शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

EXCLUSIVE- पालकांनो मुलांना शाळेत पाठवताना सुरक्षा यंत्रणेकडेही लक्ष द्या- डॉ. हरिश शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 12:45 IST

पालकांनी आपल्या पाल्याला शाळेत पाठवताना, विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी काही खबरदारीचे उपाय योजण्याची आवश्यकता आहे, असं मत प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ. हरिश शेट्टी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केलं.

ठळक मुद्देगुरुग्राम येथिल रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये एका सात वर्षांच्या मुलाची हत्या करण्याचं प्रकरण घडलं. शाळेमध्ये शिकायला गेलेल्या पाल्याबाबत घडलेली ही घटना संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी होती. यापुढे पालकांनी आपल्या पाल्याला शाळेत पाठवताना, विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी काही खबरदारीचे उपाय योजण्याची आवश्यकता आहे, असं मत प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ. हरिश शेट्टी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केलं.

मुंबई, दि.१२- गुरुग्राम येथिल रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये एका सात वर्षांच्या मुलाची हत्या करण्याचं प्रकरण घडलं. शाळेमध्ये शिकायला गेलेल्या पाल्याबाबत घडलेली ही घटना संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी होती. त्यामुळेच यापुढे पालकांनी आपल्या पाल्याला शाळेत पाठवताना, विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी काही खबरदारीचे उपाय योजण्याची आवश्यकता आहे, असं मत प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ. हरिश शेट्टी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केलं. पालक शिक्षक संघटनेनेही या मुद्द्याकडे लक्ष द्यावं, असं मत डॉ. शेट्टी यांनी व्यक्त केलं आहे. प्रत्येक शाळेत चाइल्ड प्रोटेक्शन पॉलिसी तयार केली जावी आणि त्यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, पालक यांचा समावेश असावा. शाळा व मुलांच्या कुटुंबांचं एक संयुक्त कुटुंबच बनलं पाहिजे, असं डॉ. शेट्टी यांनी लोकमतशी बोलताना सांगितलं.

मुलाला शाळेत पाठवताना पालकांनी काही प्रश्न स्वतःला विचारावेत असे त्यांनी सुचवले. ते प्रश्न पुढीलप्रमाणे - 

- सिक्युरिटी कॅमेऱ्यात टिपली जाणारी हालचाल सुरक्षारक्षकांद्वारे सतत लाइव्ह तपासली जात आहे का?- मुलांची स्वच्छतागृहं फक्त मुलंच वापरत आहेत की प्रौढ लोकही त्यामध्ये जात आहेत ?- ज्या स्वच्छतागृहात विद्यार्थी जातात त्यामध्येच स्कूलबसचे कंडक्टर आणि त्याचे चालक जातात का की ते वेगळे स्वच्छतागृह वापरतात?- प्रत्येक मजल्यावर महिला आणि पुरुष सुरक्षारक्षक आहेत का ?- सुरक्षारक्षकही सीसीटीव्हीच्या कक्षेत आहेत का ?- शाळा व महाविद्यालय एकाच प्रांगणात असेल तर महाविद्यालयाचे विद्यार्थी लहान मुलांचे स्वच्छतागृह वापरतात का ? तसे झाल्यास त्यांना अडवण्यास सुरक्षारक्षक आहेत का ?- शाळेची सुरक्षाव्यस्था मुख्याध्यापक नियमित तपासतात का ? - सर्व व्यवस्थेचे योग्य ऑडिट होतं का ?- मुलांकडून फिडबॅक किंवा सूचना मागवल्या जातात का ? त्यावर काही अंमलबजावणी होते का ?-- सुरक्षाव्यवस्था सक्षम असावी यासाठी शाळेचे शिक्षक जागरुक आहेत का ?