शहरं
Join us  
Trending Stories
1
टीडीपीने अद्याप पत्तेच खोललेले नाहीत, भाजप टेन्शनमध्ये; लोकसभा अध्यक्षपदासाठी बैठकांचे सत्र
2
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
3
'जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद ठेचून काढा', गृहमंत्री अमित शाह यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश
4
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
5
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
6
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
7
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
8
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
9
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
10
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
11
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
12
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
13
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
14
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
15
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
16
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
17
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा
18
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
19
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
20
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत

ते आज आहेत दत्तक घेतलेल्या ५१ मुलांचे पालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 3:54 AM

आपल्याला मुल होत नाही, हे दु:ख अनेकांना असते. अनेकदा त्यावर इलाज नसतो. पण त्याला पर्याय मात्र आपण शोधू शकतो.

मुझफ्फरनगर : आपल्याला मुल होत नाही, हे दु:ख अनेकांना असते. अनेकदा त्यावर इलाज नसतो. पण त्याला पर्याय मात्र आपणशोधू शकतो. असाच पर्याय येथील कुटुंबाने शोधला त्या दाम्पत्याने १९९0 साली एका अपंग मुलाला दत्तक घेतले आणि आज ते ५१ मुलांचे पालक आहेत. मुल होत नसल्याने सतत तक्रार करणाºयांसमोर या दाम्पत्याने एक उदाहरण ठेवले आहे.शामली येथील कुडाणा गावातील मीना राणा यांचा विवाह १९८१ साली बागपत येथील वीरेंद्र राणा यांच्याशी झाला. लग्नाला १0 वर्षे होत आली, तरी मुल होईना. डॉक्टरांकडे फेºया मारल्या. पण काहीच उपयोग झाला नाही. अखेर मीना यांना मुल होऊ शकत नाही, असे निष्पन्न झाले. मग त्यांनी ते गावही सोडले. शुक्रतालमध्ये येऊन राहू लागले.तिथे या दाम्पत्याने एक अपंग मुल दत्तक घेतले आणि मांगेराम असे त्याचे नामकरण केले. पण पाच वर्षांनी मांगेराम मरण पावला. पण त्यांनी नशिबापुढे हार मानली नाही आणि पुन्हा मुलाला दत्तक घेण्याचे ठरवले. तिथे त्यांना आठ एकर जमीन मिळाली होती. तिथे त्यांनी अनाथाश्रमच सुरू केला. सोबत एक शाळाही. अनेक मुले तिथे शिकली, त्यांच्यापैकी काहींना चांगल्या नोकºया मिळाल्या. मुल घेताना त्याचा धर्म या दाम्पत्याने कधीच पाहिला नाही.या दोघांनी अनेकांचे विवाहही लावून दिले. हे सारे करताना पैसा लागायचा. पण अनेकांनी त्यांचे काम पाहून देणग्या दिल्या. ही मुले माझी आहेत, असे मीना सांगतात. सध्या त्यांच्याकडे एकूण ४६ मुले असून त्यात १९ मुली आहेत. त्यांच्यापैकी अनेक अपंग आहेत. आता अनाथाश्रममध्ये त्यांनी मुलांना खेळण्यासाठी एक मोठे मैदानही तयार केले आहे. राहण्यासाठी उत्तम खोल्या असून, स्वयंपाकघरही मोठे आहे.... तर भवितव्य काय असते?शुक्रताल ग्रामपंचायतीने जमिनीचा मोठा तुकडा त्यांना दिला. आपले शेजारी आपल्याला धान्य आणि इतर गरजेच्या गोष्टी पुरवतात, असे विरेंद्र सांगतात. येथे राहणारी २२ वर्षांची वर्षीय ममता आता पोस्ट ग्रॅज्युएशन करीत आहे. मीना व विरेंद्र यांनी सांभाळ केला नसता, तर आम्ही सारे आज कुठे असतो वा आमच्या भवितव्याचे काय झाले असते, याचा विचारही करता येत नाही, असे ममता सांगते.