शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

EXCLUSIVE- पालकांनो मुलांना शाळेत पाठवताना सुरक्षा यंत्रणेकडेही लक्ष द्या- डॉ. हरिश शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 12:45 IST

पालकांनी आपल्या पाल्याला शाळेत पाठवताना, विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी काही खबरदारीचे उपाय योजण्याची आवश्यकता आहे, असं मत प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ. हरिश शेट्टी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केलं.

ठळक मुद्देगुरुग्राम येथिल रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये एका सात वर्षांच्या मुलाची हत्या करण्याचं प्रकरण घडलं. शाळेमध्ये शिकायला गेलेल्या पाल्याबाबत घडलेली ही घटना संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी होती. यापुढे पालकांनी आपल्या पाल्याला शाळेत पाठवताना, विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी काही खबरदारीचे उपाय योजण्याची आवश्यकता आहे, असं मत प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ. हरिश शेट्टी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केलं.

मुंबई, दि.१२- गुरुग्राम येथिल रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये एका सात वर्षांच्या मुलाची हत्या करण्याचं प्रकरण घडलं. शाळेमध्ये शिकायला गेलेल्या पाल्याबाबत घडलेली ही घटना संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी होती. त्यामुळेच यापुढे पालकांनी आपल्या पाल्याला शाळेत पाठवताना, विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी काही खबरदारीचे उपाय योजण्याची आवश्यकता आहे, असं मत प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ. हरिश शेट्टी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केलं. पालक शिक्षक संघटनेनेही या मुद्द्याकडे लक्ष द्यावं, असं मत डॉ. शेट्टी यांनी व्यक्त केलं आहे. प्रत्येक शाळेत चाइल्ड प्रोटेक्शन पॉलिसी तयार केली जावी आणि त्यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, पालक यांचा समावेश असावा. शाळा व मुलांच्या कुटुंबांचं एक संयुक्त कुटुंबच बनलं पाहिजे, असं डॉ. शेट्टी यांनी लोकमतशी बोलताना सांगितलं.

मुलाला शाळेत पाठवताना पालकांनी काही प्रश्न स्वतःला विचारावेत असे त्यांनी सुचवले. ते प्रश्न पुढीलप्रमाणे - 

- सिक्युरिटी कॅमेऱ्यात टिपली जाणारी हालचाल सुरक्षारक्षकांद्वारे सतत लाइव्ह तपासली जात आहे का?- मुलांची स्वच्छतागृहं फक्त मुलंच वापरत आहेत की प्रौढ लोकही त्यामध्ये जात आहेत ?- ज्या स्वच्छतागृहात विद्यार्थी जातात त्यामध्येच स्कूलबसचे कंडक्टर आणि त्याचे चालक जातात का की ते वेगळे स्वच्छतागृह वापरतात?- प्रत्येक मजल्यावर महिला आणि पुरुष सुरक्षारक्षक आहेत का ?- सुरक्षारक्षकही सीसीटीव्हीच्या कक्षेत आहेत का ?- शाळा व महाविद्यालय एकाच प्रांगणात असेल तर महाविद्यालयाचे विद्यार्थी लहान मुलांचे स्वच्छतागृह वापरतात का ? तसे झाल्यास त्यांना अडवण्यास सुरक्षारक्षक आहेत का ?- शाळेची सुरक्षाव्यस्था मुख्याध्यापक नियमित तपासतात का ? - सर्व व्यवस्थेचे योग्य ऑडिट होतं का ?- मुलांकडून फिडबॅक किंवा सूचना मागवल्या जातात का ? त्यावर काही अंमलबजावणी होते का ?-- सुरक्षाव्यवस्था सक्षम असावी यासाठी शाळेचे शिक्षक जागरुक आहेत का ?