यक्रम 13-14 ऑक्टोबर आहे, परंतु 12 ऑक्टोबरपासून परिषद सुरू होईल. पहिल्या दिवशी पार्लमेंटरी फोरम ऑन लाईफ या थीमवर अनेक कार्यक्रम होणार आहेत. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमांना अंतिम रूप दिले जात आहे. परिषदेत एकूण चार सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. 

"Agenda 2030 for SDGs: Showcasing Achievements, Accelerating Progress" असे पहिल्या सत्राचे नाव आहे. हे 2030 पर्यंत संयुक्त राष्ट्रांनी शाश्वत विकास लक्ष्यांवर आधारित आहे. यामध्ये कोरोना महामारीनंतर जागतिक स्तरावर गरिबी आणि मागासलेपणाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी बनवलेल्या धोरणांचा आणि त्यांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला जाणार आहे. या सत्रात भारत आपल्या विविध लोककल्याणकारी योजना सर्व देशांसमोर रोल मॉडेल म्हणून मांडणार आहे. 

दुसरे सत्र "Sustainable Energy Transition: Gateways to a Green Future" या विषयावर आहे. हे पर्यायी ऊर्जा स्त्रोतांद्वारे हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्याबद्दल आहे. तसेच,  या सत्रादरम्यान विकसित देशांनी दिलेली आश्वासने पूर्ण करण्यावर भर दिला जाईल ज्याअंतर्गत अर्थसंकल्प आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकसनशील देशांना मदत करण्याचे मान्य करण्यात आले.

याचबरोबर,"Mainstreaming Gender Equality: From Womens Empowerment to Women-Led Development" असे तिसऱ्या सत्राचे नाव आहे. या सत्रातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे नव्या संसदेच्या सुरुवातीलाच महिला आरक्षण विधेयक मंजूर करून भारताने जगासमोर आदर्श ठेवला आहे. यानंतर चौथे आणि अंतिम सत्र "Transformation in Peoples Lives through Public Digital Platforms" या विषयावर आहे.

टॅग्स :ParliamentसंसदIndiaभारत