शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

EXCLUSIVE- पालकांनो मुलांना शाळेत पाठवताना सुरक्षा यंत्रणेकडेही लक्ष द्या- डॉ. हरिश शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 12:45 IST

पालकांनी आपल्या पाल्याला शाळेत पाठवताना, विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी काही खबरदारीचे उपाय योजण्याची आवश्यकता आहे, असं मत प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ. हरिश शेट्टी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केलं.

ठळक मुद्देगुरुग्राम येथिल रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये एका सात वर्षांच्या मुलाची हत्या करण्याचं प्रकरण घडलं. शाळेमध्ये शिकायला गेलेल्या पाल्याबाबत घडलेली ही घटना संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी होती. यापुढे पालकांनी आपल्या पाल्याला शाळेत पाठवताना, विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी काही खबरदारीचे उपाय योजण्याची आवश्यकता आहे, असं मत प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ. हरिश शेट्टी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केलं.

मुंबई, दि.१२- गुरुग्राम येथिल रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये एका सात वर्षांच्या मुलाची हत्या करण्याचं प्रकरण घडलं. शाळेमध्ये शिकायला गेलेल्या पाल्याबाबत घडलेली ही घटना संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी होती. त्यामुळेच यापुढे पालकांनी आपल्या पाल्याला शाळेत पाठवताना, विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी काही खबरदारीचे उपाय योजण्याची आवश्यकता आहे, असं मत प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ. हरिश शेट्टी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केलं. पालक शिक्षक संघटनेनेही या मुद्द्याकडे लक्ष द्यावं, असं मत डॉ. शेट्टी यांनी व्यक्त केलं आहे. प्रत्येक शाळेत चाइल्ड प्रोटेक्शन पॉलिसी तयार केली जावी आणि त्यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, पालक यांचा समावेश असावा. शाळा व मुलांच्या कुटुंबांचं एक संयुक्त कुटुंबच बनलं पाहिजे, असं डॉ. शेट्टी यांनी लोकमतशी बोलताना सांगितलं.

मुलाला शाळेत पाठवताना पालकांनी काही प्रश्न स्वतःला विचारावेत असे त्यांनी सुचवले. ते प्रश्न पुढीलप्रमाणे - 

- सिक्युरिटी कॅमेऱ्यात टिपली जाणारी हालचाल सुरक्षारक्षकांद्वारे सतत लाइव्ह तपासली जात आहे का?- मुलांची स्वच्छतागृहं फक्त मुलंच वापरत आहेत की प्रौढ लोकही त्यामध्ये जात आहेत ?- ज्या स्वच्छतागृहात विद्यार्थी जातात त्यामध्येच स्कूलबसचे कंडक्टर आणि त्याचे चालक जातात का की ते वेगळे स्वच्छतागृह वापरतात?- प्रत्येक मजल्यावर महिला आणि पुरुष सुरक्षारक्षक आहेत का ?- सुरक्षारक्षकही सीसीटीव्हीच्या कक्षेत आहेत का ?- शाळा व महाविद्यालय एकाच प्रांगणात असेल तर महाविद्यालयाचे विद्यार्थी लहान मुलांचे स्वच्छतागृह वापरतात का ? तसे झाल्यास त्यांना अडवण्यास सुरक्षारक्षक आहेत का ?- शाळेची सुरक्षाव्यस्था मुख्याध्यापक नियमित तपासतात का ? - सर्व व्यवस्थेचे योग्य ऑडिट होतं का ?- मुलांकडून फिडबॅक किंवा सूचना मागवल्या जातात का ? त्यावर काही अंमलबजावणी होते का ?-- सुरक्षाव्यवस्था सक्षम असावी यासाठी शाळेचे शिक्षक जागरुक आहेत का ?