शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

भाजप ५०० जागा जिंकेल,BJP'ने जनावरं उभी केली तरी निवडून येतील: परमहंस आचार्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 14:51 IST

देशात काही दिवसातच लोकसभेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. भाजपने ४०० पारचा नारा दिला आहे, भाजपच्या उमेदवारांची पहिली यादीही समोर आली आहे.

देशात काही दिवसातच लोकसभेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. भाजपने ४०० पारचा नारा दिला आहे, भाजपच्या उमेदवारांची पहिली यादीही समोर आली आहे. दरम्यान, अयोध्येतील तपस्वी छावणीचे प्रमुख परमहंस आचार्य यांनी भाजपच्या विजयाबाबत मोठं वक्तव्य केले आहे. बाराबंकी येथे जगतगुरू परमहंस आचार्य यांनी या निवडणुकीत भाजप ५०० हून अधिक जागा जिंकेल असा दावा केला.

जगतगुरू परमहंस आचार्य म्हणाले, मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशाने खूप वेगाने प्रगती केली आहे आणि आपले सर्व देशवासी मोदीजींवर खूश आहेत. यावेळी मतदान मोदींच्या नावावर होणार आहे. भाजपकडून माणूस सोडा एखाद्या जनावराला जरी उभे केले तरी त्याचा विजय होईल, जिंकेल कारण आता जनता फक्त कमळाचे बटण दाबेल. लोकप्रतिनिधी कोण आहे किंवा तो कसा आहे याने काही फरक पडत नाही. इथे मोदीजींच्या नावावरच मतदान होणार आहे, असंही आचार्य म्हणाले.

सुधा मूर्ती यांची राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर निवड, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं अभिनंदन 

"यावेळी होणारी निवडणूक हे खरे तर एक प्रकारचे वैचारिक महाभारतच आहे. महाभारत घडले तसे देशाचे दोन तुकडे झाले. काही लोक अधर्माच्या बाजूने उभे राहिले होते. काही लोक धर्माच्या बाजूने उभे राहिले. ज्याची विचारधारा समान आहे. ज्यांना आपला देश पुढे न्यायचा असेल, ज्यांना लोककल्याण हवे असेल, त्यांना भारतीय जनता पक्षाचीच निवड करावी लागेल. जे दगडफेक करणाऱ्यांचे समर्थक आहेत, जे द्वेषाच्या गप्पा मारतात, जातिवाद, घराणेशाही आणि तुष्टीकरण वाढवण्याची मानसिकता ठेवतात, असे लोक इंडिया आघाडीसोबत आहेत पण त्यांची संख्या फक्त ५ टक्के आहे, अशी टीकाही परमहंस आचार्य यांनी केली.

परमहंस आचार्य म्हणाले की, यावेळी राष्ट्रवादाच्या नावावर निवडणुका होणार आहेत. मोदींचा चेहरा पाहूनच मतदान केले जाईल. भाजपकडून कोणीही उभे असले तरी येथे कमळाचे बटण दाबले जाईल. यावेळी ५०० हून अधिक जागा उपलब्ध असतील. आम्ही संत आहोत. संतांसाठी सर्व काही समान आहे, पण राष्ट्र प्रथम आहे, राष्ट्र सर्वोच्च आहे आणि इतर सर्व पक्षांसाठी कुटुंब प्रथम आहे, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :BJPभाजपाElectionनिवडणूक